शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळा प्रशासन उदासीन

By admin | Updated: July 28, 2016 01:13 IST

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने स्वच्छ भारत विद्यालय पुरस्कार स्पर्धा या वर्षीपासून सुरू केली आहे.

- दिगंबर जवादे, गडचिरोली

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने स्वच्छ भारत विद्यालय पुरस्कार स्पर्धा या वर्षीपासून सुरू केली आहे. मात्र राज्यभरातील बहुतांश शाळा प्रशासन या स्पर्धेबाबत उदासीन असून २६ जुलैपर्यंत ६४ हजार शाळांपैकी केवळ ३ हजार शाळांनीच नोंदणी केली आहे.विद्यार्थ्यांचे जीवन आरोग्यसंपन्न व्हावे, त्यांना स्वच्छतेची सवय लागावी, या दृष्टीने केंद्र सरकारतर्फे राज्यात ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने सर्व शाळांसाठी ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १ ते ३१ जुलै या कालावधीत शाळांना आॅनलाइन नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. शिक्षण विभागाकडील आकडेवारीनुसार राज्यभरात सुमारे ६४ हजार ४४९ शाळा आहेत. यातील किमान निम्म्या शाळा सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र २६ जुलैपर्यंत राज्यभरातील केवळ ३ हजार ११२ शाळांनीच नोंदणी केली आहे. त्यातही विदर्भातील शाळांनी अत्यंत कमी प्रमाणात नोंदणी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ९०० शाळांनी नोंदणी केली आहे.रंगानुसार श्रेणी देणार...नोंदणीदरम्यान शाळेमध्ये पाणी, शौचालय, हॅन्डवॉश स्टेशन, शाळेचे व्यवस्थापन व शाळेचा फोटो अपलोड करायचा आहे. ही नोंदणी मोबाइलवरही करता येणार आहे. शाळेकडे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधानुसार संबंधित शाळेला हिरवा, निळा, पिवळा, नारंगी व लाल रंगानुसार श्रेणी देण्यात येणार आहे.शिक्षण आयुक्तांनी व्यक्त केली नाराजीतब्बल २६ दिवसांचा कालावधी उलटूनही केवळ ३ टक्के शाळांनीच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. नोंदणी करण्यासाठी आणखी पाच दिवस शिल्लक असल्याने जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.