शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

भिंत पडल्याने शाळा राहिली बंद

By admin | Updated: July 28, 2016 17:55 IST

भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत पडल्याच्या घटनेचा विद्यार्थी व पालकांनी धसका घेतला असून यामुळे दुसऱ्या दिवशी कोणीच विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा बंद राहिली.

भडगाव : भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत पडल्याच्या घटनेचा विद्यार्थी व पालकांनी धसका घेतला असून यामुळे दुसऱ्या दिवशी कोणीच विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा बंद राहिली.  या घटनेत तीन-चार विद्यार्थी जखमी झाले होते. घटनेमुळे विद्यार्थी वर्ग कमालीचा घाबरला असून २८ रोजी शाळेत एकही विद्यार्थी आला नाही. यामुळे आता शाळा कधी सुरु होईल असा प्रश्न उभा राहिला आहे.

अनेक जण मदतीस सरसावलेभिंत कोसळताच स्थानिक नागरिकांसह कजगावचेही अनेक जण मदतीसाठी धावून गेले होते. दरम्यान मातीचा ढिगार उपसण्याची काम सुरु झाले आहे. सरपंच तुकाराम जाधव, उपसरपंच राजेंद्र धनगर, सदस्य सुनील महाजन, उमेश देशमुख, मंगा नाईक, गुलाब पाटील, जिभाऊ महाजन, भिकन महाजन, पुंजू महाजन, बाबूलाल कोळी, हनुमान कोळी, शालिक पाटील, भैया पाटील, कौतिक धनगर, अर्जुन धनगर, धुडकू महाजन, संजय धनगर, नामदेव पाटील, गंभीर महाजन, दगडू महाजन, पंडित महाजन, अशोक पाटील, दत्तू धनगर, राजू कोळी आदींनी मदत केली. जेसीबी मशीनही घटनास्थळी आणले. कजगावचे दिनेश पाटील, कमलचंद धाडीवाल, छोटू जैन आदींनीही यासाठी सहकार्य केले.

अधिकाऱ्यांच्या भेटीघटना घटताच अनेक अधिकाऱ्यांनी भेट दिली. २८ रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ.देवांग, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा इंजिनिअर मृदुल अहिरराव, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.आर.कुमावत, कजगाव केंद्र प्रमुख कोमलसिंग पाटील, भडगाव पं.स. माजी उपसभापती संभाजी भोसले यांनीही भेट देवून पाहणी केली. शिक्षणाधिकारी यांनी यावेळी पर्यायी व्यवस्था तातडीने करण्याच्या सूचना दिल्याग्रा. पं. कार्यालय आणि

अंगणवाड्याही धोकादायक स्थितीत१९६२ ते ६५ मध्ये बांधलेल्या या शाळेची इमारत जीर्ण झाली असून सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. तसेच भोरटेक ग्रा.पं.ची इमारत देखील त्याच काळात उभारली गेली. ती देखील जीर्ण झाली आहे. या इमारतीवर वरुन प्लास्टीक टाकण्यात आले आहे. या इमारतीत ग्रा.पं. कार्यालय, तलाठी कार्यालय कार्यरत आहे. या इमारतीत नेहमीच मोठी वर्दळ असते. तसेच याच समोरील अंगणवाडी अवस्था, ग्रुप ग्रा.पं. अंतर्गत असलेल्या उमरखेड या आदिवासी वस्तीतील अंगणवाडीची अवस्था, ग्रा.पं.च्या जलकुंभाची अवस्था अतिशय पडकी झाली असून या ठिकाणीही मोठी दुर्घटना होऊ शकते. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सरपंचांकडून अनेकदा निवेदनभोरटेक येथील जलकुंभाबाबत सरपंच तुकाराम जाधव यांनी २५ मार्च २०१६ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. जळगाव यांना पत्र देवून हा जलकुंभ पाडण्यास सांगितले आहे. परंतु अनेकदा पाठपुरावा करुनही कार्यवाही झाली नाही. १४ डिसेंबर २०१५ रोजी गटविकास अधिकारी भडगाव यांना पत्र देवून जीर्ण झालेल्या अंगणवाडीमुळे नवीन अंगणवाडी मिळविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. २३ डिसेंबर १५ रोजी गटविकास अधिकारी भडगाव यांना पत्र देवून भोरटेक ग्रा.पं.साठी नवीन इमारत मंजुरीसाठी पत्र दिले आहे. कारण ग्रा.पं. इमारतही जीर्ण झाली आहे.. २७ रोजीच्या घटनेमुळे पाल्य व पालक दोघेही भयभीत झाले आहे. गाव लहान असून शाळा भरवण्यासाठी जागा उपलब्ध नाही भवानी माता मंदिराजवळील चावडीत दोन वर्गाचे विद्यार्थी तर वि.का.सोसायटीच्या इमारतीत दोन वर्ग तूर्त बसवण्याची व्यवस्था झाली आहे. जि.प.ने शाळेच्या प्रांगणात त्वरित टेंट उभारुन शाळेची तात्पुरती व्यवस्था करुन नवीन इमारतीचे काम युध्दपातळीवर सुरु करावे. टेंटचे काम १५ दिवसात मार्गी न लागल्यास शाळा बंद करु -तुकाराम जाधव, सरपंच