शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना केवळ नोटिसांचा दम

By admin | Updated: June 6, 2017 01:15 IST

शिक्षण विभागाकडून काढण्यात आले असतानाही बहुतांश शाळांनी हा आदेश धाब्यावर ठेवून, सर्रास शाळांमधूनच दुकान थाटले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शाळांमध्ये वह्या-पुस्तके, गणवेश या शैक्षणिक साहित्याची विक्री करू नये; तसेच ठराविक दुकानांमधून ते खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे आदेश शिक्षण विभागाकडून काढण्यात आले असतानाही बहुतांश शाळांनी हा आदेश धाब्यावर ठेवून, सर्रास शाळांमधूनच दुकान थाटले आहे. शिक्षण विभागाकडून शाळांच्या नियमनाबाबत काढण्यात येणारे असे अनेक आदेश शाळांकडून धुडकावून लावले जात आहेत. शुल्कवाढीच्या बाबत तर शाळा शिक्षणमंत्र्यांनाही जुमानत नाहीत, तरीही आतापर्यंत कोणत्याही शाळेवर कारवाई झालेली नाही. विशेषत: खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कुणाचेही नियंत्रण उरलेले नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून एप्रिल महिन्यामध्ये शाळांमधून शैक्षणिक साहित्य विक्री मनाई करण्याचे आदेश काढले होते. या आदेशामध्ये प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, महापालिका शाळांचे प्रशासकीय अधिकारी यांनी शाळांमध्ये चालणाऱ्या या बेकायदेशीर विक्रीची चौकशी करून, संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शुल्क नियमन कायदा २०११ व आरटीई अ‍ॅक्ट २००९, प्रोव्हिबिशन आॅफ इल लीगल सेल आॅफ बुक जीर आदी कायद्यान्वये हे आदेश काढण्यात आले होते. या आदेशामुळे शाळांच्या बेकायदेशीर विक्रीला चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात बहुतांश शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. विशेषत: अनेक इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांकडून शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन करण्यात कुचराई करतात. त्याचबरोबर सीबीएसई, आयसीएसई या बोर्डांच्या शाळा तर शिक्षण विभागाला जुमानतच नाही. शहरातील निम्म्यापेक्षा जास्त शाळांवर शैक्षणिक साहित्याची विक्री केली जाते; मात्र प्रत्यक्षात एकाही शाळेवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. शाळांमधून होणाऱ्या बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य खरेदीची जबरदस्ती केली जात असल्याच्या विक्रीविरोधात अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे आल्या होत्या. किमान त्या तक्रारींच्या आधारे चौकशी केली असती, तरी अनेक शाळा यामध्ये सापडल्या असत्या; मात्र अधिकाऱ्यांकडून या तक्रारी गंभीरपणे घेतल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. शाळांवर कारवाई करण्याचे केवळ कागदोपत्री आदेश काढून शिक्षण संचालनालयाकडून आपली जबाबदारी झटकली जात आहे. पालकांनी शाळांविरोधात दिलेल्या तक्रारींचा सातत्याने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जातो; मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन शांत बसविले जाते किंवा संबंधित शाळेला नोटीस दिल्याच्या पत्राची कॉपी देऊन पालकांना शांत केले जाते; मात्र शाळा या नोटिशीला उत्तरच देत नाहीत. >मुजोर शाळांपुढे शिक्षण विभाग हतबलशिक्षण विभागाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या, बेकायदेशीर प्रक्रिया राबविणाऱ्या, मनमानी शुल्कवाढ करणे अशा सर्व प्रकारांमध्ये तुमच्या शाळेला देण्यात आलेली मान्यता रद्द करू, अशी केवळ एकमेव धमकी शिक्षण विभागाकडून देण्यात येते; मात्र प्रत्यक्षात ही कारवाई प्रशासन करूच शकत नाही. एक तर त्या शाळेची मान्यता रद्द केल्यास, तिथल्या विद्यार्थ्यांचे काय करायचे, असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचविण्या पलीकडे शाळांचे काहीच नुकसान होऊ शकत नाही, याची पक्की माहिती शाळा प्रशासनाला झाली आहे. त्यामुळे कायद्यामध्ये योग्य त्या सुधारणा करून, अशा शाळांच्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करणे, त्यांना जबर दंड करणे आदी शिक्षेच्या तरतुदी करणे आवश्यक असल्याचे मत पालक संघटनांनी व्यक्त केले आहे.शिक्षण शुल्क कायद्यामध्ये शाळांमधील दोन तृतीयांश पालकांची मान्यता असल्याशिवाय शाळांना यापुढे शुल्कवाढ करता येणार नाही, अशी सुधारणा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या कायद्यानुसार पालकांना त्रास देणाऱ्या शाळांविरुद्ध एकेकट्या पालकांना काहीच करता येत नाही. त्यामुळे शाळांविरोधात एकट्या पालकालाही तक्रार देता यावी, अशी सुधारणाही कायद्यात करण्याची मागणी करण्यात येत आहे. या कायद्यातील सुधारणांसाठी समिती नेमण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षण शुल्क कायद्यात काय सुधारणा होतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.