शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

भूसंपादन अधिसूचनेवरून गदारोळ

By admin | Updated: April 6, 2015 23:23 IST

शासनाने १३ मार्च २०१५ रोजी भूसंपादनाबाबत काढलेल्या अधिसूचनेवरून सोमवारी विधान परिषदेत गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या

मुंबई : शासनाने १३ मार्च २०१५ रोजी भूसंपादनाबाबत काढलेल्या अधिसूचनेवरून सोमवारी विधान परिषदेत गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. सातवेळा कामकाज तहकूब झाले व त्यानंतर दिवसभराकरिता बंद करण्यात आले. या अधिसूचनेला शिवसेनेचाही विरोध असल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले होते.राज्य शासनाने भूसंपादनाची अधिसूचना काढल्याबाबत सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याचा प्रस्ताव हेमंत टकले यांनी मांडला. त्याला शेकापच्या जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना अशी अधिसूचना काढण्याचा सरकारला अधिकार नाही तसेच अधिसूचना काढण्यापूर्वी सरकारने विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते हे दोन आक्षेप विरोधकांनी घेतले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा वटहुकूम नसून अधिसूचना आहे व सरकारला ती काढण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकारने अजून याबाबतचा कायदा केलेला नसल्याने सभागृहाला विश्वासात घेतले नाही, असे तावडे यांनी सरकारच्यावतीने सांगितले. मात्र विरोधकांचे या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी वेलमध्ये उतरून ‘शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा देत कागदाचे कपटे हवेत भिरकावले तसेच सचिवांच्या समोरील टेबल वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी कामकाज तहकूब केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सरकारच्या या अधिसूचनेमुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी घेतल्या जातील, अशी भीती वाटते असल्याने यावर चर्चा झाली पाहिजे. उपसभापती डावखरे यांनी या विषयावर कधी चर्चा करायची ते सभापतींशी बोलून ठरवण्यात येईल, असे सांगितले. त्यावर शिक्षणमंत्री तावडे यांनी या विषयावर चर्चा व्हावी ही आमचीच इच्छा असून आम्हाला यांना उघडे पाडायचे आहे. शेतकऱ्यांना कोण लुटत आहे ते जनतेला कळलेच पाहिजे, असे तावडे म्हणाले. सरकारला अधिवेशन काळात अधिसूचना काढता येते किंवा कसे याबाबतचे मार्गदर्शन सभापतींनी करावे, अशी मागणी तावडे यांनी केली. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या भूसंपादन अधिसूचनेला शिवसेनेचा विरोध आहे. या विषयावर आम्ही यापूर्वीच मतभेद व्यक्त केले असून त्यावर चर्चा करायला हवी. गोऱ्हे यांच्या या विधानावर विरोधकांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. सातवेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर अखेर दिवसभराकरिता बंद झाले. (विशेष प्रतिनिधी)