शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी वह्या, पुस्तकांची विक्री करणे थांबवावे!

By admin | Updated: April 1, 2017 04:05 IST

शाळेच्या परीक्षा संपल्या, निकाल लागल्यावरही पालकांना शाळेच्या खेपा माराव्या लागतात. एकच कारण असते की

मुंबई : शाळेच्या परीक्षा संपल्या, निकाल लागल्यावरही पालकांना शाळेच्या खेपा माराव्या लागतात. एकच कारण असते की, पुढच्या वर्षीच्या वह्या, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य हे शाळेतूनच घेणे विद्यार्थ्यांना अनिवार्य केलेले असते. खरे तर महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई अशा कोणत्याही शाळांना वह्या, पुस्तके आणि अन्य शाळेचे साहित्य विकण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. तरीही शाळा खुलेआमपणे विक्री करून पालकांना लुबाडतात. शाळांनी हे थांबवावे, अशी मागणी करणारे पत्र बॉम्बे बुकसेलर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स असोसिएशनने शिक्षणमंत्री आणि शाळांना पाठवले आहे. नियमांनुसार कोणतीही शाळा त्यांच्या कोणत्याही साहित्याची, पुस्तकांची विक्री करू शकत नाही. हा नियम सर्व शाळांना लागू होतो. तिसऱ्या व्यक्तीला कंत्राट देऊनही शाळेच्या आवारात विक्री करण्यास मनाई आहे. तरीही या नियमाची पायमल्ली होताना दिसते आहे. याचबरोबर शाळा कोणत्याही एका दुकानदाराचे अथवा डिलरचे नाव पालकांना सांगू शकत नाही. तरीही शाळांमध्ये हे प्रकार घडतात. पालकांना पुस्तके, वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्य घेण्याचा अधिकार असूनही त्यांना नाकारला जातो. या गोष्टी थांबाव्यात म्हणून शाळांना आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. (प्रतिनिधी)हवे तसे दर आकारणे थांबवणे गरजेचेशाळांमधून विकल्या जाणाऱ्या वह्या-पुस्तक, गणवेशासाठी पालकांकडून अधिक पैसे आकारले जातात. या वस्तूंवर किमती नसतात. मुद्दामहून वह्या, पुस्तकांचे आकार अर्धा किंवा एक इंच जास्त सांगितले जातात. सामान्य आकाराच्या वह्या सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे पालकांना त्या बाजारात उपलब्ध होत नाहीत. शाळा यासाठी कोणताही कर भरत नाहीत. त्यांची नोंदणी नसते. त्यामुळे त्यांना हवे तसे दर आकारतात. हे थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर कारवाई केली पाहिजे. निकालाच्या दिवशी शाळेने साहित्याची यादी देणे अपेक्षित असल्याचे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते जयंत जैन यांनी सांगितले.