शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 4, 2017 05:05 IST

रकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असे सांगत केवळ एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान वठणीवर येणार

मुंबई : काश्मीरमध्ये भारतीय जवानांची हत्या आणि वाढते दहशतवादी हल्ल्यांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सरकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असे सांगत केवळ एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान वठणीवर येणार नाही. त्यासाठी पाकमध्ये घुसून हल्ला चढवला पाहिजे, असेही उद्धव म्हणाले.येथील रंगशारदा सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर चौफेर टोलेबाजी केली.देशातील गायींना वाचवले पाहिजे. मात्र, अगोदर देश वाचवण्याची गरज आहे. पाककडून होणाऱ्या हल्ल्यांनंतर शहिदांच्या कुटुंबीयांकडून नृशंस कृत्यांचा बदला घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये घुसा आणि पाकिस्तानचे तुकडे पाडा. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न बघताय, देश मजबूत करण्याचे स्वप्न कधी बघणार, असा सवालही उद्धव यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुनही त्यांनी भाजपाला सुनावले. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या बाजूने आम्ही बोललो तर आम्ही विरोधात बोलतो, असे त्यांना वाटते. शेतकरी जेव्हा आपले कौतुक करतो तेच आपले यश, असेही ठाकरे म्हणाले. उद्धव यांनी निवडणुकांमध्ये भाजपाकडून होणारा पैशांचा वापर व ‘ईव्हीएम’विषयीही सवाल केले. ईव्हीएमला दोष देत नाही. मात्र, या मशीनबद्दल माझा एक आक्षेप आहे, माझे मत कुणाला गेले, हे मला कळू शकत नाही. लोकशाहीतील हा अधिकार ईव्हीएममुळे हिसकावून घेतला जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उतरप्रदेशाच्या यशाबद्दल मी पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. मात्र गोव्याच्या निकालाकडे दुर्लक्ष करत येणार नाही. गोव्यात काँग्रेसने कोणताही चेहरा दिला नव्हता तरीही भाजपापेक्षा काँग्रेसला चार जागा जास्त मिळाल्या, असे सांगतानाच मध्यावधी निवडणुकांच्या चर्चांवरही ठाकरे यांनी भाष्य केले. मध्यावधी निवडणुका उद्या कशाला, आजच घ्या असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले. (प्रतिनिधी)यूपीत योगी, महाराष्ट्रात निरुपयोगीमला कोणीतरी म्हटले की उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये निरुपयोगी सरकार आहे. आज राज्यात भाजपाची अशी प्रतिमा तयार झाली आहे, असा चिमटाही उद्धव यांनी काढला. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दगडखाणी बंदीमुळे रस्ते काम रखडल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी खाणींबाबत कायदेशीर मार्ग काढण्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती आदित्य यांनी माध्यमांशी बोलताना दिली.