शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

साडेतीन लाख अल्पसंख्याक विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती वांदयात

By admin | Updated: October 20, 2016 16:25 IST

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीत यंदा मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अविनाश साबापुरे

यवतमाळ, दि. २० - अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीत यंदा मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा फटका राज्यातील तब्बल ३ लाख ८७ हजार १२० विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने यावर पावले न उचलल्यास हे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रकमेला मूकणार आहेत.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने २००८ पासून प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्यात दरवर्षी विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत (रिनीव्हल) करावी लागते. २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्रातील ७ लाख १७ हजार ८९६ विद्यार्थ्यांच्या माहितीचे नूतनीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. यात मुस्लिम समाजातील ४ लाख ७१ हजार १९५ विद्यार्थी, बौद्ध समाजातील २ लाख १२ हजार ४२६, जैन समाजातील १९ हजार ८१८, ख्रिश्चन ९ हजार ८१८, शिख ३ हजार ९९१ आणि फारसी समाजातील ६४८ विद्यार्थी या शैक्षणिक सत्रात शिष्यवृत्तीकरिता पात्र होते.

मात्र, या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात बऱ्याच जिल्ह्यांच्या पातळीवर ढिसाळपणा झाला. परिणामत: केवळ ३ लाख ३० हजार ७७६ विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडून मंजूर करण्यात आले आहे. आता उर्वरित ३ लाख ८७ हजार १२० अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१५-१६ पासून या योजनेत काही बदल झाले. यंदा प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ह्यनॅशनल स्कॉलरशिप पोर्टलह्णचा उपयोग करण्यात आला. परंतु, सुरूवातीपासूनच त्यावर डेटा भरताना किंवा कागदपत्रे अपलोड करताना शाळांना सतत तांत्रिक अडचणी आल्या. या अडचणींचे निराकरण होत नसल्याने शासनाने पोर्टलवरील आॅफलाईन डेटा शिटमध्ये (एक्सल शिट) माहिती भरून सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार, राज्यातील शाळांनी विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती एक्सल शिटमध्ये भरून शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयाकडे दाखल केली होती. परंतु, आता संचालनालयाकडून जाहीर झालेल्या यादीत हजारो शाळा आणि लाखो विद्यार्थ्यांची नावेच नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी आणि त्यांची माहिती भरणारे शिक्षक पेचात पडले आहेत.राज्यभरातील विद्यार्थ्यांना फटकाविदर्भाप्रमाणेच राज्यातील सर्वच जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत फटका बसला आहे. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर (प्राप्त अर्ज) १२५३० (मंजूर अर्ज) ६९७४, औरंगाबाद : ५७४६८ : १८६३५, बिड : ३१७०७ : १५६२५, धुळे : ५१३७ : १७८३, हिंगोली : २६४४४ : १३८२६, जळगाव : ३२४७२ : २०१४१, जालना : २६२५७ : १३२९४, कोल्हापूर : १४५३५ : ७८८६, लातूर : २९७६१ : ९६७३, मुंबई : २२०७ : १२८, मुंबई सब अर्बन : १०९९ : २२८, नांदेड : ४५९१५ : १८५६५, नंदूरबार : ४१८२ : २२३८, नाशिक : २३५९७ : १५६७०, उस्मानाबाद : ९१९५ : २२४४, परभणी : २६६९४ : ५५२०, पुणे : ४३९६ : ६०३, रायगड : ३५८२ : १५९८, रत्नागिरी : ११९१८ : ५०५९, सांगली : ९९०५ : ४५६३, सातारा : २२०० : ४१३, सिंधुदुर्ग : २८७३ : १५९७, सोलापूर : २११७५ : ११२४७, ठाणे : ५७८६ : ११५७ विदर्भातील विद्यार्थ्यांची हानीजिल्हाप्राप्त अर्जमंजूर अर्ज अकोला७१८२९४०२४६अमरावती६८७९९२५२५१यवतमाळ३४७७६२०१८७नागपूर७१८७२६३४भंडारा२०३५१३२८बुलडाणा८५६९९४४०५३चंद्रपूर६१८०२४०१गडचिरोली४३९१७४गोंदिया६७८१४३वर्धा४७२६१९११वाशीम२५१४२१४२५९नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आल्यानेच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. मंजूर अर्जांबाबत आम्ही माहिती अधिकारातून मिळवलेली माहिती धक्कादायक आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून ज्या विद्यार्थ्यांची माहिती संचालनालयास सादर करण्यात आली, तसेच तांत्रिक अडचणीमुळे सादर होऊ शकली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना या सत्राची शिष्यवृत्ती मिळावी. त्यांना त्वरित अप्लििकेशन आयडी दिल्यास २०१६-१७ साठी ते अर्ज करू शकतील. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.- रजाउल्लाह खान, सचिव, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर