शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

बंद कारखान्यांवर ‘स्क्रॅप माफियां’ची वक्रदृष्टी

By admin | Updated: January 20, 2016 01:25 IST

सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात बंद कंपन्या सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे. कंपनी बंद पडली, की त्यावर स्क्रॅप माफियांची नजर पडत असून, तेथे दरोड्यांचे सत्र सुरू होते.

सुनील भांडवलकर,  कोरेगाव भीमासणसवाडी औद्योगिक क्षेत्रात बंद कंपन्या सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे. कंपनी बंद पडली, की त्यावर स्क्रॅप माफियांची नजर पडत असून, तेथे दरोड्यांचे सत्र सुरू होते. याचा नागरी वस्तीलाही धोका झाल्याची अनेक ताजी उदाहरणे आहेत. इस्पातसारखा ११७ एकरांत उभा राहिलेला कारखाना स्वप्नातही वाटले नव्हते बंद होईल. असे असतानाही हा पोलादनिर्मिती करणारा कारखाना कामगार व व्यवस्थापन यांच्या वेतनवाढ कराराच्या वादात २०००मध्ये बंद पडला. त्याबरोबरच या कारखान्यावर अवलंबून असलेले ३० ते ३५ छोटे-मोठे कारखानेही बंद पडल्याने हे व्यावसायिकही आर्थिक अडचणीत आले आहे. पंधरा वर्षांनंतरही कामगार व व्यवस्थापन यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयातही अद्याप मिटला नसून, कामगारांना अद्याप कसलीच नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने कामगारांचे हाल होऊन त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. कारखाना बंद पडल्याने कामगारवर्गात नैराश्याचे वातावरण आहे.बंद पडलेल्या कारखान्यांत उत्पादन बंद झाल्याने साधनसामग्रीचा कोणताच उपयोग नसल्याने त्यांच्या रूपाने स्थानिकांसह मुंबईच्या स्क्रॅप माफियांना सोन्याची खाणच सणसवाडी औद्योगिक परिसरात मिळाली व त्यातूनच पुढे स्क्रॅप माफियांत भडके उडू लागले. मात्र, दुसरीकडे हा कारखाना दरोडेखोरांसाठी सोन्याची खाण असल्याची परिस्थिती २००८पासून दरोड्यांच्या रूपाने पाहण्यास मिळत आहे. सुरुवातीला कारखान्यातील मोठमोठ्या मोटारींमधील तांबे, संपूर्ण कंपनीत पसरलेल्या केबलमधील तांब्याच्या वायर यांच्यावर दरोडेखोरांचे लक्ष होते. हा माल संपल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा थेट पोलादी बारकडे वळविला. कारखान्याचे दरोडेखोर राजरोस लचके तोडत असताना कारखान्यातील सुरक्षारक्षकांना काहीच मागमूस लागत नव्हता, हे मात्र नवलच म्हणावे लागेल. कारखान्यात आजपर्यंत जितका माल चोरीला गेला, त्याचा हिशेब केला असता तर त्या पैशातून कामगारांची देणी चुकती झाली असती. मात्र, व्यवस्थापनाने एकीकडे न्यायालयात धाव घेतली व दुसरीकडे चोरट्यांना रान मोकळे करून ठेवल्यासारखी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.या चोऱ्या कारखान्यातील सुरक्षारक्षकांच्या डोळ्यांदेखत होत असताना अनेक वेळा कारखान्यातील स्क्रॅप गाडीत भरून बाहेर गेल्यानंतरच सुरक्षारक्षक पोलिसांना खबर देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच या चोऱ्या रोखण्यात शिक्रापूर पोलिसांनाही अपयश येत आहे. बंद पडलेल्या फक्त इस्पात कारखान्याकडे ३ कोटी ३४ लाख ४३ हजार एवढी मोठी रक्कम थकबाकी असून, अद्याप त्याचा १६ वर्षांनंतरही कोणताच निर्णय न झाल्याने ग्रामपंचायतीचा एवढा कर बुडाल्यातच जमा आहे.