शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

सावित्री पूल दुर्घटना :अपघातग्रस्त एसटीत आणखी सात प्रवासी?

By admin | Updated: August 9, 2016 04:33 IST

महाडजवळचा ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला आता एक नवे वळण मिळाले आहे. या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसमधील कर्मचारी, प्रवाशांसह २२ जण वाहून गेल्याची नोंद झाली

मुंबई : महाडजवळचा ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला आता एक नवे वळण मिळाले आहे. या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसमधील कर्मचारी, प्रवाशांसह २२ जण वाहून गेल्याची नोंद झाली होती. मात्र स्थानिक जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाला दिलेल्या माहितीत आणखी सात प्रवासी त्यामध्ये असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे दोन एसटींमध्ये एकूण किती प्रवासी होते याचे गूढ वाढले आहे. अपघातग्रस्त बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनमधील जीपीआरएस यंत्रणेद्वारे प्रवाशांची नोंद महामंडळाकडे त्वरित होते. अपघातापूर्वी वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनची ‘रेंज’ दोन तास गायब झाल्याने त्या काळात हे प्रवासी चढल्याचा अंदाज आहे.रात्री साडेअकराच्या सुमारास रत्नागिरी आगाराची जयगड-मुंबई व राजापूर आगाराची राजापूर-बोरीवली बस रात्री ११.३५च्या सुमारास महाडजवळच्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात होत्या. जयगड-मुंबई बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक एन. एन. कांबळे, वाहक व्ही. के. देसाई यांच्यासह ९ प्रवासी होते. तर राजापूर -बोरीवली बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक जी. एस. मुंडे व वाहक पी. बी. शिर्के यांच्यासह नऊ प्रवासी होते. असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद एसटी महामंडळाकडे आहे. अपघातग्रस्त बसमधील दोन्ही वाहकांकडे तिकीट काढण्यासाठी असलेल्या इलेक्ट्रॉनिक ट्रायमॅक्स मशीनचा आधार घेऊन प्रवाशांची ही माहिती देण्यात आली. मशीनमध्ये जीपीआरएस (ग्लोब पोस्ट रिपोर्टिंग सिस्टिम) यंत्रणा असल्याने तिकिट काढल्यास त्याची नोंद त्वरित एसटी मुख्यालय आणि स्थानिक आगारातील सर्व्हरमध्ये होते. वाहकांकडून मशीनद्वारे तिकिटे काढण्यात आल्याने २२ प्रवासी असल्याची नोंद मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र आणखी सात प्रवाशांनीही अपघातग्रस्त बसमधून प्रवास केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून एसटी महामंडळाला देण्यात आली आणि ही माहिती मिळताच एसटी प्रशासन अवाक झाले. या सातपैकी चार जणांचे मृतदेह मिळाले असून अन्य तीन जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. ते सर्व जण एसटीतूनच प्रवास करत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. यासदंर्भात एसटीतील सूत्रांनी सांगितले की, याची संपूर्ण माहिती महामंडळाने घेतल्यानंतर चिपळूण ते खेड दरम्यान असलेल्या भोस्ते घाटामधून आणि खेड ते पोलादपूरमधील कशेडी घाटातून जाताना अपघातग्रस्त एसटीतील दोन्ही वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनची ‘रेंज’ गेली. महाड येईपर्यंत तब्बल दोन तास या मशीनला ‘रेंज’च नव्हती. त्यामुळे या दोन तासांत तिकिट काढून जरी प्रवासी बसले असतील तरी मशीनला ‘रेंज’नसल्याने त्या प्रवाशांची नोंद एसटीकडे असणाऱ्या सर्व्हरमध्ये झालेली नाही. चिपळूणमधील लोटे परशुराम हा ट्रायमॅक्स मशीनचा शेवटचा सिग्नल होता आणि त्यानंतर सिग्नल मिळालाच नसल्याने सर्व घोळ झाल्याचे सांगण्यात आले. खेड ते भरणा नाका याप्रवासी बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे बसमधील वाहकांकडे असलेली मशिनही मिळालेली नसल्याने अनेक समस्या महामंडळासमोर निर्माण झाल्या आहेत. ...................नुकसान भरपाई मिळणार कि नाही?एसटी महामंडळाने नवी योजना सुरु करत एसटी अपघातांत प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे सात मृत प्रवाशांच्या नातेवाईकांकडून ते एसटीचेच प्रवासी असल्याचे जरी सांगितले जात असले तरी ते सिध्द करावे लागेल. तरच त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. मात्र ते सात प्रवासी एसटीचेच आहे का याचा शहानिशा महामंडळाकडून केला जात आहे. यात मोठी तांत्रिक अडचण उद्भवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.