शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

शिष्यवृतीचे खाते गोठविले

By admin | Updated: July 13, 2014 01:04 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होऊ नये यासाठी,

राष्ट्रीयीकृत बँकांची हेकेखोरी : यवतमाळ जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न रुपेश उत्तरवार - यवतमाळप्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होऊ नये यासाठी, रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश होते. यानुसार विद्यार्थ्यांनी झिरोे बॅलेंसवर काढलेले खाते राष्ट्रीयीकृत बँकांनी गोठविले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अडचणीत सापडला आहे.शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाने शिष्यवृत्ती जाहीर केली. यामध्ये प्रत्येक घटकांचा विचार करण्यात आला. शिष्यवृत्तीचे वाटप करताना कुठेही गैरप्रकार होऊ नये आणि व्यवस्थापनाकडून त्याचा केला जाऊ नये म्हणून थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विद्यार्थ्यांना बँक खाते काढण्याच्या सूचना महाविद्यालयांनी केल्या.विद्यार्थ्यांचे खाते झिरो बॅलेंसवर काढण्याच्या सूचना होेत्या. यासाठी प्रारंभी राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दिला. पाठपुराव्यानंतर बँका यासाठी तयार झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला. आता मात्र स्टेट बँकेने ही खाती गोठविली आहे. सहा महिन्यांपासून कुठलाच व्यवहार नसल्याचे कारण पुढे करीत खाते बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला. हा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पाठविण्यात आला असता बँकेत विद्यार्थ्यांचे खातेच नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे शिष्यवृत्ती द्यायची कशी हा गंभीर प्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे. विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दोन कोटी ३० लाखांपेक्षा अधिक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र राष्ट्रीयीकृत बँकेच्या अफलातून निर्णयाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, बँकांच्या या आडमुठ्या धोरणाविरुद्ध आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा मुख्याध्यापक कृती समिती अध्यक्ष विजय खरोडे यांनी दिला आहे.