शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या परीक्षेतही ‘सैराट झालं जी...’

By admin | Updated: August 11, 2016 03:26 IST

‘सैराट’ मधील परशा-आर्ची ही जोडी केवळ तरुणाईच्या गळ््यातील ताईत बनली नाही, तर शाळकरी मुली-मुलांवरही या जोडीने जादू केली आहे.

पुणे : ‘सैराट’ मधील परशा-आर्ची ही जोडी केवळ तरुणाईच्या गळ््यातील ताईत बनली नाही, तर शाळकरी मुली-मुलांवरही या जोडीने जादू केली आहे. घरात, शाळेच्या आवारात ‘सैराट’ डायलॉग बोलणाऱ्या या पोरांनी आता परीक्षेतही परशा-आर्चीला नेऊन ठेवले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या पायाभूत चाचणीत एका विद्यार्थ्याने चित्रावरून या दोघांंची गोष्टच लिहिली आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्याच्या या कल्पनाशक्तीचे कौतुक करीत पाचपैकी चार गुण दिले आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत मागील वर्षीपासून दुसरी ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी पायाभूत चाचणी घेतली जात आहे. या वर्षी दि. २८ व २९ जुलै रोजी ही परीक्षा राज्यभरातील १ कोटी ६० लाख विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांमधील तर्क, अनुमान, आकलनक्षमतेला वाव देण्याच्या मुख्य उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत अभ्यासक्रम किंवा धड्याखालील एक प्रश्न नसतो. त्यामुळे विविध आकृत्या, चित्र, सारांश, आकडेमोड देऊन विद्यार्थ्यांनी त्यावरून उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक वर्गाच्या क्षमता त्या वयानुसार निश्चित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे चाचणीमध्ये प्रश्न विचारले जातात.नुकत्याच झालेल्या या परीक्षेत चौथीच्या वर्गासाठी मराठी विषयाच्या चाचणीत एक चित्र देण्यात आले होते. या चित्रामध्ये एका मुलीसह पाच विद्यार्थी पावसात रस्त्याने जात असल्याचे दाखविले होते. त्यातील एक जण रस्त्यात पडलेला दाखविला असून मुलगी छत्री घेऊन त्याच्या बाजूला उभी आहे, तर अन्य दोघे जण एकाच छत्रीत त्यांच्याजवळून चालले आहे. एक जण एकटाच चाललेला चित्रात दिसतो. हे चित्र पाहून त्यावर गोष्ट लिहिण्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी पाच गुण देण्यात आले होते. एका विद्यार्थ्याने गोष्ट लिहिताना या चित्राला थेट ‘सैराट’मय करून टाकले. खाली पडलेला परशा, त्याच्या शेजारी उभी असलेली आर्ची आणि एका छत्रीत असलेल्या दोघांचे लंगड्या व सलीम असे नामकरण करून टाकले, तर पाचव्या विद्यार्थ्याला ‘स्वराज’ हे काल्पनिक नाव दिले आहे. त्यानंतर परशा व आर्चीमधला काल्पनिक संवाद लिहून गोष्टीचे ‘हॅप्पी एंडिंग’ केले आहे. पायाभूत चाचणीतील गोष्ट...शाळेची घंटी वाजली. शाळा सुटली. परशा, आर्ची, स्वराज, लंगड्या, सलीम ही सर्व जणे निघाली. मधल्या वाटेत आली. जोराचा मुसळधार पाऊस आला. स्वराज एकटाच होता.आर्ची व परशा ही दोघे एका छत्रीत होती. सलीम व लंगड्या एका छत्रीत होती. परशा घसरून पडला.परशा : मला उचला व आर्चीने त्याला उठवले. आर्ची : परशा लागलं आहे का.परशा : हो थोडंसं लागलं.आर्ची : तू घरी जा व कपडे बदलून ये. मी तुला औषध लावते. आर्ची परशाला औषध लावते व सर्व जणे आपापल्या घरी जातात.