शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

अमरावतीत ‘कॅरीबॅग’ निर्मितीचा कारखाना सील

By admin | Updated: September 16, 2016 01:59 IST

पर्यावरण रक्षणासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पर्यावरण विभागाने कठोर बंदी घातली आहे.

अमरावती : पर्यावरण रक्षणासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पर्यावरण विभागाने कठोर बंदी घातली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने येथील एका कारखान्यातून तब्बल ३३०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. हा कारखाना सील करण्याची कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली आहे.झोन क्र.३ हमालपुरा, झोन क्र.४ बडनेरा दक्षता समिती तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने बुधवारी एमआयडीसीमधील आर.जे.पॉलिमर्स या प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड घातली. रोहण चव्हाण यांच्या मालकीच्या या कारखान्यातून निर्मित प्लास्टिक पिशव्या शहरातील बाजारात आणल्या जात असल्याची माहिती महापालिका यंत्रणेला मिळाली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांपासून शहरातील अनेक प्रतिष्ठानांतून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती. त्या मोहिमेंतर्गत या कारखान्यावर धाड घालण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या कारखान्याला सील लावणार आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशाने पर्यावरण अधिकारी तथा सहायक आयुक्त महेश देशमुख आणि बडनेरा झोनचे सहायक आयुक्त योगेश पिठे यांनी ही कारवाई केली.स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०११ मधील तरतुदीनुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा अहवाल दर तीन महिन्यांनी शासनाला सादर करणे अनिवार्य आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असली तरी उत्पादन मात्र सुरूच आहे. त्यामुळे पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होत आहे. या पिशव्यांची विल्हेवाट लावणे हीच मोठी समस्या आहे. म्हणूनच दंड आणि त्यापुढे जाऊन फौजदारीशिवाय अन्य पर्याय नाही. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी आणि कागदी पिशव्यांच्या निर्मितीवर भर देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ४३ प्रभागांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्यासाठी प्रभागस्तरावर पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.