शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

ठाणे जिल्ह्यातील १०१२ बँकाना कॅशचा तुटवडा

By admin | Updated: May 10, 2017 03:12 IST

जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी , सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांमधील लाखो खातेदारांना रकमांचा

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी , सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांमधील लाखो खातेदारांना रकमांचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत आहे. याशिवाय जिल्ह्यातील १,१५० एटीएममध्ये ही पैशांचा तुटवडा आहे. उपलब्ध रकमेतून खातेदाराना गरजेपेक्षा कमी रक्कम दिली जात आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अधिक रकमेचा पुरवठा वेळीच करण्यासाठी सहकारमधील अग्रगण्य बँक असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) रिझर्व बँकेकडे तक्रार केली आहे. टीडीसीसीच्या १०१ शाखा आहेत. त्यांची रोज ५ ते ५० कोटींची उलाढाल आहे. पण केवळ दीड ते दोन कोटी रूपये दैनंदिन व्यवहारासाठी मिळत आहेत. तसेच जिल्ह्यातील एक हजार १२ बँकांच्या खातेदारांकडून रोज १६० कोटी रूपयांची उलाढाल होते. आठवड्याभरात एक हजार कोटींची उलाढाल होणाऱ्या या बँकाची आर्थिक गरजपूर्ण करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा विलंब लागत आहे. मार्च, एप्रिल महिन्यातील मंदी काही अंशी कमी झाल्यामुळे खातेदारांना मोठ्या रकमेची गरज भासत आहे. १६० कोटींच्या दैनंदिन उलाढालीपेक्षा सुमारे २०० ते २५० कोटींच्या रकमेची गरज ठाणे जिल्ह्याला भासत आहे. जिल्ह्यात असलेले ११५० एटीएममध्ये १०० कोटी रूपयांचा भरणा करूनही ग्राहकाना पुरेशी रक्कम मिळत नाही. ठाणे, मुंबईतील रक्कम राज्याच्या अन्य जिल्ह्यात जात आहे. यामुळे जिल्ह्यात आर्थिक टंचाई असल्याचा दुजोरा लिड बँकेच्या व्यवस्थापक राजन जोशी यांनी देखील दिला.