शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

सरदारांनीच राखली राष्ट्रवादीची अब्रू

By admin | Updated: October 20, 2014 05:25 IST

राष्ट्रवादी काँग्रेस हा सरदारांचा एकत्रित संघ असल्याची टीका नेहमीच केली जाते. या पक्षाच्या नेत्यांमध्ये टगेगिरी वाढल्याची टीका विरोधक करीत होते

यदु जोशी, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेस हा सरदारांचा एकत्रित संघ असल्याची टीका नेहमीच केली जाते. या पक्षाच्या नेत्यांमध्ये टगेगिरी वाढल्याची टीका विरोधक करीत होते. राष्ट्रवादीची प्रतिमा ज्या नेत्यांमुळे बरीवाईट तयार झाली, त्यातील बरेच जण निवडून आले. पक्षाची अब्रू राखण्यासाठी हे सरदारच कामी आले. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, आर. आर. पाटील, मनोहर नाईक, जयदत्त क्षीरसागर, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, भास्कर जाधव असे दिग्गज जिंकले. गणेश नाईक, अनिल देशमुख, सचिन अहीर, नवाब मलिक, सुरेश धस यांना मात्र पराभवाचा धक्का बसला. काका-पुतण्यापासून बारामती मुक्त करा, असे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मतदारांनी किंमत दिली नाही. पुणे, बीड, सोलापूर, जळगाव जिल्ह्यामध्ये जबर फटका बसला. पुणे जिल्ह्यात गेल्यावेळी २१ पैकी १० आमदार होते. या वेळी हा आकडा तीनवर आला. पुणे म्हणजे पवार या समीकरणाला जबर धक्का बसला. विदर्भात आता घड्याळात मनोहर नाईक हा एकच काटा उरला. युती-आघाडी झाली असती तर मोठा फटका राष्ट्रवादीला बसला असता. चौघेही वेगवेगळे लढल्याने राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांना मतविभाजनाचा फायदा होऊन ते निवडून येऊ शकल्याचे किमान १५ ते १८ ठिकाणी दिसते.