शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

नव्या पिढीने विज्ञानाचा ध्यास घ्यावा

By admin | Updated: March 2, 2017 01:05 IST

गेल्या ६० वर्षांत देशाची झालेली प्रगती अभिमानास्पद आहे.

पुणे : ‘गेल्या ६० वर्षांत देशाची झालेली प्रगती अभिमानास्पद आहे. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी शिक्षण आणि विज्ञानवादी दृष्टीवर भर दिला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अंगीकारामुळेच आज आपला देश प्रगतिपथावर आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीने विज्ञानाचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च येथील (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. एल. एस. शशिधरा यांनी केले.राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘यंग एक्सप्लोरर’ या आंतरशालेय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रकल्प स्पर्धा, प्रश्नमंजूषा आणि निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी इस्रोचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे, लीप अँड स्केल संस्थेचे प्रशांत जोशी, भारतीय विद्याभवन संस्थेचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिकेचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी रश्मी बहुलकर व स्नेहलता शेलार आदी उपस्थित होते.स्मार्ट सिटी, स्टेप क्लायंबिग बास्केट, मल्टिपर्पज सेफ्टी फॅन, मोड्यूलोपेंडुलम असे विविध प्रकारचे प्रकल्प इथे मांडण्यात आले होते. या प्रकल्प प्रदर्शनात ३० शाळांतून जवळपास ७० प्रकल्प मांडण्यात आले होते. अनंत भिडे यांनी प्रास्ताविक केले. नेहा निरगुडकर व रश्मी बहुलकर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहलता शेलार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>‘शिक्षण हाच शिक्षण हाच सक्षम बनण्याचा मार्ग आहे, हे ओळखून भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी शिक्षण व संशोधन संस्था उभारण्यावर भर दिला. विज्ञानाची प्रगती होत गेली तशी तंत्रज्ञानातही क्रांती झाली. आज अनेक गोष्टी आपण निर्यात करू लागलो आहोत. अनेक देश संशोधनासाठी आपल्याकडे हात पुढे करताहेत. मात्र, नोबेल पारितोषिकापासून आपण अजूनही दूर आहोत. देशाच्या विकासात विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास ठेवून समाजाचे प्रश्न सोडवणारे संशोधन करावे, असे ते म्हणाले.