शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

एसटीला वाचवा हो...

By admin | Updated: December 22, 2016 04:32 IST

‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एसटीकडेच विविध कारणांमुळे, प्रत्यक्षात प्रवाशांनी पाठ फिरवण्यास

मुंबई : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एसटीकडेच विविध कारणांमुळे, प्रत्यक्षात प्रवाशांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत एसटीचे तब्बल १५ कोटींहून अधिक प्रवासी घटले असून, हा सर्वात मोठा फटका मानला जातो. भविष्यात प्रवासी संख्येत आणखी घट होईल, या भीतीने एसटी महामंडळाने जानेवारी २0१७ पासून तीन महिन्यांसाठी ‘प्रवासी वाढवा विशेष अभियाना’चा निर्णय घेतला आहे. यात प्रवासी वाढवण्यास मदत करणाऱ्या आगार, चालक व वाहकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. एसटी बसची झालेली दुरवस्था, अस्वच्छता, वाढलेले भाडे आणि अवैध प्रवासी वाहतूक अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करत असताना, पाच वर्षांत यात मोठी घट होण्यास सुरुवात झाली. आता हीच संख्या दररोज ६४ लाख ७ हजार प्रवासी एवढी झाली आहे. २0११-१२ मध्ये २६0 कोटी ४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, हाच आकडा २0१५-१६ मध्ये पाहिल्यास २४५ कोटी ६0 लाखांपर्यंत आला. एकंदरीतच प्रवासी संख्येत होत चाललेली घट पाहता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी, एसटी महामंडळाकडून नवीन एसी बसेस घेतानाच स्वच्छता मोहीम व कॅटरिंग व्यवस्थेतही बदल केला जात आहे. तरीही प्रवाशांत काही केल्या वाढ होताना दिसत नाही. त्यामुळेच एसटीकडून १ जानेवारी ते ३१ मार्च २0१७ पर्यंत राज्यभर ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रवासी वाढवण्यास मदत करणाऱ्या आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना दरमहा १ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकावरील आगारास ७५ हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावरील आगाराला ५0 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावणाऱ्या विभागास ५0 हजार रुपयांचे विशेष बक्षीस दिले जाईल. (प्रतिनिधी)वाहक, चालकांनाही बक्षीसअभियानांतर्गत एसटीच्या चालक-वाहकांनाही बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. सर्वाधिक प्रवासी वाहून नेण्यास मदत करणाऱ्या वाहकाला दरमहा रोख ५ हजार रुपये, तर या कामगिरीमध्ये साथ देणाऱ्या चालकाला ३ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. या अभियानामुळे गेल्या पाच वर्षांत एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा जोडला जाईल, अशी आशा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.