शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विज्ञान दिनामागचं गुपित!

By admin | Updated: February 28, 2017 06:39 IST

भारताला विज्ञानाचं पहिलं नोबेल मिळवून देण्याचा मान डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा.

- पवन देशपांडेभारताला विज्ञानाचं पहिलं नोबेल मिळवून देण्याचा मान डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा. एखाद्या पारदर्शक पदार्थामधून प्रकाश जाताना त्याचे काय काय होते, याचा शोध डॉ. रामन यांनी लावला तो २८ फेब्रुवारीला. हा शोध म्हणजे रामन इफेक्ट. त्याचा सन्मान नोबेलने झाला अन् तेव्हापासून हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन बनला.डॉ. रामन यांनी शोध लावला ते वर्ष लीप वर्ष होतं. म्हणजे त्यांचा शोध जर एक दिवस उशिरा लागला असता (२९ फेब्रुवारीला) तर हा दिवस दर चार वर्षांनी साजरा करावा लागला असता. हा विज्ञान दिन साजरा व्हावा यासाठी एका द्रष्ट्या शास्त्रज्ञानेच पुढाकार घेतला. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर १९८६ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी अनेक योजना पुढे आणल्या. त्या राबवल्याही. देशभरात विज्ञानाचे जाळे पसरावे आणि त्याची गोडी सर्वांना लागावी, असा विचार करून डॉ. गोवारीकर यांनी विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी रामन इफेक्ट उदयास आलेल्या त्या २८ फेब्रुवारी या दिवसाची निवड केली. पहिला विज्ञान दिन १९८७ साली साजरा केला गेला. सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विज्ञान दिनाच्या व्याख्यानाला डॉ. जयंत नारळीकर यांना आमंत्रित केले गेले होते. आता यावर्षी लोकमतच्या वतीने देण्यात येणाऱ्या खास लेखांमध्येही त्यांचा लेख आहे, हे विशेष. (शैक्षणिक धोरणातच बदल व्हावा)(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)नोबेलच्या रकमेतून हिऱ्यांची खरेदीडॉ. रामन यांना नोबेल पुरस्कारावेळी जी रक्कम मिळाली त्याचा वापर त्यांनी हिऱ्यांची खरेदी करण्यासाठी केला. अर्थात हिऱ्यांचा त्यांना शौक नव्हता, तर त्यांना त्यावर संशोधन करायचे होते. स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी पैसे खर्च करण्याऐवजी त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे आणि दर्जाचे हिरे खरेदी केले. हिऱ्यांच्या प्रकाशकीय गुणधर्माचा आणि आंतररचनांचा अभ्यास त्यांना करायचा होता. भविष्यात त्यांनी तो केलाही.