शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सप्तखंजेरीने दुमदुमला वेगळ्या विदर्भाचा नारा

By admin | Updated: June 23, 2014 01:26 IST

सत्यपाल महाराज म्हणजे गवळण, गारुड, भजन, अभंग, अभिनय ते आत्ताच्या काळातला ‘लुंगी डान्स...गंदी बात...’ पर्यंतच्या गीतांचा उपयोग करुन प्रबोधन करणारे कीर्तनकार. त्यांना केवळ कीर्तनकारही म्हणता येत नाही.

सत्यपाल महाराजांचे दमदार प्रबोधन : जनमंचतर्फे लोककीर्तनाचा उपक्रम नागपूर : सत्यपाल महाराज म्हणजे गवळण, गारुड, भजन, अभंग, अभिनय ते आत्ताच्या काळातला ‘लुंगी डान्स...गंदी बात...’ पर्यंतच्या गीतांचा उपयोग करुन प्रबोधन करणारे कीर्तनकार. त्यांना केवळ कीर्तनकारही म्हणता येत नाही. कारण त्यांच्या सादरीकरणात सर्वच लोककलांचा बेमालूम उपयोग ते करतात. पण परिणाम कमालीचा विलक्षण असतो. एखादा मुद्दा सांगताना आपल्याला काहीच कळत नाही, असे सांगता-सांगता ते विचक्षण पद्धतीने श्रोत्यांना विचारप्रवृत्त करतात आणि विषय या हृदयीचा त्या हृदयी पोहोचतो. एरवी गावागावांत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या सत्यपाल महाराजांनी आज थेट वेगळा विदर्भ विषयावर कीर्तन करीत तमाम श्रोत्यांना संमोहित केले. लोककलांच्या, लोकगीतांच्या आणि इथल्या मातीचा गंध सांगत त्यांनी कधी उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या, कधी मनमुराद हसविले. अनेक विषयांच्या हिंदोळ्यावर कीर्तन झुलत ठेवताना त्यांनी वेगळ्या विदर्भाचा विचार प्रत्येकाच्या मनात जिरविला. जनमंचच्यावतीने न्या. अशोक देसाई स्मृती व्याख्यानमालेत त्यांच्या प्रबोधनाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. वेगळ्या विदर्भाचा विषय होता पण सभागृह फुल्ल झाले. सभागृबाहेर स्क्रिन्स लावण्यात आले पण तेथेही गर्दीने उच्चांक मोडला होता. बसायला जागा नव्हती लोक मिळेल त्या जागेत दाटीवाटीने उभे होते. ‘आम्ही गोंधळी गोंधळी..आम्ही विदर्भाचे गोंधळी...’ या गीताने त्यांनी कीर्तनाला प्रारंभ केला आणि त्यांच्या सप्तखंजेरीच्या वादनात तब्बल दोन तास कसे संपले, ते कळलेच नाही. त्यांनी घराघरातल्या संस्काराची गरज सांगतांनाच संत तुकाराम ते गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भगवान बुद्ध ते शिवाजी महाराज, विवेकानंद ते पंजाबराव देशमुख यांचे दाखले देत हा विषय अधिक व्यापक केला. पश्चिम महाराष्ट्रात ऊस, केळी, द्राक्ष विदर्भात मात्र आत्महत्या. तिकडल्या शेतकऱ्यांचे १० ते १५ लाखाचे कर्ज माफ, विदर्भातल्या शेतकऱ्यांचे मात्र १२ हजार माफ. सिंचनाअभावी आमच्या शेतीत उत्पादन कमी होते म्हणून आमचे चेहरे कोरडवाहू होतात. त्यांची आत्महत्या होते. पुढारी, पुजाऱ्यांना समस्या का येत नाहीत. त्यांचे ‘इनकमिंग’ सुरूच असते. हल्ली पोरांना शिकायचे असले तर पुणे, मुंबईत जावे लागते. वेगळा विदर्भ झाला तर शिक्षण, नोकरी येथे मिळेल. आम्हालाही बीपीएल नव्हे आयपीएल व्हायचे आहे, अशी साद सत्यपाल महाराजांनी घातली आणि टाळ्यांचा प्रतिसादही मिळाला. सत्यपाल महाराजांची शैली गाडगेबाबांसारखी होती. कीर्तनात लोकांना सहभागी करुन घेत त्यांनी थेट प्रश्न करीत लोकांकडूनच त्यांची उत्तरेही मागितली. वीज, जंगल, कोळसा, वनराई, सिमेंट, पाणी, कापूस, खनिजे सारे विदर्भाजवळ आहे. पण त्याचा आम्हालाच उपयोग होत नाही. तेलंगणाची ताकद वाढली, झाला ना वेगळा. आपलीही ताकद वाढविली पाहिजे. या चार महिन्यातच काम करायचे आहे. ज्याला जे देता येईल ते द्या, असे आवाहन करीत त्यांनी वेगळ्या विदर्भाचा विषय कधी नव्हे ऐवढा प्रभावीपणे पोहोचविला. कार्यक्रमाचा प्रारंभ शरद ठाकरे, अ‍ॅड. अनिल किलोर अ‍ॅड. सत्यजित देसाई, चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. याप्रसंगी न्या देसाई यांच्या पत्नी अरुणा देसाई प्रामुख्याने उपस्थित होत्या. अनिल किलोर यांनी जनमंचची माहिती दिली. त्यानंतर शरद ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भासंबंधी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी डॉ.पिनाक दंदे, सेवानिवृत्ती पोलिस अधिकारी पी.के.चक्रवर्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजीव जगताप यांनी केले. (प्रतिनिधी)