शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शाळा संचालकाला अटक

By admin | Updated: July 18, 2014 01:00 IST

नोकरीच्या आशेने कर्जाने घेतलेली साडेसहा लाखांची रक्कम गमावली. पत्नीही सोडून निघून गेली. परिणामी वैफल्यग्रस्त होऊन एका तरुणाने आत्महत्या केली. या दुर्दैवी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त

नोकरीसाठी लाखो गमावले : तरुणाचे आत्महत्या प्रकरणनागपूर : नोकरीच्या आशेने कर्जाने घेतलेली साडेसहा लाखांची रक्कम गमावली. पत्नीही सोडून निघून गेली. परिणामी वैफल्यग्रस्त होऊन एका तरुणाने आत्महत्या केली. या दुर्दैवी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी एका शाळा संचालकाला अटक करून, त्याचा १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. प्रदीप श्यामराव कडू रा. नंदनवन असे आरोपीचे नाव असून, तो नरेंद्रनगर येथील हरिभाऊ वानखेडे शिक्षण संस्थेचा काही काळ संचालक होता. नीलेश भोजराज कुकडे असे मृताचे नाव असून, तो चिटणवीसनगर येथील रहिवासी होता. या प्रकरणाची हकीकत अशी की, प्रदीप कडू संचालक असलेल्या शाळेत त्याची पत्नी वैशाली प्रदीप कडू ही शिक्षिका होती. या दोघांनी नीलेश आणि त्याच्या वडिलांत विश्वास निर्माण करून ६ लाख ५० हजार रुपये दिल्यास नीलेश याला आपल्या शाळेत लिपिकाची नोकरी देतो, असे आमिष दाखविले होते. या बापलेकाने कर्ज काढून २१ नोव्हेंबर २००९ रोजी ४ लाख रुपये दिले. त्यानंतर २ लाख ५० हजार रुपये दिले. संपूर्ण रक्कम घेऊन जागा रिक्त नसल्याचा बहाणा करीत दिवाळीपर्यंत थांबा, असे त्याला म्हटले होते. नीलेश नोकरीसाठी त्यांना वारंवार भेटत होता. त्यानंतर त्याने पैसे परत मागण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे या दाम्पत्याने शक्कल लढवून त्याला बिनपगारी नोकरीवर रुजू करून घेतले होते. पुढे हे दाम्पत्या त्याला ‘अप्रुव्हल’ आल्यानंतर पगार सुरू करू, असे आमिष दाखवीत राहिले. आज-उद्या पगार मिळेल या आशेने त्याने यवतमाळच्या सीमा नावाच्या एका तरुणीसोबत लग्न केले होते. परंतु नीलेश घरी पगार आणत नसल्याने कफल्लक आयुष्य जगणे तिच्या नशिबी आले होते. मित्रांकडून कर्ज घेऊनच तो आपला संसार चालवीत होता. परिणामी तीही त्याला सोडून निघून गेली होती. (प्रतिनिधी)अन् शाळाही विकलीपुढे या संचालकाने आपली शाळा ठाकूर नावाच्या एका व्यक्तीला विकून टाकली. त्यामुळे या नव्या संचालकाने बिनपगारी नीलेशला शाळेतून काढून टाकले होते. नीलेशने पुन्हा कडू दाम्पत्याची वारंवार भेट घेऊन आपले पैसे परत मागण्याचा तकादा लावला होता. ‘तू आम्हाला गैरकायदेशीर कामासाठी पैसे दिले आहे, आम्ही तुलाच उलटे फसवू’, अशी धमकी या दाम्पत्याने नीलेशला दिली होती. पैसे गमावले, पत्नीही गमावली, उलट आपल्यावरच कारवाई होईल म्हणून नीलेश वैफल्यग्रस्त झाला होता. त्याने आपली कर्मकहाणी लिहून ६ जुलै २०१४ रोजी स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नीलेशचा भाऊ राजेश भोजराज कुकडे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी प्रदीप कडू, त्याची पत्नी वैशाली कडू आणि नीलेशची पत्नी सीमा यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रदीपला अटक केली.