शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

अनधिकृत बांधकामांवर आता उपग्रहाची नजर

By admin | Updated: May 8, 2016 02:30 IST

नवी मुंबईतील दिघा येथील एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांसह नालासोपारा येथील अनधिकृत बांधकामे तोडावीत, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर

- नारायण जाधव,  ठाणे

नवी मुंबईतील दिघा येथील एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांसह नालासोपारा येथील अनधिकृत बांधकामे तोडावीत, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आपले म्हणणे मांडताना राज्य शासनाने डिसेंबर २०१२पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केल्यानंतर शासनाने तसे न्यायालयाला कळवले होते. मात्र, शासनाचा हा निर्णय न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर राज्यातील सर्वच नागरी क्षेत्रांत भूछत्राप्रमाणे होणारी अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर उपग्रह छायाचित्रांचा उतारा शोधला आहे. राज्यभरातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा एमआयडीसी, सिडको यासारख्या प्राधिकरणांनी दर सहा महिन्यांनी आपल्या कार्यक्षेत्राचा अतिउच्च प्रतीचा सुमारे ०.५ रिझोल्यूशन असलेला उपग्रह छायाचित्रांचा मेस मॅप तयार करावा. त्याआधारे शहरातील मंजूर बांधकामे, मंजूर बांधकाम प्रकल्पांचे आरेखन तयार करावे. याव्यतिरिक्त नव्याने होणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे त्वरित तोडावीत. याबाबत, दर सहा महिन्यांनी आढावा घ्यावा. नव्याने होणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी त्या-त्या प्राधिकरणाने संबंधितांना नोटिसा बजावून अशा बांधकामांची नोंद ठेवून ती होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे बजावण्यात आले असून, याकरिता स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यास सांगितले आहे.

- ठाणे जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाखांहून अधिक बांधकामांना यामुळे दिलासा मिळणार होता. मात्र डम्पिंग, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील सातही महापालिकांसह राज्यातील इतर महानगरांत नागरी सुविधांचे तीनतेरा वाजतील, ही भीती ओळखून न्यायालयाने २०१२पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय फेटाळून राज्य शासनास फटकारल्यानंतर जागे झालेल्या नगरविकास खात्याने आता अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी उपग्रह छायाचित्रांचा आधार घेतल्याचे सांगण्यात येते.- विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राज्य शासनाने उपग्रह छायाचित्र संकलनासह भौगोलिक माहिती प्रणालीचा राज्यात वापर करण्यासाठी नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रास राज्यातील नोडल एजन्सी अर्थात प्रमुख संस्था म्हणून नियुक्त केले आहे.