शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

एसटीला वाचवा हो...

By admin | Updated: December 22, 2016 04:32 IST

‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एसटीकडेच विविध कारणांमुळे, प्रत्यक्षात प्रवाशांनी पाठ फिरवण्यास

मुंबई : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एसटीकडेच विविध कारणांमुळे, प्रत्यक्षात प्रवाशांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत एसटीचे तब्बल १५ कोटींहून अधिक प्रवासी घटले असून, हा सर्वात मोठा फटका मानला जातो. भविष्यात प्रवासी संख्येत आणखी घट होईल, या भीतीने एसटी महामंडळाने जानेवारी २0१७ पासून तीन महिन्यांसाठी ‘प्रवासी वाढवा विशेष अभियाना’चा निर्णय घेतला आहे. यात प्रवासी वाढवण्यास मदत करणाऱ्या आगार, चालक व वाहकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. एसटी बसची झालेली दुरवस्था, अस्वच्छता, वाढलेले भाडे आणि अवैध प्रवासी वाहतूक अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करत असताना, पाच वर्षांत यात मोठी घट होण्यास सुरुवात झाली. आता हीच संख्या दररोज ६४ लाख ७ हजार प्रवासी एवढी झाली आहे. २0११-१२ मध्ये २६0 कोटी ४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, हाच आकडा २0१५-१६ मध्ये पाहिल्यास २४५ कोटी ६0 लाखांपर्यंत आला. एकंदरीतच प्रवासी संख्येत होत चाललेली घट पाहता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी, एसटी महामंडळाकडून नवीन एसी बसेस घेतानाच स्वच्छता मोहीम व कॅटरिंग व्यवस्थेतही बदल केला जात आहे. तरीही प्रवाशांत काही केल्या वाढ होताना दिसत नाही. त्यामुळेच एसटीकडून १ जानेवारी ते ३१ मार्च २0१७ पर्यंत राज्यभर ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रवासी वाढवण्यास मदत करणाऱ्या आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना दरमहा १ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकावरील आगारास ७५ हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावरील आगाराला ५0 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावणाऱ्या विभागास ५0 हजार रुपयांचे विशेष बक्षीस दिले जाईल. (प्रतिनिधी)वाहक, चालकांनाही बक्षीसअभियानांतर्गत एसटीच्या चालक-वाहकांनाही बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. सर्वाधिक प्रवासी वाहून नेण्यास मदत करणाऱ्या वाहकाला दरमहा रोख ५ हजार रुपये, तर या कामगिरीमध्ये साथ देणाऱ्या चालकाला ३ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. या अभियानामुळे गेल्या पाच वर्षांत एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा जोडला जाईल, अशी आशा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.