शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

वर्चस्ववादात अडकले सांगलीचे मंत्रीपद

By admin | Updated: September 1, 2015 22:26 IST

अनेकांच्या पदरी निराशा : घटकपक्षांच्या मंत्रीपदाला चंद्रकांतदादांचा अडसर?

सांगली : मंत्रीपदापासून अलिप्त राहिलेल्या सांगली जिल्ह्याची चर्चा राज्याच्या पटलावरही गाजत आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात भाजपचेच वर्चस्व राहावे, या हेतूने घटकपक्षांच्या नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले जात आहे, अशी खंत घटकपक्षांच्याच एका नेत्याने (नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर) व्यक्त केली. दुसरीकडे दोन्ही जिल्ह्यातील आपले महत्त्व कमी होऊ नये, म्हणून चंद्रकांतदादांचा स्वकीयांच्या मंत्रीपदालाही विरोध वाढल्याचे त्यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये घटकपक्षांची ताकद मोठी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या जिल्ह्यांंना घटकपक्षांच्या माध्यमातून मंत्रीपदे मिळाली, तर याठिकाणचे भाजपचे महत्त्व कमी होईल आणि भविष्यात त्यातून पक्षाला फटकाही बसू शकतो, असे गणित मांडले जात आहे. याच गणिताच्या आधारावर घटकपक्षांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा प्रश्न रेंगाळल्याचे सांगण्यात येत आहे. घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सांगली जिल्ह्याला वर्षानुवर्षे मंत्रीपदाची परंपरा आहे. एकाचवेळी चार-पाच मंत्रीपदे सांगलीने भूषविली आहेत. मुख्यमंत्रीपदापासून राज्यमंत्रीपदापर्यंत आणि महामंडळांच्या अध्यक्षपदापासून ते विविध राज्यस्तरीय समित्यांच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक पदे सांगली जिल्ह्याच्या वाट्याला आली. या परंपरेला भाजप सरकारच्या कालावधितच खंड पडला. सांगलीला मंत्रीपदच नसल्याने कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सांगलीचेही पालकत्व सोपविण्यात आले आहे. वास्तविक दोन्ही जिल्ह्यांची सूत्रे त्यांच्याकडे असल्यामुळे जिल्ह्याला पूर्ण न्याय देणे त्यांना शक्य होत नसल्याचे दिसत आहे. प्रत्येक महिन्याला किंवा आठवड्याला येणेही शक्य नसल्याने जिल्ह्याच्या आढावा बैठकांचा आलेखही घटला आहे. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रीपद मिळावे म्हणून राजकीय ताकद लावली जात आहे. जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांची नावे यापूर्वी चर्चेत होती. खाडे यांना पक्षीय पद देऊन शांत केले आहे. आता उर्वरित नेत्यांमध्ये मंत्रीपदाची शर्यत असली तरी, घटकपक्षांच्या एका नेत्याने सांगलीला मंत्रीपद न मिळण्याची कारणे सांगितली. चंद्रकांतदादांना दोन्ही जिल्ह्यातील ताकद अबाधित ठेवायची असल्याने, ते जिल्ह्याच्या स्वतंत्र मंत्रीपदासाठी फारसे उत्सुक नसल्याचे घटकपक्षांच्याच एका नेत्याने सांगितले. दुसरीकडे घटकपक्षांना मंत्रीपद दिल्यास सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एखादे मंत्रीपद येऊ शकते. सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मंत्रीपदे दिली जाऊ शकतात. घटकपक्षांची ताकद या चार जिल्ह्यांमध्ये अधिक असल्याने याठिकाणी भाजपला अन्य पक्षांना वरचढ होऊ द्यायचे नाही. (प्रतिनिधी)मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निराशामंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेकदा घोषणा झाल्या. प्रत्येक घोषणेवेळी सांगलीतील नेत्यांच्या आशा वाढवून ठेवण्यात आल्या. मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या घोषणांवर स्थानिक नेते व पदाधिकारी आता विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. पक्षीय शिष्टाचार म्हणून ते गप्प असले तरी, त्यांची खदखद कायम आहे. भाजपमध्ये अन्य पक्षांतून आलेले नेते आणि निष्ठावंत पदाधिकारी यांना आजवर महामंडळाचे गाजर भाजपने दाखविले. प्रत्यक्षात एकाही व्यक्तीची निवड महामंडळे किंवा कोणत्याही राज्यस्तरीय समितीवर होऊ शकली नाही. मंत्रीपदापासून वंचित असलेला हा जिल्हा अन्य पदांपासूनही तितकाच दूर आहे. निष्ठावंत आणि बाहेरून आलेल्या नेत्यांमध्येही यामुळे निराशा पसरली आहे.