शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शाळांनी वह्या, पुस्तकांची विक्री करणे थांबवावे!

By admin | Updated: April 1, 2017 04:05 IST

शाळेच्या परीक्षा संपल्या, निकाल लागल्यावरही पालकांना शाळेच्या खेपा माराव्या लागतात. एकच कारण असते की

मुंबई : शाळेच्या परीक्षा संपल्या, निकाल लागल्यावरही पालकांना शाळेच्या खेपा माराव्या लागतात. एकच कारण असते की, पुढच्या वर्षीच्या वह्या, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य हे शाळेतूनच घेणे विद्यार्थ्यांना अनिवार्य केलेले असते. खरे तर महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई अशा कोणत्याही शाळांना वह्या, पुस्तके आणि अन्य शाळेचे साहित्य विकण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. तरीही शाळा खुलेआमपणे विक्री करून पालकांना लुबाडतात. शाळांनी हे थांबवावे, अशी मागणी करणारे पत्र बॉम्बे बुकसेलर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स असोसिएशनने शिक्षणमंत्री आणि शाळांना पाठवले आहे. नियमांनुसार कोणतीही शाळा त्यांच्या कोणत्याही साहित्याची, पुस्तकांची विक्री करू शकत नाही. हा नियम सर्व शाळांना लागू होतो. तिसऱ्या व्यक्तीला कंत्राट देऊनही शाळेच्या आवारात विक्री करण्यास मनाई आहे. तरीही या नियमाची पायमल्ली होताना दिसते आहे. याचबरोबर शाळा कोणत्याही एका दुकानदाराचे अथवा डिलरचे नाव पालकांना सांगू शकत नाही. तरीही शाळांमध्ये हे प्रकार घडतात. पालकांना पुस्तके, वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्य घेण्याचा अधिकार असूनही त्यांना नाकारला जातो. या गोष्टी थांबाव्यात म्हणून शाळांना आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. (प्रतिनिधी)हवे तसे दर आकारणे थांबवणे गरजेचेशाळांमधून विकल्या जाणाऱ्या वह्या-पुस्तक, गणवेशासाठी पालकांकडून अधिक पैसे आकारले जातात. या वस्तूंवर किमती नसतात. मुद्दामहून वह्या, पुस्तकांचे आकार अर्धा किंवा एक इंच जास्त सांगितले जातात. सामान्य आकाराच्या वह्या सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे पालकांना त्या बाजारात उपलब्ध होत नाहीत. शाळा यासाठी कोणताही कर भरत नाहीत. त्यांची नोंदणी नसते. त्यामुळे त्यांना हवे तसे दर आकारतात. हे थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर कारवाई केली पाहिजे. निकालाच्या दिवशी शाळेने साहित्याची यादी देणे अपेक्षित असल्याचे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते जयंत जैन यांनी सांगितले.