शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सावित्री पूल दुर्घटनेचा धडा, २१०० पूल धोकादायक - चंद्रकांत पाटील

By admin | Updated: August 25, 2016 21:02 IST

सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील शिवकालीन, ब्रिटीशकालीन पुलांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये तब्बल २१०० पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 25  : सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील शिवकालीन, ब्रिटीशकालीन पुलांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये तब्बल २१०० पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शंभर पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. पुलांची ही स्थिती लक्षात घेऊन यापुुढे देखभाल दुरुस्तीसह अन्य सर्वच कामांसाठी स्वंतत्र विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलांची तपासणी, देखभाल-दुरुस्ती व संनियंत्रण या विषयावर कार्यरत वरिष्ठ अभियंत्यांसाठी यशदा येथे चर्चासत्र झाले. चर्चासत्राचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंग, सचिव (इमारती) सी. पी. जोशी, सचिव (रस्ते) एस. डी. तामसेकर, सेवानिवृत्त सचिव के. एस. जांगडे, मुख्य अभियंता प्रवीण किडे सहभागी झाले होते. याशिवाय अनेक अनुभवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, सावित्री दुर्घटनेनंतर पुलांचा विषय शासनाने गाभीर्याने घेतला आहे. यासाठी हे चर्चासत्र संपल्यानंतर तज्ज्ञ तीन-चार व्यक्तींची समिती स्थापन करण्यात येणार असून, राज्यातील धोकादायक पुलांची पुढील दिशा ठरविण्यासाठी खास उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच इमारत, रस्त्यांप्रमाणेच आता पूल असा स्वतंत्र विभाग सुरु करण्यात येणार आहे. या विभागामार्फत नवीन पुलांचे डिझाईन करणे, बांधकामांचे नकाशे, प्रत्येक काम सुरु असताना देखरेख करणे, निकषानुसार काम होते किंवा नाही यांची तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच या विभागामार्फत वर्षांतून दोन वेळा सर्व पुलांची तपासणी करून येणारा अहवाल सर्वांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीमध्ये २१०० पूल धोकादायक असल्याचे म्हटले आहे. यामध्ये शंभर पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. या पुलांच्या कामासाठी किंती निधी लागले हे काढण्याचे काम सुरु आहे. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी अधिक निधीची मागणी करण्यात येणार असून, मे २०१७ पर्यंत सर्व पुलांची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.