शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

थर्माकोलवर शास्त्रोक्त प्रक्रिया

By admin | Updated: June 13, 2016 03:56 IST

थर्माकोल वेगळे करून यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.

ठाणे : ठाणे महापालिकेने कचऱ्याचे विघटन करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले असतानाच आता घनकचऱ्यातून थर्माकोल वेगळे करून यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन ७०० मेट्रीक टन कचरा जमा होतो. यामधून ओला व सुका कचरा वेगळा करून सुक्या कचऱ्याची पर्यावरण संवर्धनशील पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रस्तावित आहे. ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यातील थर्माकोलवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करून पुनर्वापर करण्याकरिता वार्षिक सरासरी १ टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणी करून १० वर्षे चालवण्याबाबतचा प्रस्ताव जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.घनकचऱ्यातील थर्माकोलवरील पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर, त्याचे व्यवस्थापन करणे, थर्माकोल कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेण्यासाठीची यांत्रिक व्यवस्था व मनुष्यबळाच्या खर्चाची बचत करणे, थर्माकोलचा कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये पडून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आदी वैशिष्ट्ये या प्रकल्पाची असून अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका असल्याचे महापौरांनी सांगितले. हा प्रकल्प महापालिका कार्यक्षेत्रात कार्यान्वित केल्यानंतर नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याची जागृती होईल. थर्माकोल व तत्सम पदार्थांवर प्रक्रिया केल्याने शहरातील नद्या, नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल. थर्माकोलमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित राहील, डम्पिंग ग्राउंडपर्यंत वाहतुकीचा खर्च व मनुष्यबळ यामध्ये बचत होईल. या प्रकल्पाचा कोणताही भांडवली व महसुली भार महापालिकेवर पडणार नाही. शिवाय, या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम महापालिकेस महसूल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रदूषणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करण्यासाठी निश्चित मदत होईल. त्यामुळे भविष्यातदेखील नवनवीन तंत्रज्ञान वापरून अशा प्रकारचे प्रकल्प महापालिका कार्यक्षेत्रात राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.