शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 4, 2017 05:05 IST

रकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असे सांगत केवळ एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान वठणीवर येणार

मुंबई : काश्मीरमध्ये भारतीय जवानांची हत्या आणि वाढते दहशतवादी हल्ल्यांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सरकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असे सांगत केवळ एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान वठणीवर येणार नाही. त्यासाठी पाकमध्ये घुसून हल्ला चढवला पाहिजे, असेही उद्धव म्हणाले.येथील रंगशारदा सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर चौफेर टोलेबाजी केली.देशातील गायींना वाचवले पाहिजे. मात्र, अगोदर देश वाचवण्याची गरज आहे. पाककडून होणाऱ्या हल्ल्यांनंतर शहिदांच्या कुटुंबीयांकडून नृशंस कृत्यांचा बदला घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये घुसा आणि पाकिस्तानचे तुकडे पाडा. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न बघताय, देश मजबूत करण्याचे स्वप्न कधी बघणार, असा सवालही उद्धव यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुनही त्यांनी भाजपाला सुनावले. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या बाजूने आम्ही बोललो तर आम्ही विरोधात बोलतो, असे त्यांना वाटते. शेतकरी जेव्हा आपले कौतुक करतो तेच आपले यश, असेही ठाकरे म्हणाले. उद्धव यांनी निवडणुकांमध्ये भाजपाकडून होणारा पैशांचा वापर व ‘ईव्हीएम’विषयीही सवाल केले. ईव्हीएमला दोष देत नाही. मात्र, या मशीनबद्दल माझा एक आक्षेप आहे, माझे मत कुणाला गेले, हे मला कळू शकत नाही. लोकशाहीतील हा अधिकार ईव्हीएममुळे हिसकावून घेतला जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उतरप्रदेशाच्या यशाबद्दल मी पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. मात्र गोव्याच्या निकालाकडे दुर्लक्ष करत येणार नाही. गोव्यात काँग्रेसने कोणताही चेहरा दिला नव्हता तरीही भाजपापेक्षा काँग्रेसला चार जागा जास्त मिळाल्या, असे सांगतानाच मध्यावधी निवडणुकांच्या चर्चांवरही ठाकरे यांनी भाष्य केले. मध्यावधी निवडणुका उद्या कशाला, आजच घ्या असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले. (प्रतिनिधी)यूपीत योगी, महाराष्ट्रात निरुपयोगीमला कोणीतरी म्हटले की उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये निरुपयोगी सरकार आहे. आज राज्यात भाजपाची अशी प्रतिमा तयार झाली आहे, असा चिमटाही उद्धव यांनी काढला. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दगडखाणी बंदीमुळे रस्ते काम रखडल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी खाणींबाबत कायदेशीर मार्ग काढण्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती आदित्य यांनी माध्यमांशी बोलताना दिली.