शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

संजय दत्त अजून तुरुंगाबाहेरच

By admin | Updated: January 10, 2015 02:16 IST

चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर (फर्लो) गेलेल्या अभिनेता संजय दत्त याने दिलेल्या वाढीव रजेच्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

पुणे /मुंबई : चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर (फर्लो) गेलेल्या अभिनेता संजय दत्त याने दिलेल्या वाढीव रजेच्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई पोलिसांकडून ‘क्लिअरन्स रिपोर्ट’आल्यानंतरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र धामणे यांनी स्पष्ट केले. संजय दत्त सध्या चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर कारागृहाबाहेर आहे. त्याच्या रजेची मुदत गुरुवारी संपली. गुरुवारी दुपारपर्यंत तो कारागृहामध्ये हजर होणे अपेक्षित होते. परंतु मुंबईहून सकाळीच पुण्याच्या दिशेने निघालेला संजय दत्त संध्याकाळपर्यंत पुण्यात फिरून वेळ घालवत मुंबईला परतला. तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत त्याने वाढीव रजेसाठी अर्ज केला होता. परंतु या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. संजयच्या प्रकृतीबाबत मुंबई पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे. मात्र संजय दत्त अन्य कैद्यांप्रमाणे २८ दिवसांपर्यंत कारागृहाबाहेर राहू शकतो असेही धामणे यांनी स्पष्ट केले. संजयच्या रजेवरून गृहमंत्रालय, पोलीस आणि तुरुंग प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून येते. रजेची मुदत संपलेली असताना संजय दत्त कारागृहाबाहेर कसा, असे पत्रकारांनी विचारले असता गृह राज्यमंत्री शिंदे म्हणाले, गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून कुठलाही कैदी सुटत नसतो. त्यामुळे संजय दत्तला फर्लो मंजूर करणे वा नाकारणे याच्याशी गृहमंत्र्यांचा संबंध नसतो. संजय दत्तच्या फर्लोबाबत माझ्याकडे तक्रार आल्यास चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणावर माझे बारकाईने लक्ष आहे. कारागृह प्रशासनाकडून संजयच्या वाढीव रजेच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. गृह विभागाचे सर्व अधिकारी याबाबत नियमांचे पालन करतील. (प्रतिनिधी) गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावासंजय दत्तच्या अभिवचन रजेबाबत गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.संजय दत्तच्या फर्लोबाबत नियमानुसारच कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. कोणाला मुद्दाम लक्ष्य करण्याचा वा कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. - देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री