शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

‘एससी’च्या विद्यार्थ्यांचे थकले १४४ कोटी

By admin | Updated: October 19, 2016 00:57 IST

राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती व शिष्यवृत्तीचे १४४ कोटी रुपये थकले आहेत.

पुणे : अनुसूचित जातीतील (एससी) विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती व शिष्यवृत्तीचे १४४ कोटी रुपये थकले आहेत. राज्यभरातील ९० हजार लाभार्थी विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. शासनाकडून दर वर्षी आवश्यकतेनुसार तरतूद केली जात नसल्याने सातत्याने ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (ईबीसी) अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र ठरण्याची उत्पन्न मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा लाखो विद्यार्थ्यांना लाभ होणार असला, तरी शासनावरही मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. एकीकडे शासन असे निर्णय घेत असताना दुसरीकडे मात्र सध्या इतर विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या योजनांना वेळेवर निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचे चित्र आहे. केंद्र व राज्य सरकारकडून ‘एससी’ प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन योजना राबविल्या जातात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेमध्ये दोन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते. तर, राज्य शासनाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिक्षण व परीक्षा शुल्क प्रदान योजनेत दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण व परीक्षा शुल्क शासन भरते. लाभार्थी विद्यार्थ्याला यातील केवळ एकाच योजनेचा लाभ दिला जातो. दोन्ही योजनांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, सामाजिक न्याय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ अखेरीस दोन्ही योजनांचे अनुक्रमे सुमारे ११४ कोटी व ३० कोटी रुपये थकले आहेत. त्यापासून सुमारे ९० हजार लाभार्थी विद्यार्थी वंचित राहिले आहेत. मागील वर्षी अनुक्रमे ५ लाख ७९ हजार २७३ आणि ७३ हजार ५२५ विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाला आहे. दर वर्षी हा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यातुलनेत शासनाकडून पुरेशी तरतूद होत नाही. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये केंद्र सरकारच्या योजनेस सुमारे ७ लाख, तर दुसऱ्या योजनेसाठी सुमारे ९३ हजार विद्यार्थी पात्र ठरतील, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)>राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण व परीक्षा शुल्क प्रदान योजनेची स्थितीसामाजिक न्याय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ अखेरीस दोन्ही योजनांचे अनुक्रमे सुमारे ११४ कोटी व ३० कोटी रुपये थकले आहेत.सामाजिक न्याय विभागाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये दोन्ही योजनांसाठी राज्य सरकारकडे सुमारे दीड हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामध्ये प्रलंबित विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. प्रत्यक्षात शासनाकडून सुमारे १३४४ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणे अशक्य आहे. हा विचार करून शासनाकडे आणखी सुमारे १६३ कोटी रुपयांची मागणी केली आहे.>मागील तीन वर्षांतील लाभार्थी विद्यार्थी वर्षमंजूर तरतूद (हजारांत)खर्च (हजारांत)लाभार्थी२०१३-१४२०१५३६३२०१५३६३६००४१२०१४-१५२९३४५९६२९३४५९६८७०४९२०१५-१६३८५८३२०२४७३०५४७३५२५>मागील तीन वर्षांतील लाभार्थी विद्यार्थी वर्षमंजूर तरतूद (हजारांत)खर्च (हजारांत) लाभार्थी२०१३-१४७४४४४००७४४४४००६०३१६९२०१४-१५७८९३९८५७८९३९८५५६३८५४२०१५-१६९११००००८१०९८४२५७९२७३