शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

सातारच्या कॅमेरामननं केला ‘ख्वाडा’ पार!

By admin | Updated: October 25, 2015 00:01 IST

साध्या कॅमेऱ्याची कमाल : मेंढपाळांच्या जीवनावर आधारित चित्रपटात वीरधवलने भरले निसर्गाचे रंग

प्रदीप यादव ल्ल सातारा असं म्हटलं जातं की लेखक पटकथा लिहिताना त्याच्या मनात कथापट चित्ररूपानं सरकतो तर दिग्दर्शक ती कथा पडद्यावर दृश्यरूपात कशी मांडावी, याची दिशा ठरवतो; पण लेखक आणि दिग्दर्शकानं पाहिलेल्या स्वप्नाला मूर्तरूप देण्याचं खरं कौशल्य असतं ते कॅमेरामनचं. कोणत्याही प्रकारचे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान न वापरता एका साध्या एचडी कॅमेऱ्यातून पाच राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध सोळा पुरस्कारांनी गौरविलेला ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट चित्रित करण्याचं शिवधनुष्य पेललंय साताऱ्यातील कॅमेरामन वीरधवल पाटील याने. नवख्या कलाकारांबरोबर काम करत असतानाही धनगरांच्या रखरखीत आयुष्यात अन् रांगड्या जीवनशैलीत आपल्या कॅमेऱ्यातून वास्तववादी निसर्गाचे रंग भरणाऱ्या वीरधवलने चित्रपटनिर्मितीतले अनुभव ‘लोकमत’जवळ दिलखुलासपणे व्यक्त केले. मेंढपाळाचं आयुष्य विंचवाच्या बिऱ्हाडासारखं. सगळ्या लवाजम्यासह मजलदरमजल करत रानोमाळ भटकायचं. दिवसभर मेढरं वळायची. रात्र होईल तिथं पाल टाकायचं. जमिनीला पाठ टेकवून आकाश पांघरायचं अन् उद्याचं स्वप्न रंगवत उजाड माळावर निजायचं, असे असंख्य खोडे हसत-हसत पार करत जीवन जगणाऱ्या मेंढपाळांच्या जीवनावर आधारित भाऊराव कऱ्हाडे या तरुणानं ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट बनविला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘ख्वाडा’ या बहुचर्चित चित्रपटाचा कॅमेरामन म्हणून अनुभव कसा होता, याबद्दल विचारले असता वीरधवल म्हणाला, ‘मातीशी नातं सांगणाऱ्या कलाकारांनी एकत्र येऊन बनविलेली ही एक रांगडी कलाकृती आहे. अभिनेता शशांक शेंडे आणि अनिल नगरकर हे दोन कलाकार सोडले तर सर्वच जण नवखे आहेत. ज्यांना अभिनय म्हणजे काय आणि कॅमेरा काय असतो, हे माहीत नाही अशा लोकांबरोबरच काम करताना अनंत अडचणी आल्या; पण अशा वेळी माझा पूर्वानुभव उपयोगी पडला. कलाकारांना जास्त सूचना देण्यापेक्षा कॅमेऱ्याचा अँगल बदलून दृश्ये चित्रित केली. ‘ख्वाडा’साठी उच्च तंत्रज्ञान वापरणेही गरजेचे नव्हते. कारण हा चित्रपट रांगडा आहे. रांगडेपण, त्यांच्या जगण्यातली वास्तवता चित्रित करताना नैसर्गिक वातावरणाचाच जास्त वापर करून घेतला.’  

फायटिंगचा सीन चांगलाच लक्षात! ‘ख्वाडा’मध्ये बहुंशी कलाकार नवखे आहेत; एवढेच काय पण घोडेसुध्दा रानटीच होते. फायटिंगचा सीन शूट करताना एका कलाकाराने कुऱ्हाडीचा वार थेट कॅमेऱ्याच्या तोंडावरच केला. कुऱ्हाड नकली होती म्हणून ‘सगळंच’ बचावलं. शूटिंग करताना घोडे सरळ कॅमेऱ्याच्या दिशेने धावत यायचे. अशावेळेला कॅमेरा सांभाळून दृश्य चित्रित करण्याची कसरत करावी लागे, असे वीरधवलने सांगितले.  

पुरस्कारप्राप्त कलाकृती साकारण्यात अनुभव कामी... चित्रीकरणासाठी किती किमतीचा किंवा किती उच्च दर्जाचा कॅमेरा वापरला हे महत्त्वाचे नसते. त्यामध्ये कौशल्य असते ते कॅमेरामनचे. ‘ख्वाडा’च्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. साध्या एचडी कॅमेऱ्याने हा चित्रपट चित्रित केला आहे. ‘हाय लाईट कंट्रोल’ होत नाही. त्यात ख्वाडाचे संपूर्ण चित्रीकरण ‘आऊटडोअर’ झाले आहे. माळरान, रखरखीत ऊन अशा वातावरणात चित्रीकरण करताना कॅमेऱ्यात जिथे जास्त प्रकाश दिसायचा त्या ठिकाणी एखादं मेंढरू नाहीतर घोडा उभा करून दृश्ये चित्रित केली आहेत. उपलब्ध साधनांचाच जास्त वापर केला आहे.  

अनेक चित्रपट, मालिकांसाठी सहायक कॅमेरामन म्हणून काम केलं. अत्याधुनिक कॅमेरे हाताळले. माझ्या नजरेतून साकारलेला ‘ख्वाडा’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. एवढी नितांत सुंदर कलाकृती आपल्या हातून निर्माण झाल्याचं खूप समाधान वाटतं. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविलं आहेतच; पण प्रेक्षकांची पसंती हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे, असे मला वाटते. - वीरधवल पाटील, कॅमेरामन  

रखरखीत ऊनही डोळ्यांना भावतं! धनगरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात ‘कलरफुल सीन’ कसे असतील? त्यामुळे जे काही आहे ते फक्त नैसर्गिक. डोंगर, तलाव, मेंढपाळांचे रंगीत फेटे, मेंढ्यांचा तळ, पालं, रखरखीत ऊन, मोकळं आकाश अन् जत्रेतला गुलाल अन् भंडारा याचे चित्रण अशा प्रकारे केले आहे ज्यामुळेच हा चित्रपट अधिक जिवंत झाला आहे. यामध्ये कुठेही ‘मिक्सिंग’ केलेले नाही. रखरखीत ऊनही डोळ्यांना भावतं, असे वीरधवल म्हणाला.