शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 4, 2017 05:05 IST

रकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असे सांगत केवळ एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान वठणीवर येणार

मुंबई : काश्मीरमध्ये भारतीय जवानांची हत्या आणि वाढते दहशतवादी हल्ल्यांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सरकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असे सांगत केवळ एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान वठणीवर येणार नाही. त्यासाठी पाकमध्ये घुसून हल्ला चढवला पाहिजे, असेही उद्धव म्हणाले.येथील रंगशारदा सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर चौफेर टोलेबाजी केली.देशातील गायींना वाचवले पाहिजे. मात्र, अगोदर देश वाचवण्याची गरज आहे. पाककडून होणाऱ्या हल्ल्यांनंतर शहिदांच्या कुटुंबीयांकडून नृशंस कृत्यांचा बदला घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये घुसा आणि पाकिस्तानचे तुकडे पाडा. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न बघताय, देश मजबूत करण्याचे स्वप्न कधी बघणार, असा सवालही उद्धव यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुनही त्यांनी भाजपाला सुनावले. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या बाजूने आम्ही बोललो तर आम्ही विरोधात बोलतो, असे त्यांना वाटते. शेतकरी जेव्हा आपले कौतुक करतो तेच आपले यश, असेही ठाकरे म्हणाले. उद्धव यांनी निवडणुकांमध्ये भाजपाकडून होणारा पैशांचा वापर व ‘ईव्हीएम’विषयीही सवाल केले. ईव्हीएमला दोष देत नाही. मात्र, या मशीनबद्दल माझा एक आक्षेप आहे, माझे मत कुणाला गेले, हे मला कळू शकत नाही. लोकशाहीतील हा अधिकार ईव्हीएममुळे हिसकावून घेतला जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उतरप्रदेशाच्या यशाबद्दल मी पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. मात्र गोव्याच्या निकालाकडे दुर्लक्ष करत येणार नाही. गोव्यात काँग्रेसने कोणताही चेहरा दिला नव्हता तरीही भाजपापेक्षा काँग्रेसला चार जागा जास्त मिळाल्या, असे सांगतानाच मध्यावधी निवडणुकांच्या चर्चांवरही ठाकरे यांनी भाष्य केले. मध्यावधी निवडणुका उद्या कशाला, आजच घ्या असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले. (प्रतिनिधी)यूपीत योगी, महाराष्ट्रात निरुपयोगीमला कोणीतरी म्हटले की उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये निरुपयोगी सरकार आहे. आज राज्यात भाजपाची अशी प्रतिमा तयार झाली आहे, असा चिमटाही उद्धव यांनी काढला. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दगडखाणी बंदीमुळे रस्ते काम रखडल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी खाणींबाबत कायदेशीर मार्ग काढण्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती आदित्य यांनी माध्यमांशी बोलताना दिली.