शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

राज्यातील पहिला हागणदारीमुक्त सातारा जिल्हा

By admin | Updated: April 27, 2017 20:03 IST

अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करून सातारा जिल्हा परिषदेने राज्य शासनाने दिलेले आव्हान समर्थपणे पेलले

 आॅनलाईन लोकमत सातारा, दि. 27 -   अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करून सातारा जिल्हा परिषदेने राज्य शासनाने दिलेले आव्हान समर्थपणे पेलले. जिल्ह्यातील १,४९० ग्रामपंचायती पडताळणी अखेर हागणदारीमुक्त घोषित करून, राज्यातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला घोषित करण्यात आले.प्रधानमंत्री यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेल्या हागणदारीमुक्तीच्या चळवळीमध्ये जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १,४९० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. घर तेथे शौचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच शालेय अंगणवाडी सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्त्वपूर्ण घटक आहेत.जून २०१६ मध्ये राज्य शासनाने एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आव्हान दिले होते. सातारा जिल्हा परिषदेने ५२ हजार शौचालये पूर्ण करत अवघ्या ११ महिन्यांतच हे आव्हान समर्थपणे पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचयातींची बाबनिहाय तपासणी करून त्यांचा दर्जा व पात्रता ठरविण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या ४६ त्रयस्थ स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती केली होती. या सर्व संस्थांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची २७ मार्च २०१७ अखेर तपासणी पूर्ण करून राज्य शासनास अहवाल सादर केला. २४ एप्रिल रोजी या अहवालावरून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर सातारा जिल्ह्यातील १,४९० ग्रामपंचायती पडताळणी अखेर हागणदारीमुक्त घोषित करून सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील सर्व प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी या चळवळीत सकारात्मक भूमिका घेत प्रचार व प्रसिद्धीची धुरा प्रभावीपणे राबविली. तसेच जिल्हा व तालुकास्तरीय तज्ज्ञ चमूचा सुयोग्य वापर करून या चळवळीचा वेग राखण्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रशेखर जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच जनता या सर्वांचे प्रभावी प्रयत्न व सहभाग या सर्व बाबी यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहील : संजीवराजेसातारा जिल्ह्याने नेहमीच पथदर्शी उपक्रम राबवून राज्याला मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली आहे. ह्यस्वच्छ भारत मिशनह्णच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, स्वच्छ भारत मिशनची टीम, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, प्रसारमाध्यमे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे यश प्राप्त झाले आहे. या पुढेही जिल्ह्यात स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्याचे काम जबाबदारीने पार पाडेल. या कार्यात पदाधिकाऱ्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहील, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.ही चळवळ थांबणार नाही : देशमुख जिल्हा परिषदेने हाती घेतलेली ही चळवळ हागणदारीमुक्त होईपर्यंत थांबविली जाणार नाही. यापुढेही प्राधान्याने घनकचरा व सांडपाणी या घटकांवर काम केले जाईल. कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि वहन व व्यवस्थापन याद्वारे सातारा जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.