शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शाळांमध्ये होते शालेय साहित्याची विक्री

By admin | Updated: June 6, 2017 04:07 IST

शालेय साहित्याची विक्री शाळांमध्ये करू नये, असे परिपत्रक राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढले आहे.

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शालेय साहित्याची विक्री शाळांमध्ये करू नये, असे परिपत्रक राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढले आहे. असे असतानाही शाळा सर्रासपणे शालेय साहित्याची विक्री करत आहेत. त्यामुळे शालेय साहित्य विकणाऱ्या दुकानदारांचे नुकसान होत आहे. सरकारी परिपत्रकाची शाळांकडून पायमल्ली होत असताना सरकारी यंत्रणा त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्य सरकारच्या बोर्डाच्या कल्याण-डोंबिवलीत १०२ शाळा आहेत. डोंबिवलीत सीबीएसई बोर्डाच्या आठ, आयसीएसई बोर्डाच्या पाच आणि आयजीसीएससी बोर्डाच्या तीन शाळा आहेत. या शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्याने पुस्तके, वह्या, कंपासपेटी, वॉटरबॅग तसेच रेनकोट, छत्र्या आदी वस्तूंच्या खरेदीसाठी पालकांची बाजारात गर्दी होत आहे. मात्र, दिल्ली बोर्डाच्या तसेच कॉन्व्हेंट, खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वह्या, पुस्तके, व्यवसाय आदी शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती पालकांवर करत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांतील शालेय साहित्य विकणाऱ्या २०० हून अधिक दुकानदारांचे नुकसान होत आहे. साहित्याचा दर बाजारापेक्षा १० ते २० टक्के जादा आहे. सरकार शाळेत होणाऱ्या शालेय साहित्यविक्रीवर बंदी घालत नाही. ही विक्री रोखण्यासाठी सरकारकडे यंत्रणाच नसल्याचे सूत्रांनी सांगितले.दप्तरापासून सर्व शालेय साहित्य शाळांकडून पुरवले जात असल्याने साहित्यविक्रेत्यांचा बाजार बसला आहे. सरकारकडून ज्या डिलरना पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी पाठवली जातात. त्या विक्रेत्यांनाही १० ते १५ टक्केच सवलत मिळते. जास्त नफा त्यांना मिळत नाही. त्यात शालेय साहित्यही शाळांमधून देत असल्याचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. डिलर ठरलेले असल्याने अन्य व्यावसायिक त्यात हात घालत नाही. सरकारकडून धूळफेकबॉम्बे बुक सेल्स अ‍ॅण्ड पब्लिकेशन या संस्थेने शाळांमधून शालेय साहित्यखरेदीस विरोध केला आहे. त्याची दखल अद्याप सरकारकडून घेतली जात नाही. कारवाई करण्यास सरकारकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे केवळ परिपत्रक काढून शालेय साहित्यविक्रेत्यांच्या डोळ्यांत सरकारने धूळफेक केली आहे, असा मुद्दा विक्रेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.