शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सावित्री पूल दुर्घटना - वाहून गेलेल्या एसटीचा लागला शोध

By admin | Updated: August 12, 2016 04:21 IST

तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध घेण्यात नौदलाच्या पथकाला गुरुवारी यश आले.

महाड : तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध घेण्यात नौदलाच्या पथकाला गुरुवारी यश आले. मात्र बेपत्ता झालेल्या १५ प्रवाशांचा अद्यापही तपास न लागल्याने या यंत्रणेवरील तणाव कायम आहे.गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास दुर्घटनेच्या ठिकाणापासून दोनशे मीटर अंतरावर खोल पाण्यात शोध घेणाऱ्या नौदलाच्या पथकाला या बसचा शोध लागला. पाण्यात अंदाजे पंधरा ते वीस फूट खोल गेलेल्या पाणबुड्यांना पाण्याखाली बस असल्याचे आढळून आले. याबाबतचे वृत्त पसरताच प्रशासकीय यंत्रणेनेही बस बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली. बस पाण्याबाहेर काढण्यासाठी नदी किनाऱ्यावर तीन क्रेन्स व तीन जेसीबी यंत्र आणले होते. दुपारी एक वाजता बस बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, मात्र तांत्रिक अडचणीमुळे ती बस बाहेर काढण्यास विलंब लागला. सायंकाळी पाच वाजता एनडीएफ शासकीय यंत्रणा तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुमारे शंभर मीटर अंतरावरील ही पाण्यातील बस किनाऱ्यावर आणण्यात यश आले. या बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता तर बसचे संपूर्ण छप्पर तुटून वाहून गेले होते. राजापूर-बोरीवली या बसमध्ये बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह सापडतील अशी चर्चा केली जात होती, मात्र ती फोल ठरली. दुर्घटनेनंतर जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या या बस तेथील खडकांवर आदळून त्यावेळी बसचे छप्पर बसपासून मोकळे झाले असेल व त्याचक्षणी बसमधील प्रवासी वाहून गेल्याच्या शक्यतेला आज पुष्टी मिळाली.या राजापूर बसमधील सात, जयगड एसटी बसमधील तीन तर तवेरा जीपमधील पाच जणांचा अद्यापही शोध लागला नाही. गेल्या चार दिवसांपासून एकाही बेपत्ता प्रवाशाचा मृतदेह न सापडल्याने त्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली असल्याचे बोलले जात आहे. मात्र एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरूच असल्याचे दिसून आले.आमच्या प्रयत्नांना यश आलेनौदलाचे चिफ पीडी आॅफिसर त्रिलोकसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पाणबुडे व जवानांचे पथक दहा दिवसांपासून शोधमोहिमेत सहभागी असून नौदलाकडून त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून गुरु वारी शोधमोहीम सुरू केल्याचे त्रिलोकसिंग यांनी सांगितले. उद्यापर्यंत दुसरी वाहने देखील शोधण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र राबवणार असल्याचे सांगून आमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल असा ठाम विश्वास नौदलाचे चिफ पीडी आॅॅफिसर त्रिलोकसिंग व्यक्त के ला.