शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

पाचोराबारीत भरली पाच दिवसानंतर शाळा

By admin | Updated: July 14, 2016 20:10 IST

ढगफुटीच्या घटनेने जलमय झालेल्या तालुक्यातील पाचोराबारी या गावातील जिल्हा परिषदेची शाळा अखेर पाच दिवसानंतर गुरुवारपासून सुरू झाली आहे.

२४ विद्यार्थ्यांची उपस्थिती : शिक्षकांचे प्रयत्न

नंदुरबार : ढगफुटीच्या घटनेने जलमय झालेल्या तालुक्यातील पाचोराबारी या गावातील जिल्हा परिषदेची शाळा अखेर पाच दिवसानंतर गुरुवारपासून सुरू झाली आहे.पाचोराबारी या गावात रविवारी मध्यरात्री अचानक जलप्रलय आल्याने पूर्ण गाव पाण्याखाली आले होते. अनेक घरे वाहून गेल्याने गावात भीतीचे वातावरण होते. गावातील जिल्हा परिषदेची शाळादेखील पाण्याखाली आली होती. पूर ओसरल्यानंतर शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शाळेतील चिखल व पटांगणातील दुर्गंधी दूर केली. तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यांना यश आले. तथापि, गावात भीतीचे वातावरण कायम असल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास धजावत होते. त्यामुळे बुधवारी शिक्षकांनी गावात फिरून जे जे विद्यार्थी भेटतील किंवा त्यांच्या पालकांना शाळा सुरू होणार असल्याची सूचना दिली. काही विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात बोलवून त्यांना बिस्कीट वाटप केले व गुरुवारपासून शाळा सुरू केली.यासंदर्भात मुख्याध्यापक मेघराज पेंढारकर व शिक्षिका पार्वताबाई वळवी यांनी सांगितले की, गुरुवारपासून शाळा सुरळीत केली. विद्यार्थ्यांमध्ये भीती असली तरी ती दूर करून त्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेच्या पटावर एकूण १११ विद्यार्थी असून त्यापैकी आज २४ विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना पोषण आहारही देण्यात आला. हळूहळू उपस्थिती वाढेल, असे त्यांनी सांगितले.