शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

भूसंपादन अधिसूचनेवरून गदारोळ

By admin | Updated: April 6, 2015 23:23 IST

शासनाने १३ मार्च २०१५ रोजी भूसंपादनाबाबत काढलेल्या अधिसूचनेवरून सोमवारी विधान परिषदेत गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या

मुंबई : शासनाने १३ मार्च २०१५ रोजी भूसंपादनाबाबत काढलेल्या अधिसूचनेवरून सोमवारी विधान परिषदेत गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. सातवेळा कामकाज तहकूब झाले व त्यानंतर दिवसभराकरिता बंद करण्यात आले. या अधिसूचनेला शिवसेनेचाही विरोध असल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले होते.राज्य शासनाने भूसंपादनाची अधिसूचना काढल्याबाबत सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याचा प्रस्ताव हेमंत टकले यांनी मांडला. त्याला शेकापच्या जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना अशी अधिसूचना काढण्याचा सरकारला अधिकार नाही तसेच अधिसूचना काढण्यापूर्वी सरकारने विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते हे दोन आक्षेप विरोधकांनी घेतले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा वटहुकूम नसून अधिसूचना आहे व सरकारला ती काढण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकारने अजून याबाबतचा कायदा केलेला नसल्याने सभागृहाला विश्वासात घेतले नाही, असे तावडे यांनी सरकारच्यावतीने सांगितले. मात्र विरोधकांचे या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी वेलमध्ये उतरून ‘शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा देत कागदाचे कपटे हवेत भिरकावले तसेच सचिवांच्या समोरील टेबल वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी कामकाज तहकूब केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सरकारच्या या अधिसूचनेमुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी घेतल्या जातील, अशी भीती वाटते असल्याने यावर चर्चा झाली पाहिजे. उपसभापती डावखरे यांनी या विषयावर कधी चर्चा करायची ते सभापतींशी बोलून ठरवण्यात येईल, असे सांगितले. त्यावर शिक्षणमंत्री तावडे यांनी या विषयावर चर्चा व्हावी ही आमचीच इच्छा असून आम्हाला यांना उघडे पाडायचे आहे. शेतकऱ्यांना कोण लुटत आहे ते जनतेला कळलेच पाहिजे, असे तावडे म्हणाले. सरकारला अधिवेशन काळात अधिसूचना काढता येते किंवा कसे याबाबतचे मार्गदर्शन सभापतींनी करावे, अशी मागणी तावडे यांनी केली. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या भूसंपादन अधिसूचनेला शिवसेनेचा विरोध आहे. या विषयावर आम्ही यापूर्वीच मतभेद व्यक्त केले असून त्यावर चर्चा करायला हवी. गोऱ्हे यांच्या या विधानावर विरोधकांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. सातवेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर अखेर दिवसभराकरिता बंद झाले. (विशेष प्रतिनिधी)