शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत

By admin | Updated: May 11, 2016 04:12 IST

पाण्याचा सर्वाधिक वापर आणि नासाडी हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मध्ये होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलमित्र अभियानाचा प्रारंभ त्या ठिकाणी केल्याचा सकारात्मक परिणाम एका दिवसात दिसून येत आहे

मुंबई : पाण्याचा सर्वाधिक वापर आणि नासाडी हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मध्ये होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलमित्र अभियानाचा प्रारंभ त्या ठिकाणी केल्याचा सकारात्मक परिणाम एका दिवसात दिसून येत आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी कर्मचारी आणि वेटर्स गंभीरपणे प्रयत्न करीत असल्यामुळे एरवी वाया जाणाऱ्या पाण्यामुळे आता ‘जलमित्र’चे ड्रम्स भरून जात आहेत.या राज्यव्यापी अभियानाचा सोमवारी प्रारंभ झाला. राज्यातील प्रत्येक शहरातील सुमारे ७५० हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅन्टीनमध्ये जलबचतीचा संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले. याशिवाय तेथील कर्मचाऱ्यांना पाण्याचे महत्त्व, पाणी वाचविण्याच्या पध्दती समजावून सांगण्यात आल्या. जलमित्र अभियान ज्या हॉटेल्समध्ये सुरू झाले. तेथे ‘लोकमत’च्या वतीने ड्रम्स दिले आहेत. या अभियानाच्या प्रत्यक्ष कृतीच्या आजच्या पहिल्या दिवशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सायंकाळी हॉटेल्सला भेटी देऊन पाहणी केली असता तेथे ड्रम्समध्ये निम्म्याहून अधिक पाणी साचल्याचे दिसून आले.हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या कर्मचाऱ्यांचा जलमित्र अभियानात कृतिशील सहभाग दिसून आला. वेटर्सनी आज ग्राहकांसमोर पाण्याने भरलेला जग ठेवण्यापेक्षा ग्राहक जितके मागतील तितकेच पाणी दिले. पाणी प्यायल्यानंतर ज्या ग्राहकाने ग्लासात पाणी ठेवले होते. ते पाणी सिंकमध्ये ओतून देण्यापेक्षा वेटर्सनी ते ‘जलमित्र’च्या ड्रममध्ये साठविले. या पाण्याचा पुनर्वापर हॉटेल्समधील झाडांना, वेलींना तसेच फरशी स्वच्छ करण्यासाठी करण्याच्या सूचना हॉटेल चालकांनी दिल्या असल्याचे वेटर्सनी सांगितले. जलमित्र अभियानाचा हा पहिला आठवडा असून, हॉटेल्सप्रमाणेच औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, शहरांमधील मॉल्स, मल्टिप्लेक्समध्येही अशाच प्रकारे जनजागरण करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)