शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

फर्लो रजेप्रकरणी संजय दत्त निर्दोष!

By admin | Updated: February 19, 2015 08:30 IST

फर्लोची मुदत उलटल्यावरही दोन दिवस पुण्यातील येरवडा तरुंगात दाखल न झालेला अभिनेता संजय दत्त निर्दोष असून, तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्या गोंधळामुळे तो दोन दिवस बाहेर राहिला.

मुंबई : फर्लोची मुदत उलटल्यावरही दोन दिवस पुण्यातील येरवडा तरुंगात दाखल न झालेला अभिनेता संजय दत्त निर्दोष असून, तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्या गोंधळामुळे तो दोन दिवस बाहेर राहिला. त्यामुळे आता संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असून, संजयची चार दिवसांची रजा बुडणार आहे.फर्लोची मुदत संपल्यावर येरवडा तुरुंगात दाखल होण्याकरिता ८ जानेवारीला सायंकाळी संजय पोहोचला. मात्र तोपर्यंत त्याने केलेल्या रजेच्या नव्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय घेतला नव्हता. परिणामी दोन दिवस तो बाहेर राहिला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले होते. आता याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, संजयची यामध्ये कुठलीही चूक नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे शिंदे म्हणाले. संजय दत्त याच्या फर्लोच्या अर्जावर ४५ दिवसांनी नव्हे, तर ११३ दिवसांनी निर्णय घेण्यात आला. २२ सप्टेंबरला फर्लोकरिता पात्र ठरलेल्या संजयला २३ डिसेंबरला रजा मंजूर झाली. ८ जानेवारीच्या सूर्यास्तापूर्वी संजयने येरवडा कारागृहात हजर व्हायला हवे होते. मात्र त्याच्या वकिलांनी रजा वाढवण्याबाबत केलेल्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकारी व पोलीस यांनी वेळेत निर्णय न घेतल्याने किंवा निर्णय घेऊनही त्याबाबतचे आदेश पोस्टामार्फत धाडण्याची चूक केल्याने संजय दोन दिवस बाहेर राहिला, असे शिंदे यांनी सांगितले.रजा मंजूर करताना पोलिसांची संमती घेण्याची कायद्यात तरतूद नाही. मात्र मेधा गाडगीळ या गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव असताना त्यांनी एक परिपत्रक काढून पोलिसांच्या संमतीची अट आवश्यक असल्याचे नमूद केले. यामुळे तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव निर्माण झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.