शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

सांगली : बंगला फोडून 15 तोळे दागिने,लाखोच्या रोकडवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 19:52 IST

हरिपूर (ता. मिरज) येथील अशोक दत्तात्रय जोशी यांचा ‘पारिजात’ हा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला.

सांगली, दि. 13 -  हरिपूर (ता. मिरज) येथील अशोक दत्तात्रय जोशी यांचा ‘पारिजात’ हा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.हरिपूरमध्ये विनायकनगरमधील लक्ष्मी कॉलनीत अशोक जोशी यांचा बंगला आहे. चार दिवसापूर्वी ते कुटूंबासह मुंबईला गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्या उत्तरेकडील बाजूच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाचा लॉक तोडला. त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील सोन्याच्या चार जोड बांगल्या, तीन जोड मंगळसूत्र, चार जोड रिंगा, पाच अंगठ्या असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. जोशी कुटूंब रविवारी पहाटे मुंबईहून घरी परतले. घरात गेल्यानंतर त्यांना बेडरुमधील विस्कटलेले साहित्य पाहून चोरी झाल्याचा संशय आला. तसेच लॉकरमध्ये दागिने व रोकडही नव्हती. बंगल्याभोवती संरक्षक भिंत आहे. या भिंतीवरुन उड्या मारुन चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केल्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. महत्वाचे ठसे मिळाले आहेत. श्वान बंगल्यापासून काही अंतरावर गेले. तिथेच ते घुटमळले. दुपारी अशोक जोशी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. दुसरी घरफोडी-महिन्यापूर्वी हरिपूरच्या विनायकनगर परिसरात चोरट्यांनी अलिशान बंगला फोडून २० तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, देवांच्या मूर्ती व रोकड असा २१ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा अजूनही छड लागलेला नाही. तोपर्यंत चोरट्यांनी आणखी एक बंगला फोडून पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.