शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिला हागणदारीमुक्त सातारा जिल्हा

By admin | Updated: April 27, 2017 20:03 IST

अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करून सातारा जिल्हा परिषदेने राज्य शासनाने दिलेले आव्हान समर्थपणे पेलले

 आॅनलाईन लोकमत सातारा, दि. 27 -   अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करून सातारा जिल्हा परिषदेने राज्य शासनाने दिलेले आव्हान समर्थपणे पेलले. जिल्ह्यातील १,४९० ग्रामपंचायती पडताळणी अखेर हागणदारीमुक्त घोषित करून, राज्यातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला घोषित करण्यात आले.प्रधानमंत्री यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेल्या हागणदारीमुक्तीच्या चळवळीमध्ये जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १,४९० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. घर तेथे शौचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच शालेय अंगणवाडी सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्त्वपूर्ण घटक आहेत.जून २०१६ मध्ये राज्य शासनाने एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आव्हान दिले होते. सातारा जिल्हा परिषदेने ५२ हजार शौचालये पूर्ण करत अवघ्या ११ महिन्यांतच हे आव्हान समर्थपणे पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचयातींची बाबनिहाय तपासणी करून त्यांचा दर्जा व पात्रता ठरविण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या ४६ त्रयस्थ स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती केली होती. या सर्व संस्थांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची २७ मार्च २०१७ अखेर तपासणी पूर्ण करून राज्य शासनास अहवाल सादर केला. २४ एप्रिल रोजी या अहवालावरून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर सातारा जिल्ह्यातील १,४९० ग्रामपंचायती पडताळणी अखेर हागणदारीमुक्त घोषित करून सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील सर्व प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी या चळवळीत सकारात्मक भूमिका घेत प्रचार व प्रसिद्धीची धुरा प्रभावीपणे राबविली. तसेच जिल्हा व तालुकास्तरीय तज्ज्ञ चमूचा सुयोग्य वापर करून या चळवळीचा वेग राखण्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रशेखर जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच जनता या सर्वांचे प्रभावी प्रयत्न व सहभाग या सर्व बाबी यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहील : संजीवराजेसातारा जिल्ह्याने नेहमीच पथदर्शी उपक्रम राबवून राज्याला मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली आहे. ह्यस्वच्छ भारत मिशनह्णच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, स्वच्छ भारत मिशनची टीम, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, प्रसारमाध्यमे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे यश प्राप्त झाले आहे. या पुढेही जिल्ह्यात स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्याचे काम जबाबदारीने पार पाडेल. या कार्यात पदाधिकाऱ्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहील, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.ही चळवळ थांबणार नाही : देशमुख जिल्हा परिषदेने हाती घेतलेली ही चळवळ हागणदारीमुक्त होईपर्यंत थांबविली जाणार नाही. यापुढेही प्राधान्याने घनकचरा व सांडपाणी या घटकांवर काम केले जाईल. कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि वहन व व्यवस्थापन याद्वारे सातारा जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.