शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

नगरविकासाला आर्थिक समस्येचा फास

By admin | Updated: March 14, 2015 05:06 IST

राज्यातील नगरपरिषदांची आर्थिक स्थिती हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे़ राज्यात बोटावर मोजण्या एवढ्याच नगरपरिषदा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत़

प्रमोद आहेर, शिर्डीराज्यातील नगरपरिषदांची आर्थिक स्थिती हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे़ राज्यात बोटावर मोजण्या एवढ्याच नगरपरिषदा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत़ अनेक नगरपरिषदांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नही बिकट आहे़ शासनाने २००५ नंतर जकात अनुदान बंद करून सुरू केलेले सहाय्यक अनुदानही पुरेसे नसल्याने त्याचा फेरआढावा गरजेचा आहे़वसुली ही राज्यातील नगरपरिषदांची मोठी समस्या आहे़ त्यात विदर्भ व मराठवाड्यामध्ये तर वसुली डोकेदुखी बनली आहे़ सर्वच नगरपरिषदांच्या पाणीपुरवठा योजनांचा विद्युत आकार हा औद्योगिक दराने आकारला जातो़ त्या ऐवजी तो विद्युत मोटारींच्या क्षमतेवर अवलंबून असावा, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते़ पथदिव्यांची वीज थकबाकी हाही सार्वत्रिक प्रश्न आहे़ वित्त आयोगाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निधीत नुकतीच अकरा टक्के झालेली घसघशीत वाढ ही समाधानाची बाब असली तरी नगरपरिषदांना केवळ या ‘टॉनिक’वर अवलंबून राहाता येणार नाही़सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम होण्यासाठी सक्षम प्रशासन हीच पूर्वावश्यकता आहे़ त्याचे भान ठेवून त्यांचे सबलीकरण व नगर प्रशासनाची ग्राम प्रशासनाप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागेल़ यातच नागरीकरणाच्या यशाचे गुपित दडलेले आहे़