शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

शालेय साहित्य १० ते २० टक्क्यांनी महागले

By admin | Updated: June 11, 2016 02:46 IST

आठवडाभरातच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असल्याने शालेय वस्तू खरेदीकरिता बाजारपेठा सजल्या आहेत.

नवी मुंबई : आठवडाभरातच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असल्याने शालेय वस्तू खरेदीकरिता बाजारपेठा सजल्या आहेत. शालेय साहित्यालाही महागाईची झळ बसली असून सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये दहा ते वीस टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येते. छोटा भीम, बार्बी, डोरेमॉन, शिनचॅन, बालगणेशा, हनुमान, बेनटेन आदी रंगीबेरंगी कार्टूनचे चित्र रेखाटलेल्या वस्तूंना वाढती मागणी आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी वह्या, पुस्तके, गणवेश, कंपास बॉक्स, दप्तर, पाण्याची बाटली या वस्तू खरेदीची लगबग बाजारपेठांमध्ये पहायला मिळत आहे. दोनशे रुपयांपासून ते तीन हजारपर्यंतचे दप्तर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. मुलांना दप्तराचे ओझे वाटू नये याकरिता वजनाने हलके तसेच चाके असलेल्या बॅगेलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाळेच्या दप्तराचा पावसापासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र कव्हरही विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची किंमत १०० ते ३०० रुपये इतकी आहे. शहरातील दुकानांमध्ये शाळेचे दप्तर, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, कंपास बॉक्स यांचा एकत्रित संचही विक्रीसाठी उपलब्ध असून हा संपूर्ण संच आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पाण्याच्या बाटल्यांच्याही किमती वाढल्या असून ६० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतच्या बाटल्या बाजारात उपलब्ध आहेत. आडव्या बॅग हद्दपार झाल्या असून सॅकला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पहायला मिळते. अनेक शाळांनी स्वत: शालेय वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या असून पालकांनी शाळेतूनच वस्तू खरेदी करण्याचा आग्रह केला जातो. नामांकित शाळांमध्ये विशेष दुकानातून खरेदीची अट घातल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अमुकअमुक दुकानातूनच गणवेश खरेदी करण्याचा अट्टाहास केल्याने पालकांना खिसा खाली करावा लागत आहे. (प्रतिनिधी)