शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

बंद कारखान्यांवर ‘स्क्रॅप माफियां’ची वक्रदृष्टी

By admin | Updated: January 20, 2016 01:25 IST

सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात बंद कंपन्या सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे. कंपनी बंद पडली, की त्यावर स्क्रॅप माफियांची नजर पडत असून, तेथे दरोड्यांचे सत्र सुरू होते.

सुनील भांडवलकर,  कोरेगाव भीमासणसवाडी औद्योगिक क्षेत्रात बंद कंपन्या सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे. कंपनी बंद पडली, की त्यावर स्क्रॅप माफियांची नजर पडत असून, तेथे दरोड्यांचे सत्र सुरू होते. याचा नागरी वस्तीलाही धोका झाल्याची अनेक ताजी उदाहरणे आहेत. इस्पातसारखा ११७ एकरांत उभा राहिलेला कारखाना स्वप्नातही वाटले नव्हते बंद होईल. असे असतानाही हा पोलादनिर्मिती करणारा कारखाना कामगार व व्यवस्थापन यांच्या वेतनवाढ कराराच्या वादात २०००मध्ये बंद पडला. त्याबरोबरच या कारखान्यावर अवलंबून असलेले ३० ते ३५ छोटे-मोठे कारखानेही बंद पडल्याने हे व्यावसायिकही आर्थिक अडचणीत आले आहे. पंधरा वर्षांनंतरही कामगार व व्यवस्थापन यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयातही अद्याप मिटला नसून, कामगारांना अद्याप कसलीच नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने कामगारांचे हाल होऊन त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. कारखाना बंद पडल्याने कामगारवर्गात नैराश्याचे वातावरण आहे.बंद पडलेल्या कारखान्यांत उत्पादन बंद झाल्याने साधनसामग्रीचा कोणताच उपयोग नसल्याने त्यांच्या रूपाने स्थानिकांसह मुंबईच्या स्क्रॅप माफियांना सोन्याची खाणच सणसवाडी औद्योगिक परिसरात मिळाली व त्यातूनच पुढे स्क्रॅप माफियांत भडके उडू लागले. मात्र, दुसरीकडे हा कारखाना दरोडेखोरांसाठी सोन्याची खाण असल्याची परिस्थिती २००८पासून दरोड्यांच्या रूपाने पाहण्यास मिळत आहे. सुरुवातीला कारखान्यातील मोठमोठ्या मोटारींमधील तांबे, संपूर्ण कंपनीत पसरलेल्या केबलमधील तांब्याच्या वायर यांच्यावर दरोडेखोरांचे लक्ष होते. हा माल संपल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा थेट पोलादी बारकडे वळविला. कारखान्याचे दरोडेखोर राजरोस लचके तोडत असताना कारखान्यातील सुरक्षारक्षकांना काहीच मागमूस लागत नव्हता, हे मात्र नवलच म्हणावे लागेल. कारखान्यात आजपर्यंत जितका माल चोरीला गेला, त्याचा हिशेब केला असता तर त्या पैशातून कामगारांची देणी चुकती झाली असती. मात्र, व्यवस्थापनाने एकीकडे न्यायालयात धाव घेतली व दुसरीकडे चोरट्यांना रान मोकळे करून ठेवल्यासारखी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.या चोऱ्या कारखान्यातील सुरक्षारक्षकांच्या डोळ्यांदेखत होत असताना अनेक वेळा कारखान्यातील स्क्रॅप गाडीत भरून बाहेर गेल्यानंतरच सुरक्षारक्षक पोलिसांना खबर देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच या चोऱ्या रोखण्यात शिक्रापूर पोलिसांनाही अपयश येत आहे. बंद पडलेल्या फक्त इस्पात कारखान्याकडे ३ कोटी ३४ लाख ४३ हजार एवढी मोठी रक्कम थकबाकी असून, अद्याप त्याचा १६ वर्षांनंतरही कोणताच निर्णय न झाल्याने ग्रामपंचायतीचा एवढा कर बुडाल्यातच जमा आहे.