शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

घोटाळा ४०० नव्हे, चार हजार कोटींचा

By admin | Updated: May 17, 2017 01:49 IST

गेल्यावर्षी राज्यात झालेल्या तुरीच्या उत्पादनाच्या सरकारी माहितीमध्ये तब्बल १० लाख टनांची तफावत आहे. तूर साठेबाजीत सत्ताधाऱ्यांचाच संबंध असण्याचा संशय आहे

- लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : गेल्यावर्षी राज्यात झालेल्या तुरीच्या उत्पादनाच्या सरकारी माहितीमध्ये तब्बल १० लाख टनांची तफावत आहे. तूर साठेबाजीत सत्ताधाऱ्यांचाच संबंध असण्याचा संशय आहे. त्यात चारशे कोटींचा घोटाळा असल्याचे मुख्यमंत्री म्हणत असले, तरी हा घोटाळा चार हजार कोटींचा आहे. या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडून करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील (गिजवणेकर) यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यानिमित्त चव्हाण येथे आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. गतवर्षी ११ लाख ७१ हजार टन तुरीचे उत्पादन झाल्याची माहिती सरकारने १७ मार्च २०१७ रोजी विधानसभेत दिली. त्यानंतर २५ एप्रिल २०१७ रोजी २० लाख ५० हजार टन तुरीचे उत्पादन झाल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच हा गलथानपणा करण्यात आला आहे. अवघ्या पाच आठवड्यांत उत्पन्नाची आकडेवारी फिरवणारे हे कसले सरकार? असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. आघाडी सरकारच्या काळात डाळींची साठाबंदी करण्यास बंदी घातली होती. ‘युती’ने ती बंदी गेल्यावर्षी उठवली, त्यामुळेच ‘तुरी’चा घोटाळा झाला, अशी टिपणीही त्यांनी केली.पंतप्रधान मोदी यांनी उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्याठिकाणी कर्जमाफी दिली. उत्तरप्रदेशपेक्षाही महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट आहे. मुख्यमंत्र्यांना आपली मागणी तत्त्वत: मान्य असूनही ते निर्णय घ्यायला तयार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले. ‘महाड’मधून संघर्ष यात्रेचा चौथा टप्पाशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा ‘महाड’ येथून उद्या (बुधवारी) सुरू होईल. तेथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.भाजपाकडून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट केले जात आहे. कोणत्यातरी प्रकरणात अडकवून दहशत माजविण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. त्याविरोधात आता संघटित लढाई लढावी लागेल.- आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री