शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रियेला ‘कात्री’

By admin | Updated: June 19, 2014 22:07 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांची शस्त्रक्रिया केली जात आहे. सामान्य कुटुंबातील शेकडो रुग्णांचे किरकोळ आजार शस्त्रक्रियेअभावी गंभीर रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एमसीआयने ठरवून दिलेल्या निकषानुसार येथे असलेल्या सुविधा व जागा अपुरी पडत आहे. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काही वॉर्डांमध्ये शिकवणी वर्ग दाखवून त्या ठिकाणची देखभाल दुरुस्ती सुरू केली आहे. या वॉर्डातील रुग्णांना व्हरांड्यात ठेवण्यात आले असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शस्त्रक्रिया विभागाचीही तीच परिस्थिती असून, त्यामुळे हा विभाग मार्च महिन्यापासून केवळ नावालाच सुरू आहे. गंभीर आजारी रुग्णाची एखादी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, मात्र इतर रुग्णांकडे टाळाटाळ करण्यात येत आहे. गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असल्या तरी इतर शेकडो रुग्णांना मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत शस्त्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. दोन महिने त्रास सहन करण्याचा सल्लाही येथील डॉक्टर देत असल्याने रुग्णांचा जीव एका आरोग्य संस्थेतच किती स्वस्त झालाय, हे दिसून येत आहे. देखभाल दुरुस्तीची कामेही थंडबस्त्यात सुरू असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात त्रास सहन करावा लागणार आहे. शस्त्रक्रिया विभाग नावापुरता सुरू असल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला रुग्णांविषयी कुठलाही कळवळा नसल्याचे स्पष्ट होत आहे.** रुग्णांना पाण्यात झोपावे लागणार..पावसाळय़ाच्या तोंडावर वैद्यकीय महाविद्यालयातील काही वॉर्डांची देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना ब्लड बँकेसमोरील पॅसेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या जागेत पावसाळय़ाचे पाणी घुसणार असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात पाण्यामध्ये झोपावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.** शस्त्रक्रिया विभागातील वास्तवशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मात्र ज्या रुग्णांचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे किरकोळ आजारी रुग्णांचे आजार वाढत असून, त्यांना चिंताजनक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ** या शस्त्रक्रिया रखडल्याशरीरावर गाठ असल्यास ती शस्त्रक्रिया तत्काळ करणे आवश्यक आहे, मात्र अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्याने ही गाठ वाढून रुग्णांना मोठा आजार होण्याचा धोका होत आहे. अँपेंडिक्स, अल्सर, हर्निया यासारख्या आजारांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून, त्यांना दोन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. ** बांधकामाच्या नावाखाली रुग्णांची हकालपट्टीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयातील काही वॉर्डांचे बांधकाम व देखाभाल दुरुस्ती करण्यात येत असल्याने रुग्णांची सरळ-सरळ हकालपट्टी करण्यात येत आहे. या प्रकरणाविषयी नव्यानेच रुजू झालेले वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.