शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

सागरी सुरक्षा अभेद्य आहे का?

By admin | Updated: January 14, 2015 04:55 IST

गुजरातच्या सागरी हद्दीत घुसलेल्या संशयास्पद बोटीची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मुंबई व आसपासच्या परिसरातील सागरी सुरक्षा अभेद्य ठेवली गेली आहे

मुंबई : गुजरातच्या सागरी हद्दीत घुसलेल्या संशयास्पद बोटीची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मुंबई व आसपासच्या परिसरातील सागरी सुरक्षा अभेद्य ठेवली गेली आहे का, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश मंगळवारी दिले़न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ २६/११ हल्ल्यासाठी पाक अतिरेकी सागरीमार्गे मुंबईत घुसले होते़ त्यामुळे याचा धडा घेत शासनाने सागरी सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी नेमके काय केले आहे याचा खुलासा करावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे़त्याचवेळी मुंबई पोलिसांच्या शस्त्रांसाठी गेल्यावर्षी नवीन धोरण आखले गेल्याचे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले़पुणे येथील अश्विनी राणे यांनी त्यांच्या पतीच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी फौजदारी याचिका केली आहे़ या याचिकेद्वारे न्यायालयाने पोलिसांच्या शस्त्रांबाबत व नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी अनेक मुद्दे सुनावणीसाठी स्वत:हून दाखल करून घेतले़ त्यानुसार गेल्या सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या शस्त्रांच्या धोरणासंदर्भात विचारणा केली होती़ मुंबई पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्रे नसल्यानेच मुंबई हल्ल्यात अनेक दिग्गज अधिकाऱ्यांचा बळी गेल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले होते़या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला़ गुजरातच्या सागरी हद्दीत एक अनोळखी बोट येते व तिचा पाठलाग केल्यानंतर त्या बोटीचा स्फोट होतो़ हे गंभीर असल्याने मुंबईच्या सागरी सुरक्षाही अभेद्य होणे आवश्यक असून येथील सुरक्षा तेवढ्या ताकदीची आहे की नाही, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे मतही न्यायालयाने या वेळी व्यक्त केले़ यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़ (प्रतिनिधी)