शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

पालिका शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नाही

By admin | Updated: March 9, 2016 05:38 IST

अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या इमारतींवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महापालिकेच्या दिव्याखाली मात्र अंधार आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा

मुंबई: अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या इमारतींवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महापालिकेच्या दिव्याखाली मात्र अंधार आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा पालिकेने अद्याप बसविलेली नाही़ याची गंभीर दखल घेऊन शाळेतील आपत्कालिन यंत्रणेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण समितीने आज प्रशासनाला दिले़ पालिकेच्या ११०० शाळांमध्ये साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चेन्नई येथील एका शाळेतील आगीच्या दुर्घटनेत निष्पाप विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सर्व शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते़ मात्र, या घटनेच्या १२ वर्षांनंतरही अद्याप पालिकेने आपल्या शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा उभारलेली नाही़ त्याचबरोबर, आपत्कालिन आराखडाही तयार नाही़ शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे शिक्षण समितीचे याकडे लक्ष वेधले़ याबाबत स्पष्टीकरण देताना आपत्कालिन परिस्थितीमध्ये काय करावे? याचे धडे मुख्याध्यापकांना एका कार्यशाळेतून देण्यात आले आहेत़ शाळांचे क्षेत्रफळ बघून आपत्कालिन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत आहे़ पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यापूर्वी हा आराखडा तयार असेल, अशी हमी उपायुक्त रणजित ढाकणे यांनी शिक्षण समितीला दिली़ (प्रतिनिधी)शिक्षण खात्याचे पितळ उघडेपालिका शाळांमध्ये आपत्कालिन सुरक्षेसाठी माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे़, तसेच मॉकड्रीलही घेण्यात येत असल्याचा दावा उपशिक्षण अधिकारी जिवबा केळुस्कर यांनी केला़ मात्र, त्यांचा दावा खोडून काढत गेल्या पाच वर्षांमध्ये असे मॉकड्रील झालेली नाहीत, असे भाजपाच्या राजेश्री शिरवाडकर यांनी निदर्शनास आणले़ त्यावर दीड महिन्यांमध्ये मॉकड्रील पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले़