शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

चार वर्षांपासून शाळांना निधीच नाही

By admin | Updated: January 26, 2017 10:35 IST

२५ टक्के प्रवेशाचे शुल्क देण्यातही हात आखडता.

अकोला, दि. २५- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार, दिलेल्या २५ टक्के शाळा प्रवेशासाठी शासनाकडून शाळांना देय अनुदानाची दोन कोटीपेक्षाही अधिक रक्कम नवीन सत्रातही मिळालेली नाही. राज्यभरात गेल्या चार वर्षांपासून शाळांना निधी मिळालेला नाही. त्यातच नव्याने ही प्रक्रिया न राबवल्यास शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाला शासनाचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमातील कलमानुसार दुर्बल, वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास, दिव्यांग या वर्गवारीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा खर्च शासनाकडून दिला जातो. त्यानुसार गेल्या वर्षी २0१५-१६ मध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची रक्कम दोन कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ती शाळांना मिळण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने शासनाकडे सादर केला. त्यापैकी एक रुपयाही मिळालेला नाही. चालू वर्षातील १ कोटी ६ लाख रुपये जिल्हा परिषदेकडे प्राप्त आहेत. त्याचे वाटप कुठल्याही शाळेला झालेले नाही. हा निधीही अखर्चित आहे, त्यामुळे या शाळांना विद्यार्थ्यांचा खर्च कसा चालवावा, या समस्येने हैराण केले आहे.राज्यभरातील शाळांचे नऊशे कोटी थकीतगेल्या चार वर्षांपासून म्हणजे २0१२-१३ ते २0१५-१६ या वर्षातील प्रवेश शुल्कापोटी शाळांना देय असलेली जवळपास ९00 कोटी रुपये एवढी रक्कम शासनाकडे थकीत आहे. ती मिळण्यासाठी शाळा संचालकांच्या विविध संघटनांनी सातत्याने आंदोलनेही केली. त्यामुळे २0१३-१४ मध्ये मागणीच्या ६६ टक्के, २0१४-१५ मध्ये ५0 टक्के रक्कम शासनाने दिली. त्यातून चार वर्षांचा खर्च भागणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने चालू वर्षात २५ टक्के प्रवेश न दिल्यास मान्यता रद्दचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याची शक्यताही काहींनी व्यक्त केली.संचालकांच्या संघटनांची २८ ला बैठकदरम्यान, चालू वर्षातील प्रवेश प्रक्रिया शाळांकडून राबवली जाईल; मात्र खर्चाबाबत शासनाकडून काय केले जाणार, याबाबतचा आढावा आणि विचार करण्यासाठी शाळा संचालकांच्या मेस्टा, वेस्टा, इस्टा या संघटनांच्या पदाधिकार्‍यांची २८ जानेवारी रोजी नागपूर येथे बैठक होत आहे. या बैठकीत संघटनांची पुढील भूमिका ठरणार असल्याची माहिती आहे.