शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सावित्री पूल दुर्घटना - वाहून गेलेल्या एसटीचा लागला शोध

By admin | Updated: August 12, 2016 04:21 IST

तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध घेण्यात नौदलाच्या पथकाला गुरुवारी यश आले.

महाड : तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध घेण्यात नौदलाच्या पथकाला गुरुवारी यश आले. मात्र बेपत्ता झालेल्या १५ प्रवाशांचा अद्यापही तपास न लागल्याने या यंत्रणेवरील तणाव कायम आहे.गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास दुर्घटनेच्या ठिकाणापासून दोनशे मीटर अंतरावर खोल पाण्यात शोध घेणाऱ्या नौदलाच्या पथकाला या बसचा शोध लागला. पाण्यात अंदाजे पंधरा ते वीस फूट खोल गेलेल्या पाणबुड्यांना पाण्याखाली बस असल्याचे आढळून आले. याबाबतचे वृत्त पसरताच प्रशासकीय यंत्रणेनेही बस बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली. बस पाण्याबाहेर काढण्यासाठी नदी किनाऱ्यावर तीन क्रेन्स व तीन जेसीबी यंत्र आणले होते. दुपारी एक वाजता बस बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, मात्र तांत्रिक अडचणीमुळे ती बस बाहेर काढण्यास विलंब लागला. सायंकाळी पाच वाजता एनडीएफ शासकीय यंत्रणा तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुमारे शंभर मीटर अंतरावरील ही पाण्यातील बस किनाऱ्यावर आणण्यात यश आले. या बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता तर बसचे संपूर्ण छप्पर तुटून वाहून गेले होते. राजापूर-बोरीवली या बसमध्ये बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह सापडतील अशी चर्चा केली जात होती, मात्र ती फोल ठरली. दुर्घटनेनंतर जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या या बस तेथील खडकांवर आदळून त्यावेळी बसचे छप्पर बसपासून मोकळे झाले असेल व त्याचक्षणी बसमधील प्रवासी वाहून गेल्याच्या शक्यतेला आज पुष्टी मिळाली.या राजापूर बसमधील सात, जयगड एसटी बसमधील तीन तर तवेरा जीपमधील पाच जणांचा अद्यापही शोध लागला नाही. गेल्या चार दिवसांपासून एकाही बेपत्ता प्रवाशाचा मृतदेह न सापडल्याने त्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली असल्याचे बोलले जात आहे. मात्र एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरूच असल्याचे दिसून आले.आमच्या प्रयत्नांना यश आलेनौदलाचे चिफ पीडी आॅफिसर त्रिलोकसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पाणबुडे व जवानांचे पथक दहा दिवसांपासून शोधमोहिमेत सहभागी असून नौदलाकडून त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून गुरु वारी शोधमोहीम सुरू केल्याचे त्रिलोकसिंग यांनी सांगितले. उद्यापर्यंत दुसरी वाहने देखील शोधण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र राबवणार असल्याचे सांगून आमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल असा ठाम विश्वास नौदलाचे चिफ पीडी आॅॅफिसर त्रिलोकसिंग व्यक्त के ला.