शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

शाळांच्या परीक्षेतही ‘सैराट झालं जी...’

By admin | Updated: August 11, 2016 03:26 IST

‘सैराट’ मधील परशा-आर्ची ही जोडी केवळ तरुणाईच्या गळ््यातील ताईत बनली नाही, तर शाळकरी मुली-मुलांवरही या जोडीने जादू केली आहे.

पुणे : ‘सैराट’ मधील परशा-आर्ची ही जोडी केवळ तरुणाईच्या गळ््यातील ताईत बनली नाही, तर शाळकरी मुली-मुलांवरही या जोडीने जादू केली आहे. घरात, शाळेच्या आवारात ‘सैराट’ डायलॉग बोलणाऱ्या या पोरांनी आता परीक्षेतही परशा-आर्चीला नेऊन ठेवले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या पायाभूत चाचणीत एका विद्यार्थ्याने चित्रावरून या दोघांंची गोष्टच लिहिली आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्याच्या या कल्पनाशक्तीचे कौतुक करीत पाचपैकी चार गुण दिले आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत मागील वर्षीपासून दुसरी ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी पायाभूत चाचणी घेतली जात आहे. या वर्षी दि. २८ व २९ जुलै रोजी ही परीक्षा राज्यभरातील १ कोटी ६० लाख विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांमधील तर्क, अनुमान, आकलनक्षमतेला वाव देण्याच्या मुख्य उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत अभ्यासक्रम किंवा धड्याखालील एक प्रश्न नसतो. त्यामुळे विविध आकृत्या, चित्र, सारांश, आकडेमोड देऊन विद्यार्थ्यांनी त्यावरून उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक वर्गाच्या क्षमता त्या वयानुसार निश्चित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे चाचणीमध्ये प्रश्न विचारले जातात.नुकत्याच झालेल्या या परीक्षेत चौथीच्या वर्गासाठी मराठी विषयाच्या चाचणीत एक चित्र देण्यात आले होते. या चित्रामध्ये एका मुलीसह पाच विद्यार्थी पावसात रस्त्याने जात असल्याचे दाखविले होते. त्यातील एक जण रस्त्यात पडलेला दाखविला असून मुलगी छत्री घेऊन त्याच्या बाजूला उभी आहे, तर अन्य दोघे जण एकाच छत्रीत त्यांच्याजवळून चालले आहे. एक जण एकटाच चाललेला चित्रात दिसतो. हे चित्र पाहून त्यावर गोष्ट लिहिण्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी पाच गुण देण्यात आले होते. एका विद्यार्थ्याने गोष्ट लिहिताना या चित्राला थेट ‘सैराट’मय करून टाकले. खाली पडलेला परशा, त्याच्या शेजारी उभी असलेली आर्ची आणि एका छत्रीत असलेल्या दोघांचे लंगड्या व सलीम असे नामकरण करून टाकले, तर पाचव्या विद्यार्थ्याला ‘स्वराज’ हे काल्पनिक नाव दिले आहे. त्यानंतर परशा व आर्चीमधला काल्पनिक संवाद लिहून गोष्टीचे ‘हॅप्पी एंडिंग’ केले आहे. पायाभूत चाचणीतील गोष्ट...शाळेची घंटी वाजली. शाळा सुटली. परशा, आर्ची, स्वराज, लंगड्या, सलीम ही सर्व जणे निघाली. मधल्या वाटेत आली. जोराचा मुसळधार पाऊस आला. स्वराज एकटाच होता.आर्ची व परशा ही दोघे एका छत्रीत होती. सलीम व लंगड्या एका छत्रीत होती. परशा घसरून पडला.परशा : मला उचला व आर्चीने त्याला उठवले. आर्ची : परशा लागलं आहे का.परशा : हो थोडंसं लागलं.आर्ची : तू घरी जा व कपडे बदलून ये. मी तुला औषध लावते. आर्ची परशाला औषध लावते व सर्व जणे आपापल्या घरी जातात.