शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांना वाचवूच!

By admin | Updated: April 12, 2017 06:37 IST

वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.

मुंबई : पाकिस्तानने हेरगिरीचा ठपका ठेवलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर नव्हे तर व्यावसायिक व सर्वसामान्य भारतीय आहेत. पाकिस्तानने त्यांना सन्मानाने सोडायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करत जाधव यांच्या सुटकेसाठी सरकार म्हणून जे काही करता येईल ते सर्व करू. वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या न्यूज अँकर व पत्रकार अंजना कश्यप यांनी राजनाथ सिंह यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, जाधव गुप्तहेर असते तर त्यांच्याकडे भारताचा पासपोर्ट नसता, ही साधी गोष्ट आहे. पण पाकिस्तानला या वास्तवाशी देणेघेणे नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे पूर्वनियोजित खून आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत निषेध करतो, असेही राजनाथ यांनी ठणकावले.पाकवर काय उपचार करायचा, ते काळ ठरवेल. कोणाचाही स्वभाव बदलण्यास वेळ लागतो. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू, असे सांगत पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.काश्मीर सध्या अशांत असले तरी वर्षभरात काश्मीरमध्ये परिवर्तन दिसेल. काश्मीरमधील नैसर्गिक आपत्तीत भारतीय जवानच तेथील जनतेच्या मदतीला धावून जातात. तरीही त्यांच्यावर दगडफेक होते, याचा विचार तेथील जनतेनेच करायला हवा. आताच सरकारची योजना उघड करता येणार नाही. पण एक नक्की सांगतो की वर्षभरात काश्मीरमधील परिस्थितीत बदल झालेला दिसेल. फारु ख अब्दुल्ला यांनी जवानांवर दगडफेक करणाऱ्यांचे केलेले समर्थन चुकीचे असून त्यांनी तसे करायला नको होते, असेही सिंह यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)दाऊदवर कारवाई सुरू : दाऊद इब्राहिमवर मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटांसह विविध ३१ खटले आहेत. तो सध्या कराचीत आहे, याची खात्रीशीर माहिती भारताकडे आहे. दाऊदविरोधात भारताने कारवाई सुरू केली आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन ठिकाणी त्याबाबतची कारवाई झाली, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.उत्तर प्रदेशात होता विजयाचा विश्वास उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील विजयावर बोलताना, आमचे स्पष्ट बहुमत येईल याचा मला विश्वास होता. पंतप्रधानांनाही मी तसे सांगितले होते. जास्तीत जास्त २५० जागा येतील, असा अंदाज होता. पण ३२५ जागा मिळाल्या. ते संख्याबळ आमच्यासाठी अविश्वसनीय होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही, याकडे लक्ष वेधले असता, जो विजयी होऊ शकेल त्यालाच तिकीट दिले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपाने मुस्लिमांना तिकीट दिले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.