शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Satara Bus Accident: मदतकार्यात माणसांतच दिसला देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 02:36 IST

शनिवारी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून ३० जणांच्या मृत्यूअंती या घाटाचे काही काळ मृत्यूच्या घाटात रूपांतर झाले

- जयंत धुळपअलिबाग : शनिवारी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून ३० जणांच्या मृत्यूअंती या घाटाचे काही काळ मृत्यूच्या घाटात रूपांतर झाले; परंतु त्याच क्षणाला ट्रेकर्सच्या जीवाची बाजी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या माणूसकीच्या महापुरासच प्रारंभ झाला आणि तब्बल २९ तासांच्या रेस्क्यू आॅपरेशन दरम्यान माणसामधल्या देवाची अनुभूती उपस्थितांना आली.बस दरीत कोसळल्याची बातमी जवळच्या वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांत पोहोचली. त्यानंतर तत्काळ या गावातील ग्रामस्थांनी प्रथम या पावसात ६०० फूट खोल दरीत उतरून २२ जण मृत झाल्याची माहिती वर आणली आणि आपल्या स्तरावर मदतकार्यास प्रारंभ केला. त्याच सुमारास पोलादपूरचेपोलीस निरीक्षक प्रकाश पवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि शासकीयसर्व यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्सच्या धाडसी शिलेदारांनी मृतदेह दरीतून वर काढण्यास दोरांच्या साहाय्याने प्रारंभ केला. त्यांच्या या आपत्ती निवारण कामात सहकार्य करण्यासाठी पोलादपूर, महाड, खेड, दापोली, कोलाड, भोर, पुणे आणि ठाणे येथील विविध ट्रेकिंग व अ‍ॅडव्हेंचर ग्रुपचे ट्रेकर्स आपल्या रोप, हारनेस, झुमार, कॅरॅबीनर्स अशा गिर्यारोहण साहित्यासह दाखल झाले. घटनास्थळी जमलेल्या ७५पेक्षा अधिक ट्रेकर्सचा हेतू एकच होता, आपल्याला बचाव कार्य करायचे आहे. परिणामी, क्षणाचाही विलंब न लावता या सर्वट्रेकर्सचे संघटित काम तत्काळ सुरू झाले आणि मृतदेह दरीतून वर आणण्याच्या कामास मोठी गती आली.आरोग्य यंत्रणेचा समन्वयआरोग्य यंत्रणेचा अंतर्भाव या समन्वयात अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्याचे दिसून आले, त्यामुळे मृतदेह दरीतून वर आणल्यावर तो पोलादपूर रुग्णालयात आणून तेथे पोस्टर्माटम आणि पुढे तो मृतदेह मृताच्या गावी त्यांच्या घरी पाठविण्याकरिता तत्काळ व्यवस्था, यामुळे सरकारी यंत्रणा आणि नातेवाईक यांचा सर्वत्र दिसून येणार संघर्ष येथे कुठेही पाहायला मिळाला नाही.दापोली दुसºया दिवशीही सुन्नकोकण कृषि विद्यापीठाच्या ३० कर्मचाºयांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. दापोली दुसºया दिवशीही सुन्न होती. सर्व व्यवहार बंद ठेवून मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.२५ जणांवर दापोलीत, संगमेश्वर, सातारा, मंडणगड येथे प्रत्येकी एकावर तर दोघांवर सिंधुदुर्गात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री रविंद्र्र वायकर, आमदार संजय कदम, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, शिक्षण संचालक डॉ. सतिश नारखेडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.देसाई यांनामानसिक धक्काबस दरीत कोसळत असताना प्रकाश सावंत-देसाई गाडीतून बाहेर फेकले गेले. ते सुदैवाने बचावले. त्यांच्यामुळेच हा अपघात झाल्याचे सर्वांना समजले. ते दरीतून रस्त्यावर आले. त्यांनी अपघाताचे वृत्त दापोली कृषी विद्यापीठात कळवले तसेच घाटातून प्रवास करणाºयांनाही सांगितले. त्यांच्यामुळेच शोधकार्य तत्काळ सुरू करता आले. त्यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीअपघातात मृत्युमुखी पडलेले विक्रांत शिंदे रा. गिणवणे, सचिन गिम्हवणेकर, नीलेश तांबे, संतोष झगडे, राजेंद्र रिसबूड, संजीव झगडे, प्रशांत भांबेड, रत्नाकर पागडे, सचिन झगडे, प्रमोद शिगवण, सुनील कदम, राजाराम गावडे, प्रमोद जाधव, पंकज कदम, रितेश जाधव, विनायक सावंत, संदीप सुवरे, सुनील साठले, राजेंद्र बंडबे, सुयश बाळ, संदीप झगडे, सचिन गुजर, रोशन तबीब, दत्तात्रेय धायगुडे, हेमंत सुर्वे, किशोर चौगुले, संदीप भोसले, संतोष जालगावकर, राजेश सावंत, जयवंत चौगले हे एकूण ३० मृतदेह बाहेर काढले आहेत.शिवसेनेतर्फे प्रत्येकी १ लाखाची मदतकेंद्र्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांनी कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाची आढावा बैठक घेऊन कुटुंबीयांना दिलासा देण्याच्या सूचना दिल्या. मृतांच्या कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे प्रत्येकी १ लाख रुपये मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.घाट रस्त्यांनाबॅरिकेटस् आवश्यकसगळ्या घाटांना बॅरिकेटस् लावणे आवश्यक आहे. त्याचीही दखल घेतली जाणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.अपघातात मृत्यू ओढवलेल्या कुटुंबीयांना वैयक्तिकरीत्या प्रत्येकी १० हजारांची मदत दिली असल्याचे वायकर यांनी सांगितले.जैन मंडळाकडून भोजनदापोली येथील जैन मंडळाचे काही कार्यकर्ते रविवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या वतीने मदतकार्य करणाºयांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सुमारे ५०० नागरिकांना मंडळाकडून चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मंडळात चेतन जैन, हसमुख जैन, महेश जैन, प्रवीण जैन, राजू जैन, योगेश जैन व शाम जैन यांचा समावेश होता.त्या महिलेत दिसला देव...एक अत्यंत हृदय हेलावून टाकणारा आणि माणूसकीचा गहिवर सिद्ध करणारा प्रसंग येथे कार्यरत पोलादपूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सांगितला. शनिवार आणि रविवार या दोन दिवस सुरू असलेल्या रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान एक सर्वसामान्य महिला घरी बनवलेले वडापाव आणून येथे काम करणारे ट्रेकर्स आणि अन्य सहकारी यांना खाऊ घालत होती. इतकेच नव्हे, तर दरीत जर महिला असेल तर खाली उतरण्याचीही तयारी तिने दर्शवल्याचे पवार यांनी सांगितले.रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी समन्वयातून केलेले आपत्ती निवारणाचे नियोजन प्रत्यक्ष काम करणाºयांकरिता आत्यंतिक महत्त्वाचे ठरले. बचाव कार्यातील ट्रेकर्सना जी काही मदत अपेक्षित असायची ती त्यांच्याकडून जाणून ती पूर्ण करण्याकरिता रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भारत शितोळे आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील हे दोन वरिष्ठ अधिकारी या २९ तासांच्या बचाव मोहीम काळात तत्परतेने कार्यरत होते.रविवारी दुपारी ४ वाजता तब्बल २९ तासांनी हे रेस्क्यू आॅपरेशन पूर्ण झाले. सर्व ट्रेकर्स दरीतून वर आले, त्यांना सर्वांनी धन्यवाद दिले. सतत चिखलात काम केल्याने या ट्रेकर्सच्या पायांच्या तळव्यांना पडलेल्या चिरा आणि काहींच्या पायातून येणारे रक्त पाहिल्यावर मानव सेवा यापेक्षा आणखी काय असू शकते, याचे प्रत्यंतर सर्वांना आले.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघात