शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

नव्या पिढीने विज्ञानाचा ध्यास घ्यावा

By admin | Updated: March 2, 2017 01:05 IST

गेल्या ६० वर्षांत देशाची झालेली प्रगती अभिमानास्पद आहे.

पुणे : ‘गेल्या ६० वर्षांत देशाची झालेली प्रगती अभिमानास्पद आहे. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी शिक्षण आणि विज्ञानवादी दृष्टीवर भर दिला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अंगीकारामुळेच आज आपला देश प्रगतिपथावर आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीने विज्ञानाचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च येथील (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. एल. एस. शशिधरा यांनी केले.राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘यंग एक्सप्लोरर’ या आंतरशालेय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रकल्प स्पर्धा, प्रश्नमंजूषा आणि निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी इस्रोचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे, लीप अँड स्केल संस्थेचे प्रशांत जोशी, भारतीय विद्याभवन संस्थेचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिकेचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी रश्मी बहुलकर व स्नेहलता शेलार आदी उपस्थित होते.स्मार्ट सिटी, स्टेप क्लायंबिग बास्केट, मल्टिपर्पज सेफ्टी फॅन, मोड्यूलोपेंडुलम असे विविध प्रकारचे प्रकल्प इथे मांडण्यात आले होते. या प्रकल्प प्रदर्शनात ३० शाळांतून जवळपास ७० प्रकल्प मांडण्यात आले होते. अनंत भिडे यांनी प्रास्ताविक केले. नेहा निरगुडकर व रश्मी बहुलकर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहलता शेलार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>‘शिक्षण हाच शिक्षण हाच सक्षम बनण्याचा मार्ग आहे, हे ओळखून भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी शिक्षण व संशोधन संस्था उभारण्यावर भर दिला. विज्ञानाची प्रगती होत गेली तशी तंत्रज्ञानातही क्रांती झाली. आज अनेक गोष्टी आपण निर्यात करू लागलो आहोत. अनेक देश संशोधनासाठी आपल्याकडे हात पुढे करताहेत. मात्र, नोबेल पारितोषिकापासून आपण अजूनही दूर आहोत. देशाच्या विकासात विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास ठेवून समाजाचे प्रश्न सोडवणारे संशोधन करावे, असे ते म्हणाले.