शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्त अजून तुरुंगाबाहेरच

By admin | Updated: January 10, 2015 02:16 IST

चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर (फर्लो) गेलेल्या अभिनेता संजय दत्त याने दिलेल्या वाढीव रजेच्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

पुणे /मुंबई : चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर (फर्लो) गेलेल्या अभिनेता संजय दत्त याने दिलेल्या वाढीव रजेच्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई पोलिसांकडून ‘क्लिअरन्स रिपोर्ट’आल्यानंतरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र धामणे यांनी स्पष्ट केले. संजय दत्त सध्या चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर कारागृहाबाहेर आहे. त्याच्या रजेची मुदत गुरुवारी संपली. गुरुवारी दुपारपर्यंत तो कारागृहामध्ये हजर होणे अपेक्षित होते. परंतु मुंबईहून सकाळीच पुण्याच्या दिशेने निघालेला संजय दत्त संध्याकाळपर्यंत पुण्यात फिरून वेळ घालवत मुंबईला परतला. तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत त्याने वाढीव रजेसाठी अर्ज केला होता. परंतु या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. संजयच्या प्रकृतीबाबत मुंबई पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे. मात्र संजय दत्त अन्य कैद्यांप्रमाणे २८ दिवसांपर्यंत कारागृहाबाहेर राहू शकतो असेही धामणे यांनी स्पष्ट केले. संजयच्या रजेवरून गृहमंत्रालय, पोलीस आणि तुरुंग प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून येते. रजेची मुदत संपलेली असताना संजय दत्त कारागृहाबाहेर कसा, असे पत्रकारांनी विचारले असता गृह राज्यमंत्री शिंदे म्हणाले, गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून कुठलाही कैदी सुटत नसतो. त्यामुळे संजय दत्तला फर्लो मंजूर करणे वा नाकारणे याच्याशी गृहमंत्र्यांचा संबंध नसतो. संजय दत्तच्या फर्लोबाबत माझ्याकडे तक्रार आल्यास चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणावर माझे बारकाईने लक्ष आहे. कारागृह प्रशासनाकडून संजयच्या वाढीव रजेच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. गृह विभागाचे सर्व अधिकारी याबाबत नियमांचे पालन करतील. (प्रतिनिधी) गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावासंजय दत्तच्या अभिवचन रजेबाबत गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.संजय दत्तच्या फर्लोबाबत नियमानुसारच कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. कोणाला मुद्दाम लक्ष्य करण्याचा वा कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. - देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री