शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एसटीला वाचवा हो...

By admin | Updated: December 22, 2016 04:32 IST

‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एसटीकडेच विविध कारणांमुळे, प्रत्यक्षात प्रवाशांनी पाठ फिरवण्यास

मुंबई : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एसटीकडेच विविध कारणांमुळे, प्रत्यक्षात प्रवाशांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत एसटीचे तब्बल १५ कोटींहून अधिक प्रवासी घटले असून, हा सर्वात मोठा फटका मानला जातो. भविष्यात प्रवासी संख्येत आणखी घट होईल, या भीतीने एसटी महामंडळाने जानेवारी २0१७ पासून तीन महिन्यांसाठी ‘प्रवासी वाढवा विशेष अभियाना’चा निर्णय घेतला आहे. यात प्रवासी वाढवण्यास मदत करणाऱ्या आगार, चालक व वाहकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. एसटी बसची झालेली दुरवस्था, अस्वच्छता, वाढलेले भाडे आणि अवैध प्रवासी वाहतूक अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करत असताना, पाच वर्षांत यात मोठी घट होण्यास सुरुवात झाली. आता हीच संख्या दररोज ६४ लाख ७ हजार प्रवासी एवढी झाली आहे. २0११-१२ मध्ये २६0 कोटी ४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, हाच आकडा २0१५-१६ मध्ये पाहिल्यास २४५ कोटी ६0 लाखांपर्यंत आला. एकंदरीतच प्रवासी संख्येत होत चाललेली घट पाहता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी, एसटी महामंडळाकडून नवीन एसी बसेस घेतानाच स्वच्छता मोहीम व कॅटरिंग व्यवस्थेतही बदल केला जात आहे. तरीही प्रवाशांत काही केल्या वाढ होताना दिसत नाही. त्यामुळेच एसटीकडून १ जानेवारी ते ३१ मार्च २0१७ पर्यंत राज्यभर ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रवासी वाढवण्यास मदत करणाऱ्या आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना दरमहा १ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकावरील आगारास ७५ हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावरील आगाराला ५0 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावणाऱ्या विभागास ५0 हजार रुपयांचे विशेष बक्षीस दिले जाईल. (प्रतिनिधी)वाहक, चालकांनाही बक्षीसअभियानांतर्गत एसटीच्या चालक-वाहकांनाही बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. सर्वाधिक प्रवासी वाहून नेण्यास मदत करणाऱ्या वाहकाला दरमहा रोख ५ हजार रुपये, तर या कामगिरीमध्ये साथ देणाऱ्या चालकाला ३ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. या अभियानामुळे गेल्या पाच वर्षांत एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा जोडला जाईल, अशी आशा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.