शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वीस दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत

By admin | Updated: May 12, 2016 04:22 IST

दुष्काळाच्या स्थितीत सांडपाण्याच्या पुनर्वापरातून गेल्या २० दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत ‘क्रिडाई कोल्हापूर’ने केली आहे.

मुंबई : दुष्काळाच्या स्थितीत सांडपाण्याच्या पुनर्वापरातून गेल्या २० दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत ‘क्रिडाई कोल्हापूर’ने केली आहे. या पाण्याद्वारे बांधकाम व्यावसायिकांनी शहरातील ५० किलोमीटरवरील झाडांना जीवदान दिले आहे.टंचाईच्या परिस्थितीत रस्त्यांवरील झाडांना पाणी पुरविणे अशक्य झाले असताना त्यावर बांधकाम व्यावसायिकांची संघटना असणाऱ्या ‘क्रिडाई कोल्हापूर’ने पुढाकार घेतला. या संघटनेने शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या ५० किलोमीटरच्या रस्त्यांवरील झाडांना पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात वीस दिवसांपूर्वी केली. यासाठी कसबा बावडा येथील महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर केला जातो. शहरातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे संबंधित झाडांना देण्यात येते. रोज टँकरच्या सात फेऱ्यांद्वारे ८० हजार लिटर पाणी या झाडांना सोमवार ते रविवारपर्यंत पुरविण्यात येते. रोज एका रस्त्यावरील झाडांना पाणी दिले जाते. या उपक्रमातून आतापर्यंत १ कोटी ६० हजार लिटर पाणी झाडांना दिले आहे. यामुळे पिण्याच्या, वापरासाठी असलेल्या शुद्ध पाण्याची बचत झाली आहे. निम्म्या खर्चात झाडांना जीवदानआम्ही रस्त्यांवरील झाडांना वर्षभर पाणी देणार आहोत. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात असल्याने एक कोटी ६० हजार लिटर इतक्या शुद्ध पाण्याची बचत झाली असल्याचे ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी सांगितले. शहरातील अन्य जलस्रोतांतील पाणी या झाडांना दिले असते तर महिनाकाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च झाले असते. यामुळे हा खर्च निम्म्यावर आला, असेही यादव यांनी सांगितले.जळगावमध्ये डॉक्टरांचा पाणीबचतीचा निर्धारजलमित्र अभियानात जळगावमधील डॉक्टरांनी रुग्णालयांमध्ये पाणी बचत करण्याचा निर्र्धार केला. या अभियानात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ.नीलेश चांडक, डॉ.अजितकुमार, डॉ. ज्योती गाजरे, डॉ.गुणवंत महाजन, डॉ.महेंद्र काबरा सहभागी झाले आहेत.