शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

एसटी प्रवाशांच्या सवलतींना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 05:36 IST

एसटीतील प्रवाशांच्या सवलतींना कात्री लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई : एसटी महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. या सवलती मूल्यांमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडतो. हा बोजा कमी व्हावा आणि यामध्ये समानता यावी, यासाठी काही बदल केले जाणार आहेत. हे बदल करताना एसटीतील प्रवाशांच्या सवलतींना कात्री लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी या संदर्भात सवलत मूल्य आढावा समितीकडून अतिरिक्त मुख्य सचिवांसमोर सादरीकरण करण्यात आले. एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध आणि अपंग, स्वातंत्र्यसैनिक यांसह २४ प्रकारच्या विविध सवलती दिल्या जातात. या सवलती दिल्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडतो. सवलती मूल्यांमुळे एसटीवर वर्षाला १,४00 कोटींचा बोजा पडतो. या सवलतींपोटीची काही रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला प्रत्येक वर्षी दिली जाते. मात्र, ती रक्कम पूर्ण मिळत नसल्याने, सवलती देताना महामंडळाला मोठे नुकसानही सोसावे लागते. एकूणच यामध्ये समानता यावी आणि सवलत मूल्यांमुळे पडणारे आर्थिक ओझे कमी व्हावे, यासाठी त्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सवलत मूल्य आढावा समिती काही महिन्यांपूर्वी नेमण्यात आली आणि शासनाच्या जवळपास विविध खात्यांतील १९ जणांची यावर नियुक्ती केली. या समितीचे अध्यक्ष हे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकही आहेत. एक महिन्यांपूर्वी सवलत मूल्यांबाबतीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. हा अहवाल सादर केल्यानंतर अखेर दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त मुख्य सचिवांसमोर त्याचे सादरीकरण करण्यात आले. लवकरच हा अहवाल अर्थ खाते आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाईल. सवलत मूल्यांमध्ये समानता आणतानाच, प्रवाशांच्या सवलतींत काही बदल करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. यात सवलत मूल्यांना कात्रीही लागेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ही कात्री लागल्यास प्रवासी संख्या कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सवलत मूल्य हे एकाच छत्राखाली आणताना एकखिडकी योजनाही आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध खात्यांकडून रक्कम ही थेट अर्थ विभागाकडे जमा केली जाईल आणि त्यानंतर ती एसटी महामंडळाला मिळेल. (प्रतिनिधी)>तिसरी समितीसवलत मूल्यांमुळे एसटीला आार्थिक बोजा पडत असल्याने, त्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला व २00५ साली एक समिती नेमण्यात आली. मात्र, त्यानंतर काहीएक हालचाली झाल्या नाहीत. २0११ मध्ये पुन्हा एकदा समिती नेमण्यात आली, परंतु त्यानंतरही सवलत मूल्यांवर निर्णय न झाल्याने, अखेर पुन्हा एकदा आढावा समिती नेमण्यात आली आहे.