शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
4
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
5
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
6
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
7
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
8
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
9
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
10
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
11
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
12
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
13
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
14
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
15
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
16
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
17
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
18
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
19
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
20
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज

कुलभूषण जाधव यांना वाचवूच!

By admin | Updated: April 12, 2017 06:37 IST

वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.

मुंबई : पाकिस्तानने हेरगिरीचा ठपका ठेवलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर नव्हे तर व्यावसायिक व सर्वसामान्य भारतीय आहेत. पाकिस्तानने त्यांना सन्मानाने सोडायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करत जाधव यांच्या सुटकेसाठी सरकार म्हणून जे काही करता येईल ते सर्व करू. वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या न्यूज अँकर व पत्रकार अंजना कश्यप यांनी राजनाथ सिंह यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, जाधव गुप्तहेर असते तर त्यांच्याकडे भारताचा पासपोर्ट नसता, ही साधी गोष्ट आहे. पण पाकिस्तानला या वास्तवाशी देणेघेणे नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे पूर्वनियोजित खून आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत निषेध करतो, असेही राजनाथ यांनी ठणकावले.पाकवर काय उपचार करायचा, ते काळ ठरवेल. कोणाचाही स्वभाव बदलण्यास वेळ लागतो. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू, असे सांगत पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.काश्मीर सध्या अशांत असले तरी वर्षभरात काश्मीरमध्ये परिवर्तन दिसेल. काश्मीरमधील नैसर्गिक आपत्तीत भारतीय जवानच तेथील जनतेच्या मदतीला धावून जातात. तरीही त्यांच्यावर दगडफेक होते, याचा विचार तेथील जनतेनेच करायला हवा. आताच सरकारची योजना उघड करता येणार नाही. पण एक नक्की सांगतो की वर्षभरात काश्मीरमधील परिस्थितीत बदल झालेला दिसेल. फारु ख अब्दुल्ला यांनी जवानांवर दगडफेक करणाऱ्यांचे केलेले समर्थन चुकीचे असून त्यांनी तसे करायला नको होते, असेही सिंह यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)दाऊदवर कारवाई सुरू : दाऊद इब्राहिमवर मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटांसह विविध ३१ खटले आहेत. तो सध्या कराचीत आहे, याची खात्रीशीर माहिती भारताकडे आहे. दाऊदविरोधात भारताने कारवाई सुरू केली आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन ठिकाणी त्याबाबतची कारवाई झाली, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.उत्तर प्रदेशात होता विजयाचा विश्वास उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील विजयावर बोलताना, आमचे स्पष्ट बहुमत येईल याचा मला विश्वास होता. पंतप्रधानांनाही मी तसे सांगितले होते. जास्तीत जास्त २५० जागा येतील, असा अंदाज होता. पण ३२५ जागा मिळाल्या. ते संख्याबळ आमच्यासाठी अविश्वसनीय होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही, याकडे लक्ष वेधले असता, जो विजयी होऊ शकेल त्यालाच तिकीट दिले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपाने मुस्लिमांना तिकीट दिले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.