शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर आता उपग्रहाची नजर

By admin | Updated: May 8, 2016 02:30 IST

नवी मुंबईतील दिघा येथील एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांसह नालासोपारा येथील अनधिकृत बांधकामे तोडावीत, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर

- नारायण जाधव,  ठाणे

नवी मुंबईतील दिघा येथील एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांसह नालासोपारा येथील अनधिकृत बांधकामे तोडावीत, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आपले म्हणणे मांडताना राज्य शासनाने डिसेंबर २०१२पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केल्यानंतर शासनाने तसे न्यायालयाला कळवले होते. मात्र, शासनाचा हा निर्णय न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर राज्यातील सर्वच नागरी क्षेत्रांत भूछत्राप्रमाणे होणारी अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर उपग्रह छायाचित्रांचा उतारा शोधला आहे. राज्यभरातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा एमआयडीसी, सिडको यासारख्या प्राधिकरणांनी दर सहा महिन्यांनी आपल्या कार्यक्षेत्राचा अतिउच्च प्रतीचा सुमारे ०.५ रिझोल्यूशन असलेला उपग्रह छायाचित्रांचा मेस मॅप तयार करावा. त्याआधारे शहरातील मंजूर बांधकामे, मंजूर बांधकाम प्रकल्पांचे आरेखन तयार करावे. याव्यतिरिक्त नव्याने होणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे त्वरित तोडावीत. याबाबत, दर सहा महिन्यांनी आढावा घ्यावा. नव्याने होणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी त्या-त्या प्राधिकरणाने संबंधितांना नोटिसा बजावून अशा बांधकामांची नोंद ठेवून ती होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे बजावण्यात आले असून, याकरिता स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यास सांगितले आहे.

- ठाणे जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाखांहून अधिक बांधकामांना यामुळे दिलासा मिळणार होता. मात्र डम्पिंग, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील सातही महापालिकांसह राज्यातील इतर महानगरांत नागरी सुविधांचे तीनतेरा वाजतील, ही भीती ओळखून न्यायालयाने २०१२पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय फेटाळून राज्य शासनास फटकारल्यानंतर जागे झालेल्या नगरविकास खात्याने आता अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी उपग्रह छायाचित्रांचा आधार घेतल्याचे सांगण्यात येते.- विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राज्य शासनाने उपग्रह छायाचित्र संकलनासह भौगोलिक माहिती प्रणालीचा राज्यात वापर करण्यासाठी नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रास राज्यातील नोडल एजन्सी अर्थात प्रमुख संस्था म्हणून नियुक्त केले आहे.