शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

सोशलमिडियावर ‘सेव्ह आराध्या’ मोहीम

By admin | Updated: April 9, 2017 20:30 IST

सध्या देशभरात मानवी आवयवांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे लाखो लोकांनी प्राण गमवावे लागत आहेत.

राम शिनगारे / ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 9 - सध्या देशभरात मानवी आवयवांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे लाखो लोकांनी प्राण गमवावे लागत आहेत. आपण अवयवदान केल्यास अनेकांना जिवनदान मिळू शकते. यासाठी मरणोत्तर आवयवदान करण्याचे आवाहन डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोशलमिडियावर करण्यात येत आहे. यासाठी ‘सेव्ह आराध्या’ या  ट्रेंडची धुम सुरु आहे.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य दिन, दलित, वंचित, उपेक्षितांसाठी खर्ची केले आहे. या कार्याला मानवंदना देण्यासाठी त्यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. यावर्षी सोशलमिडियावर डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी जनजागृती सुरू आहे.  फेसबुक, व्टिटर, व्हाट्अप, इन्स्टाग्राम आदी सोशल साईटवर याचे जोरदार कॅम्पेन करण्यात येत आहे. यासाठठी ‘सेव्ह आराध्या’, ‘आॅर्गन डोनेशन’ ही टॅगलाईन वापरण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान हा ट्रेंड सर्वत्र जोरदारपणे सुरु होता. दुसºया दिवशीही हाच ट्रेंड कायम होता. नेटिझन्स या ट्रेंडला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. अनेकांनी अवयवदान करण्याचा अर्ज भरुन त्याचे छायाचित्र सोशलमिडिवर टाकले आहे.
कोण आहे आराध्या
मुंबईतील आराध्या मुळे या चार वर्षीय मुलीला डायलेटेड कार्डिओमायोपाथी हा दुर्धर प्रकारचा हृदयविकार झाला आहे. तीला वाचविण्यासाठी सध्या एका हृदयाची आवश्यकता आहे. आराध्यासाठी ड+, ड -, अ +, अ - या रक्तगटाचा दाताच ह्रदयदान करु शकतो. यासाठी १० ते १५ वयोगटातील व्यक्तीची गरज आहे. जिचे वजन ४० किलोपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आराध्याला मदत करण्याचे आवाहन ‘सेव्ह आराध्या’तून करण्यात येत आहे. याचबरोबर अवयवदान ही काळाची गरज असल्यामुळे ते प्रत्येकाने करावे हा सामाजिक संदेशही यातून देण्यात येत आहे.
मी केले तुम्ही करणार का?
सोशलमिडियावर मी केले तुम्ही करणार का? असा प्रश्नही व्टिटरवर नेटिझन्स अवयवदानावर विचारत आहेत.  यावर अनेकजण कॉमेंट, लाईक, शेअर करून ‘सेव्ह आराध्या’ला पाठिंबा देत आहेत. यातून अवयवदानाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे.