शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सागरी सुरक्षा अभेद्य आहे का?

By admin | Updated: January 14, 2015 04:55 IST

गुजरातच्या सागरी हद्दीत घुसलेल्या संशयास्पद बोटीची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मुंबई व आसपासच्या परिसरातील सागरी सुरक्षा अभेद्य ठेवली गेली आहे

मुंबई : गुजरातच्या सागरी हद्दीत घुसलेल्या संशयास्पद बोटीची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मुंबई व आसपासच्या परिसरातील सागरी सुरक्षा अभेद्य ठेवली गेली आहे का, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश मंगळवारी दिले़न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ २६/११ हल्ल्यासाठी पाक अतिरेकी सागरीमार्गे मुंबईत घुसले होते़ त्यामुळे याचा धडा घेत शासनाने सागरी सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी नेमके काय केले आहे याचा खुलासा करावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे़त्याचवेळी मुंबई पोलिसांच्या शस्त्रांसाठी गेल्यावर्षी नवीन धोरण आखले गेल्याचे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले़पुणे येथील अश्विनी राणे यांनी त्यांच्या पतीच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी फौजदारी याचिका केली आहे़ या याचिकेद्वारे न्यायालयाने पोलिसांच्या शस्त्रांबाबत व नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी अनेक मुद्दे सुनावणीसाठी स्वत:हून दाखल करून घेतले़ त्यानुसार गेल्या सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या शस्त्रांच्या धोरणासंदर्भात विचारणा केली होती़ मुंबई पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्रे नसल्यानेच मुंबई हल्ल्यात अनेक दिग्गज अधिकाऱ्यांचा बळी गेल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले होते़या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला़ गुजरातच्या सागरी हद्दीत एक अनोळखी बोट येते व तिचा पाठलाग केल्यानंतर त्या बोटीचा स्फोट होतो़ हे गंभीर असल्याने मुंबईच्या सागरी सुरक्षाही अभेद्य होणे आवश्यक असून येथील सुरक्षा तेवढ्या ताकदीची आहे की नाही, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे मतही न्यायालयाने या वेळी व्यक्त केले़ यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़ (प्रतिनिधी)