शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सावित्री पूल दुर्घटना - बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक प्रशासनावर नाराज

By admin | Updated: August 10, 2016 04:42 IST

सावित्री पूल दुर्घटनेला मंगळवारी सात दिवस उलटून गेले तरी बेपत्ता १५ प्रवाशांचा शोध अद्यापही लागलेला नाही. शोध लवकर लागेल या आशेवर गेल्या आठ दिवसांपासून

महाड : सावित्री पूल दुर्घटनेला मंगळवारी सात दिवस उलटून गेले तरी बेपत्ता १५ प्रवाशांचा शोध अद्यापही लागलेला नाही. शोध लवकर लागेल या आशेवर गेल्या आठ दिवसांपासून दुर्घटनानजीकच्या मदत केंद्रात तळ ठोकून असलेल्या नातेवाइकांमध्ये प्रशासनाबाबत प्रचंड चीड निर्माण झाल्याचे दिसून आले. आम्ही कंटाळून कधी एकदा इथून जातोय याची जणू प्रशासन आता वाट पाहातेय, मात्र बेपत्ता प्रवाशांचा शोध लागल्याशिवाय या ठिकाणाहून हलणार नाही, असा इशाराच या संतप्त नातेवाइकांनी पत्रकारांशी बोलताना दिला. गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफ, नौदलाच्या जवानांकडून केले जात आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत करुनही तसेच नदी पातळी कमी होवून देखील वाहून गेलेल्या तिन्ही वाहनांचा छडा या यंत्रणेला लागू शकला नाही. याबद्दल या नातेवाइकांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही सर्व नातेवाईक रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांना भेटण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून वेळ मागत आहोत, मंत्र्यांबरोबर दुर्घटनेच्या ठिकाणी नियमित येत आहेत. मात्र त्यांनी या ठिकाणी मदत केंद्रात असलेल्या बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांना भेटून साधी विचारपूस देखील त्यांनी आजपर्यंत केलेली नाही, नक्की शोधकार्य कशा पध्दतीने सुरू आहे. शासनाला त्या अहवाल काय पाठवतात याची माहिती आम्हाला त्यांना विचारायची आहे. मात्र त्या आमची भेट घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रमोद सुर्वे यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर या दुर्घटनेच्या ठिकाणी येवून गेले. दुर्घटनेतील बहुतांश प्रवासी हे रत्नागिरी जिल्ह्यातील होते. त्यांचे मदत केंद्रात येवून बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांची भेट घेवून विचारपूस करणे अपेक्षित होते, मात्र आमच्याशी वायकर यांनी कुठलाही संवाद साधलेला नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आम्हाला भेटून दिलासा द्यायला हवा होता. मात्र वायकर यांनी हे सौजन्य दाखवलेले नाही, त्याबद्दलही या संतप्त नातेवाइकांनी वायकर यांच्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)दासगाव : सावित्री नदीतील पूल दुर्घटनेला आता सात दिवस उलटले तरी आजही जवळपास १५ व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रशासन त्यांच्या परीने शोध घेत आहे. मात्र मृतदेह तसेच वाहने अद्याप मिळत नसल्याने नातलग हवालदिल झाले आहेत. त्यांना आधार देण्याकरिता आ.भरत गोगावले यांनी रविवारी सायंकाळी भेट घेवून सरकार हरलेले नाही, प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे अशा शब्दात दिलासा दिला.या दुर्घटनेला सात दिवस झाले असले तरी दुर्घटनेतील अद्याप १५ मृतदेह सापडलेले नाहीत. त्यांचे नातेवाईक मदत केंद्रात शोध कामाकडे आस लावून बसले आहेत. एन.डी.आर.एफ.चे जवान आणि इतर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. सुरवातीच्या दोन दिवसांत दासगाव आणि खाडीत मृतदेह सापडले मात्र त्यानंतर सावित्रीचे पाणी ओसरून देखील मृतदेह आणि वाहनांचा शोध लागू शकलेला नाही. यामुळे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. त्यांना शासन आणि प्रशासन कोणते प्रयत्न करीत आहे याची माहिती देण्याकरिता आ.गोगावले यांनी नातेवाइकांची भेट घेतली. या वेळी त्यांनी शासन हरलेले नाही, प्रशासन सर्व प्रयत्न करीत असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व तंत्रज्ञान वापरून शोध कसा घेतला याची माहिती देखील गोगावले यांनी दिली. या वेळी उप जिल्हा पोलीस अधीक्षक गायकवाड, प्रांताधिकारी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, तहसीलदार संदीप कदम, एन.डी.आर.एफ. तसेच नेव्हीचे अधिकारी उपस्थित होते.