शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

देशी कपाशी बियाण्यांचा तुटवडा जाणवणार!

By admin | Updated: January 27, 2015 23:47 IST

शेतक-यांचा देशी कापूस वाणांच्या पेरणीकडे कल.

अकोला: राज्यातील कापूस उत्पादक प्रदेशांमधील शेतकर्‍यांचा कपाशीच्या देशी वाणांच्या पेरणीकडे कल वाढत आहे; पण यावर्षी खरीप हंगामादरम्यान अल्प पावसाचा फटका बसल्याने, पुढील हंगामात देशी कापूस वाणांच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे.काही वर्षांपूर्वी देशात कपाशीच्या बीटी बियाण्यांनी बाजारपेठ काबीज केली. अलीकडे मात्र पुन्हा एकदा कपाशीच्या देशी वाणांच्या लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, बाजारात या बियाण्यांना मागणी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कापसाचे सात वाण विकसित केले आहेत. सध्या या कृषी विद्यापीठाने उच्च घनता कापूस वाणांवर लक्ष केंद्रित केले असून, पावसाचा ताण सहन करू शकणार्‍या व कमी दिवसांत येणार्‍या वाणांचा त्यामध्ये समावेश आहे. या वाणांच्या बियाण्याची लागवड केल्यास, बीटी कपाशीच्या तोडीस तोड उत्पादन मिळत असून, पीक काढल्यांनतर रब्बी हंगामातील पीकही घेता येते.यावर्षी खरीप हंगामात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकूण १५0 हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादनासाठी कपाशीच्या देशी वाणाची पेरणी केली; पण पावसाला जुलैनंतर सुरुवात झाली आणि नंतरही पावसाचा मोठा खंड पडल्याने, पिकाला फटका बसला. त्यामुळे यावर्षी देशी वाणाच्या बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दीडशे हेक्टर क्षेत्रावर देशी वाण बिजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे. त्याला अल्प पावसाचा फटका बसल्याने, येत्या खरीप हंगामात कृषी विद्यापीठाच्या या कापूस वाणांचा तुटवडा काही प्रमाणात जाणवणार असल्याचे कृषीविद्यापीठाच्या बियाणे विभागाचे उप-संचालक डॉ. डी. टी. देशमुख यांनी स्पष्ट केले. *हे आहेत देशी वाण..डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एके-५, एके-७, एके-८, तसेच पीकेव्ही रजत, एकेएच-८८२८ आणि उच्च घनता एकेएच-0८१ हे देशी वाण विकसित केले आहेत. त्यांना मागणीही उत्तम आहे.