शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राज्यात क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा

By admin | Updated: January 22, 2015 00:55 IST

बालरुग्णांसाठी आवश्यक असलेली पीसी-१३ आणि पीसी १४ औषधांसाठी धावाधाव.

सचिन राऊत/ अकोला - क्षयरोग या गंभीर आजाराची लागण असलेल्या बालरुग्णांना अत्यंत आवश्यक असलेल्या पीसी-१३ आणि पीसी १४ या दोन नमुन्यांच्या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

         क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण कमी करून क्षयरोगाचा निपटारा करण्यासाठी राज्य शासनाकडून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मात्र योग्य त्या औषधांची कमी असल्याने या कार्यक्रमाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णांना औषधी देताना त्यांचे वजन आधी करण्यात येते. क्षयरुग्णांची वजन गटानुसार तपासणी करून त्यांना औषधी देण्यात येतात. यामध्ये ६ ते १0 किलो वजन गटाच्या बालकांना प्रोडक्ट कोड (पीसी) क्रमांक १३ आणि ११ ते १७ किलो वजन असलेल्या बालरुग्णांना प्रोडक्ट कोड (पीसी) क्रमांक १४ देण्यात येतो. क्षयरोग असलेल्या बालरुग्णांना पहिल्या डोसमध्ये २४ गोळय़ा असलेल्या औषधांचे पाकीट देण्यात येते. यामधील एका पाकीटमध्ये ४ गोळय़ा असतात. या गोळय़ा बालरुग्णांना एक दिवस आड देण्यात येतात. पहिला डोस पूर्ण झाल्यानंतर तपासणी करून दुसर्‍या टप्प्यात ३ गोळय़ांचा समावेश असलेल्या १८ गोळय़ांचे पाकीट रुग्णांना देण्यात येते. या १८ गोळय़ांचे पाकीट रुग्णांना दर दिवसाआड देण्यात येतात. या औषधांचे डोस पूर्ण झाल्यानंतर बालरुग्णांना टॉनिकची गोळी देण्यात येते. क्षयरोग असलेल्या बालरुग्णांसाठीच्या या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाल्याने बालरुग्णांना औषधांसाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, या औषधांचा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा, अशी मागणी बालरुग्णांनी केली आहे.

         क्षयरोगाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या गोळय़ांची काही प्रमाणात कमतरता असली तरी रुग्णांना या गोळय़ा उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुबंई स्थित औषध निर्माण अधिकारी एस. जानुनकर यांनी स्पष्ट केले.

*खासगी दवाखाने, औषध दुकानांमध्ये गोळय़ाच नाहीत क्षयरोग असलेल्या बालरुग्णांना देण्यात येत असलेल्या गोळय़ांचा डोस खासगी रुग्णालय किंवा औषध दुकानांमध्ये मिळत नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. या औषधी शासकीय रुग्णालयांमध्येच मिळत असल्याने रुग्णांना दुसरा पर्याय नाही. या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने बालरुग्णांना मोठय़ा अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे.