शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रियेला ‘कात्री’

By admin | Updated: June 19, 2014 22:07 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांची शस्त्रक्रिया केली जात आहे. सामान्य कुटुंबातील शेकडो रुग्णांचे किरकोळ आजार शस्त्रक्रियेअभावी गंभीर रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एमसीआयने ठरवून दिलेल्या निकषानुसार येथे असलेल्या सुविधा व जागा अपुरी पडत आहे. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काही वॉर्डांमध्ये शिकवणी वर्ग दाखवून त्या ठिकाणची देखभाल दुरुस्ती सुरू केली आहे. या वॉर्डातील रुग्णांना व्हरांड्यात ठेवण्यात आले असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शस्त्रक्रिया विभागाचीही तीच परिस्थिती असून, त्यामुळे हा विभाग मार्च महिन्यापासून केवळ नावालाच सुरू आहे. गंभीर आजारी रुग्णाची एखादी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, मात्र इतर रुग्णांकडे टाळाटाळ करण्यात येत आहे. गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असल्या तरी इतर शेकडो रुग्णांना मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत शस्त्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. दोन महिने त्रास सहन करण्याचा सल्लाही येथील डॉक्टर देत असल्याने रुग्णांचा जीव एका आरोग्य संस्थेतच किती स्वस्त झालाय, हे दिसून येत आहे. देखभाल दुरुस्तीची कामेही थंडबस्त्यात सुरू असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात त्रास सहन करावा लागणार आहे. शस्त्रक्रिया विभाग नावापुरता सुरू असल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला रुग्णांविषयी कुठलाही कळवळा नसल्याचे स्पष्ट होत आहे.** रुग्णांना पाण्यात झोपावे लागणार..पावसाळय़ाच्या तोंडावर वैद्यकीय महाविद्यालयातील काही वॉर्डांची देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना ब्लड बँकेसमोरील पॅसेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या जागेत पावसाळय़ाचे पाणी घुसणार असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात पाण्यामध्ये झोपावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.** शस्त्रक्रिया विभागातील वास्तवशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मात्र ज्या रुग्णांचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे किरकोळ आजारी रुग्णांचे आजार वाढत असून, त्यांना चिंताजनक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ** या शस्त्रक्रिया रखडल्याशरीरावर गाठ असल्यास ती शस्त्रक्रिया तत्काळ करणे आवश्यक आहे, मात्र अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्याने ही गाठ वाढून रुग्णांना मोठा आजार होण्याचा धोका होत आहे. अँपेंडिक्स, अल्सर, हर्निया यासारख्या आजारांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून, त्यांना दोन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. ** बांधकामाच्या नावाखाली रुग्णांची हकालपट्टीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयातील काही वॉर्डांचे बांधकाम व देखाभाल दुरुस्ती करण्यात येत असल्याने रुग्णांची सरळ-सरळ हकालपट्टी करण्यात येत आहे. या प्रकरणाविषयी नव्यानेच रुजू झालेले वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.