शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रियेला ‘कात्री’

By admin | Updated: June 19, 2014 22:07 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांची शस्त्रक्रिया केली जात आहे. सामान्य कुटुंबातील शेकडो रुग्णांचे किरकोळ आजार शस्त्रक्रियेअभावी गंभीर रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एमसीआयने ठरवून दिलेल्या निकषानुसार येथे असलेल्या सुविधा व जागा अपुरी पडत आहे. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काही वॉर्डांमध्ये शिकवणी वर्ग दाखवून त्या ठिकाणची देखभाल दुरुस्ती सुरू केली आहे. या वॉर्डातील रुग्णांना व्हरांड्यात ठेवण्यात आले असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शस्त्रक्रिया विभागाचीही तीच परिस्थिती असून, त्यामुळे हा विभाग मार्च महिन्यापासून केवळ नावालाच सुरू आहे. गंभीर आजारी रुग्णाची एखादी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, मात्र इतर रुग्णांकडे टाळाटाळ करण्यात येत आहे. गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असल्या तरी इतर शेकडो रुग्णांना मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत शस्त्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. दोन महिने त्रास सहन करण्याचा सल्लाही येथील डॉक्टर देत असल्याने रुग्णांचा जीव एका आरोग्य संस्थेतच किती स्वस्त झालाय, हे दिसून येत आहे. देखभाल दुरुस्तीची कामेही थंडबस्त्यात सुरू असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात त्रास सहन करावा लागणार आहे. शस्त्रक्रिया विभाग नावापुरता सुरू असल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला रुग्णांविषयी कुठलाही कळवळा नसल्याचे स्पष्ट होत आहे.** रुग्णांना पाण्यात झोपावे लागणार..पावसाळय़ाच्या तोंडावर वैद्यकीय महाविद्यालयातील काही वॉर्डांची देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना ब्लड बँकेसमोरील पॅसेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या जागेत पावसाळय़ाचे पाणी घुसणार असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात पाण्यामध्ये झोपावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.** शस्त्रक्रिया विभागातील वास्तवशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मात्र ज्या रुग्णांचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे किरकोळ आजारी रुग्णांचे आजार वाढत असून, त्यांना चिंताजनक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ** या शस्त्रक्रिया रखडल्याशरीरावर गाठ असल्यास ती शस्त्रक्रिया तत्काळ करणे आवश्यक आहे, मात्र अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्याने ही गाठ वाढून रुग्णांना मोठा आजार होण्याचा धोका होत आहे. अँपेंडिक्स, अल्सर, हर्निया यासारख्या आजारांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून, त्यांना दोन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. ** बांधकामाच्या नावाखाली रुग्णांची हकालपट्टीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयातील काही वॉर्डांचे बांधकाम व देखाभाल दुरुस्ती करण्यात येत असल्याने रुग्णांची सरळ-सरळ हकालपट्टी करण्यात येत आहे. या प्रकरणाविषयी नव्यानेच रुजू झालेले वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.