शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

इंजिनिअरिंंग कॉलेजच्या मुलांनी बनवला उपग्रह

By admin | Updated: June 22, 2016 13:53 IST

थ्री इडियट आठवतोय ना? मग त्यातला रॅँचोही लक्षात असेलच! पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष जगण्यावर, करुन पाहण्यावर विश्वास ठेवणारा.

- राजानंद मोरे

थ्री इडियट आठवतोय ना? मग त्यातला रॅँचोही लक्षात असेलच! पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष जगण्यावर, करुन पाहण्यावर विश्वास ठेवणारा. त्यानं आपल्या शिक्षणपद्धतीतले दोष तर दाखवलेच पण तरुणांच्या कल्पना शक्तीची जाणीवही करून दिली. हे सारं फिल्मीच आहे, प्रत्यक्षात असं काही घडत नाही असं वाटत असेल तर पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजातल्या दोस्तांना भेटा. पुण्यातील कॉलेज आॅफ इंजीनिअरिंगने एक भन्नाट संधी उपलब्ध करून दिली अन् तिथल्या विद्यार्थ्यांनीही त्या संधीचं सोनं करत शब्दश: आकाशाला गवसणी घालण्याचं धाडस केलं! या शिकाऊ इंजिनिअर्स नी चक्क ‘स्वयम’ हा लघु उपग्रह तयार केला. येत्या बुधवारी हा ‘स्वयम’ आकाशात झेपावणार आहे. खुद्द ‘इस्रो’ ने या उपग्रहाच्या उपयोगितेवर शिकामोर्तब केलं आहे. ‘संदेश वहन’ हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. देशातील हा दुसऱ्या क्र मांकाचा सर्वात लहान उपग्रह आहे. याचं वजन केवळ ९९० ग्रॅम आहे. विश्वास बसत नाही ना? पण ‘सीईओपी’ च्या १७६ विद्यार्थ्यांनी मिळून ही कमाल केली आहे. खरं तर टीम वर्कचंही हे एक उत्तम उदाहरण आहे. २००८ च्या अखेरीस या उपग्रहाची पायाभरणी झाली. त्यावेळी इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अभिषेक बाविस्कर, प्रिया गणदास, निश्चय मात्रे आणि मोहित कर्वे या चौघांची ‘स्वयम’ ही मुळ कल्पना. शुन्यातुन सुरु वात करायची होती. कॉलेज मधे याविषयीचाअभ्यासक्र म घेतला जात नाही. त्यामुळे इथे बेसिक माहितीही मिळणेही अशक्य. सुरु वातीला इंटरनेटचा आधार घेतला. शिक्षक, तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ यांच्या गाठी भेटी सुरु झाल्या. इतर सहकारी मित्रमैत्रिणींची मदत होऊ लागली. उपग्रह बनवायचा म्हणजे साधी गोष्ट नाही, याचं भान ठेवून त्यांनी प्रत्येक बाब बारकाईनं पहायला सुरु वात केली. आपल्या विद्यार्थ्यांचे हे प्रयत्न पाहून कॉलेज प्रशासनाचीही उत्सुकता वाढली. उपग्रह बनवण्याची कल्पना कॉलेज मधे सर्वांसाठीच नविन होती. पण विद्यार्थांच्या या प्रयत्नांना कॉलेजमध्ये सर्वानीच बळ दिलं. २००९ मध्ये याला अधिकृत मान्यता दिली गेली. आता हे एक मिशन बनलं. विद्यार्थी स्वत: हे मिशन पूर्णत्वास नेणार असल्यानं त्याचं ‘स्वयम’ असंच नामकरण करण्यात आलं. ‘स्वयम’च्या निर्मितीला टप्या- टप्याने वेग येऊ लागला. खर्च, उपलब्ध साधनांचा विचार करून उपग्रह लहान असावा असे पक्के झाले होते. त्यामुळे लांबी, रु ंदी आणि उंची जवळपास १० सेंमी. पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. यासाठी लागणारी बहुतेक उपकरणं विद्यार्थ्यांनी इथंच बनवली. काही साहित्य बाजारातून आणावं लागलं. पण काम एवढं सोपं नव्हतं. त्यामुळे वेळ लागत होता. टीम मधील काही विद्यार्थी पदवी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडले. अर्थात म्हणून काम थांबलं नाही. त्यांच्यासोबत काम केलेल्या इतरांनी ही जबाबदारी स्वीकारली. पुन्हा काही नविन विद्यार्थी जोडले गेले. ही साखळी अशीच सुरु राहिली. कॉलेज कडूनही साथ मिळत होती. अथक प्रयत्नांतून २०१३ च्या सुरु वातीस स्वयम चं प्राथमिक रूप साकार झाले. इस्त्रोकडून त्याची पाहणी करण्यात आली. त्याच वर्षी कॉलेज आणि इस्त्रोमधे याबाबतचा करार झाला. चार वर्षाच्या प्रयत्नाचं चीज होणार होतं. त्यामुळे सर्वचजण आनंदून गेले. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर जानेवारी २०१५मधे स्वयम इस्रोच्या मुख्य केंद्रात दाखल झाला. आणि आता तो भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘स्वयम’ साठी सीईओपी मधे नियंत्रण कक्ष तर संस्थेच्या इमारतीच्या छतावर अ‍ॅण्टेना उभारण्यात आला आहे. सध्या कॉलेज मधे अंतिम वर्षात शिकणारे धवल वाघुलदे, अब्दुलहुसैन सोनगरवाला, सौरभ बर्वे, तन्वी कटके आणि अभिजित राठोड हे या मिशनचं काम पाहत आहेत. बुधवारनंतर पुढील वर्षभर हे मिशन सुरु राहणार आहे. ‘स्वयम’ ची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे, पुढेही होत राहील. त्याचं आयुष्य एक वर्ष असलं तरी केवळ कॉलेज मधील १७६ विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या एकीच्या बळानं एक महत्वाकांक्षी प्रकल्प आकारास आला. आणि आठ वर्षांचा हा प्रवास अन्य अनेक तरुण इंजिनिअर्सना प्रेरणा देत राहील..