शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

तुरीमुळे उद्योगाला संजीवनी

By admin | Updated: May 8, 2017 04:21 IST

रेकॉर्ड ब्रेक तुरीच्या उत्पादनामुळे जालना शहरातील दाल मिल्सना संजीवनी मिळाली आहे. ३० पैकी २५ दाल मिल्स सुरू असून

राजेश भिसे/लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेकॉर्ड ब्रेक तुरीच्या उत्पादनामुळे जालना शहरातील दाल मिल्सना संजीवनी मिळाली आहे. ३० पैकी २५ दाल मिल्स सुरू असून, याद्वारे १५०० लोकांना रोजगार मिळाला आहे.जालना शहरात २५ ते ३० वर्षांपूर्वी दाल मिल उद्योग भरभराटीला आला होता. दाल मिलचे शहर म्हणून त्याची ओळख बनली. कालौघात कमी होत गेलेले उत्पादन आणि वाढती स्पर्धा या कारणांमुळे दाल मिल्सचे भवितव्य धोक्यात आले होते.  गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने, जिल्ह्यात सुमारे २० वर्षांनंतर रेकॉर्ड ब्रेक तुरीचे उत्पादन झाले. त्यामुळे दाल मिल उद्योगाला संजीवनी मिळाली आहे. सततच्या दुष्काळी स्थितीतुळे तीन ते चार वर्षे केवळ १० मिल्स  सुरू होत्या.  अनेकांचा रोजगार  बुडाला होता, पण यंदा तुरीने  या उद्योगाला बुस्ट मिळणार असून, २५ दाल मिल्स सद्य:स्थितीत सुरू आहेत.

उद्योगाच्या माध्यमातून मापाडी, हमाल, कामगार आदी मिळून 1500 लोकांना रोजगार मिळाला आहे. राज्य व केंद्र सरकारने दाल मिल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणण्याची मागणी या उद्योग क्षेत्रातून होत आहे. नाफेड, तसेच राज्य शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली तूर प्राधान्याने जिल्ह्यातील दाल मिल चालकांनाच द्यावी. या तुरीची परजिल्ह्यात अथवा इतर राज्यांत विक्री करू नये. - अनिल पंच, अध्यक्ष, दाल मिल असोसिएशन, जालना