शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

सावित्री पूल दुर्घटना - बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक प्रशासनावर नाराज

By admin | Updated: August 10, 2016 04:42 IST

सावित्री पूल दुर्घटनेला मंगळवारी सात दिवस उलटून गेले तरी बेपत्ता १५ प्रवाशांचा शोध अद्यापही लागलेला नाही. शोध लवकर लागेल या आशेवर गेल्या आठ दिवसांपासून

महाड : सावित्री पूल दुर्घटनेला मंगळवारी सात दिवस उलटून गेले तरी बेपत्ता १५ प्रवाशांचा शोध अद्यापही लागलेला नाही. शोध लवकर लागेल या आशेवर गेल्या आठ दिवसांपासून दुर्घटनानजीकच्या मदत केंद्रात तळ ठोकून असलेल्या नातेवाइकांमध्ये प्रशासनाबाबत प्रचंड चीड निर्माण झाल्याचे दिसून आले. आम्ही कंटाळून कधी एकदा इथून जातोय याची जणू प्रशासन आता वाट पाहातेय, मात्र बेपत्ता प्रवाशांचा शोध लागल्याशिवाय या ठिकाणाहून हलणार नाही, असा इशाराच या संतप्त नातेवाइकांनी पत्रकारांशी बोलताना दिला. गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफ, नौदलाच्या जवानांकडून केले जात आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत करुनही तसेच नदी पातळी कमी होवून देखील वाहून गेलेल्या तिन्ही वाहनांचा छडा या यंत्रणेला लागू शकला नाही. याबद्दल या नातेवाइकांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही सर्व नातेवाईक रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांना भेटण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून वेळ मागत आहोत, मंत्र्यांबरोबर दुर्घटनेच्या ठिकाणी नियमित येत आहेत. मात्र त्यांनी या ठिकाणी मदत केंद्रात असलेल्या बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांना भेटून साधी विचारपूस देखील त्यांनी आजपर्यंत केलेली नाही, नक्की शोधकार्य कशा पध्दतीने सुरू आहे. शासनाला त्या अहवाल काय पाठवतात याची माहिती आम्हाला त्यांना विचारायची आहे. मात्र त्या आमची भेट घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रमोद सुर्वे यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर या दुर्घटनेच्या ठिकाणी येवून गेले. दुर्घटनेतील बहुतांश प्रवासी हे रत्नागिरी जिल्ह्यातील होते. त्यांचे मदत केंद्रात येवून बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांची भेट घेवून विचारपूस करणे अपेक्षित होते, मात्र आमच्याशी वायकर यांनी कुठलाही संवाद साधलेला नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आम्हाला भेटून दिलासा द्यायला हवा होता. मात्र वायकर यांनी हे सौजन्य दाखवलेले नाही, त्याबद्दलही या संतप्त नातेवाइकांनी वायकर यांच्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)दासगाव : सावित्री नदीतील पूल दुर्घटनेला आता सात दिवस उलटले तरी आजही जवळपास १५ व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रशासन त्यांच्या परीने शोध घेत आहे. मात्र मृतदेह तसेच वाहने अद्याप मिळत नसल्याने नातलग हवालदिल झाले आहेत. त्यांना आधार देण्याकरिता आ.भरत गोगावले यांनी रविवारी सायंकाळी भेट घेवून सरकार हरलेले नाही, प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे अशा शब्दात दिलासा दिला.या दुर्घटनेला सात दिवस झाले असले तरी दुर्घटनेतील अद्याप १५ मृतदेह सापडलेले नाहीत. त्यांचे नातेवाईक मदत केंद्रात शोध कामाकडे आस लावून बसले आहेत. एन.डी.आर.एफ.चे जवान आणि इतर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. सुरवातीच्या दोन दिवसांत दासगाव आणि खाडीत मृतदेह सापडले मात्र त्यानंतर सावित्रीचे पाणी ओसरून देखील मृतदेह आणि वाहनांचा शोध लागू शकलेला नाही. यामुळे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. त्यांना शासन आणि प्रशासन कोणते प्रयत्न करीत आहे याची माहिती देण्याकरिता आ.गोगावले यांनी नातेवाइकांची भेट घेतली. या वेळी त्यांनी शासन हरलेले नाही, प्रशासन सर्व प्रयत्न करीत असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व तंत्रज्ञान वापरून शोध कसा घेतला याची माहिती देखील गोगावले यांनी दिली. या वेळी उप जिल्हा पोलीस अधीक्षक गायकवाड, प्रांताधिकारी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, तहसीलदार संदीप कदम, एन.डी.आर.एफ. तसेच नेव्हीचे अधिकारी उपस्थित होते.